शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

समाजाचे अस्तित्व टिकवायचे असेल तर तीन अपत्ये हवीत :डॉ. मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 05:19 IST

...तर तो समाज आपोआपच नष्ट होतो : सरसंघचालक

नागपूर : लोकसंख्याशास्त्रानुसार लोकसंख्या वाढीचा दर २.१ च्या खाली आला तर तो समाज आपोआप नष्ट होतो. त्याला कुणी संपवायची गरज नसते. म्हणून समाजाचे अस्तित्व टिकवायचे असेल तर त्यापेक्षा अधिक वेगाने लोकसंख्या वाढणे गरजेचे आहे. ०.१ माणूस तर जन्मत नाही. म्हणून किमान तीन अपत्य हवीत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी येथे केले.

कठाळे कुलसंमेलनाचे आयोजन रविवारी दीक्षाभूमीजवळील बी. आर. ए. मुंडले शाळेच्या प्लॅटिनम ज्युबली सभागृहात करण्यात आले. उद्घाटन सत्रात प्रमुख अतिथी म्हणून सरसंघचालक बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी अनिल कठाळे, संजय कठाळे, उदय कठाळे आणि शुभांगी कठाळे उपस्थित होते.

डॉ. भागवत म्हणाले, कुलसंमेलनाने धर्म व संस्कृती टिकते. कुलनीती चालली पाहिजे. त्यातून संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते. आपली संस्कृती टिकविली जाते. माणसाचा स्वभाव वाटणाऱ्यांचा असला पाहिजे. वाटणाऱ्यांचा मान मोठा असतो. तशीच समाजाची संस्कृती असते. महिलेचे महत्व आपल्या संस्कृतीत मातेचे असते. पाश्चात्य संस्कृतीत मात्र पत्नीचे असते. धन माणसाजवळ असावे, पण ते आवश्यकतेपेक्षा जास्त असू नये.

घरातील लहान गोष्टीतून संस्कृती जपायला हवी

मुलांना घरातच लागलेले वळण फार महत्त्वाचे असते. ते परंपरेने चालत आलेले असते. पाश्चात्य संस्कृतीमध्ये या गोष्टी वेगळ्या प्रकारे होत्या. पण आता त्याचा त्यांना विसर पडला आहे. याउलट आपल्याकडे संस्कृती अजूनही जपली जात आहे. घरातील लहान-लहान गोष्टीतून आपली संस्कृती जपली जाते. ही व्यवस्था आपल्याकडे आहे. कुटुंबापासून संस्कृती गाव आणि मग राज्यात जाते, असे सरसंघचालक म्हणाले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतnagpurनागपूर