शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

समाजाचे अस्तित्व टिकवायचे असेल तर तीन अपत्ये हवीत :डॉ. मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 05:19 IST

...तर तो समाज आपोआपच नष्ट होतो : सरसंघचालक

नागपूर : लोकसंख्याशास्त्रानुसार लोकसंख्या वाढीचा दर २.१ च्या खाली आला तर तो समाज आपोआप नष्ट होतो. त्याला कुणी संपवायची गरज नसते. म्हणून समाजाचे अस्तित्व टिकवायचे असेल तर त्यापेक्षा अधिक वेगाने लोकसंख्या वाढणे गरजेचे आहे. ०.१ माणूस तर जन्मत नाही. म्हणून किमान तीन अपत्य हवीत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी येथे केले.

कठाळे कुलसंमेलनाचे आयोजन रविवारी दीक्षाभूमीजवळील बी. आर. ए. मुंडले शाळेच्या प्लॅटिनम ज्युबली सभागृहात करण्यात आले. उद्घाटन सत्रात प्रमुख अतिथी म्हणून सरसंघचालक बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी अनिल कठाळे, संजय कठाळे, उदय कठाळे आणि शुभांगी कठाळे उपस्थित होते.

डॉ. भागवत म्हणाले, कुलसंमेलनाने धर्म व संस्कृती टिकते. कुलनीती चालली पाहिजे. त्यातून संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते. आपली संस्कृती टिकविली जाते. माणसाचा स्वभाव वाटणाऱ्यांचा असला पाहिजे. वाटणाऱ्यांचा मान मोठा असतो. तशीच समाजाची संस्कृती असते. महिलेचे महत्व आपल्या संस्कृतीत मातेचे असते. पाश्चात्य संस्कृतीत मात्र पत्नीचे असते. धन माणसाजवळ असावे, पण ते आवश्यकतेपेक्षा जास्त असू नये.

घरातील लहान गोष्टीतून संस्कृती जपायला हवी

मुलांना घरातच लागलेले वळण फार महत्त्वाचे असते. ते परंपरेने चालत आलेले असते. पाश्चात्य संस्कृतीमध्ये या गोष्टी वेगळ्या प्रकारे होत्या. पण आता त्याचा त्यांना विसर पडला आहे. याउलट आपल्याकडे संस्कृती अजूनही जपली जात आहे. घरातील लहान-लहान गोष्टीतून आपली संस्कृती जपली जाते. ही व्यवस्था आपल्याकडे आहे. कुटुंबापासून संस्कृती गाव आणि मग राज्यात जाते, असे सरसंघचालक म्हणाले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतnagpurनागपूर