शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

समाजाचे अस्तित्व टिकवायचे असेल तर तीन अपत्ये हवीत :डॉ. मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 05:19 IST

...तर तो समाज आपोआपच नष्ट होतो : सरसंघचालक

नागपूर : लोकसंख्याशास्त्रानुसार लोकसंख्या वाढीचा दर २.१ च्या खाली आला तर तो समाज आपोआप नष्ट होतो. त्याला कुणी संपवायची गरज नसते. म्हणून समाजाचे अस्तित्व टिकवायचे असेल तर त्यापेक्षा अधिक वेगाने लोकसंख्या वाढणे गरजेचे आहे. ०.१ माणूस तर जन्मत नाही. म्हणून किमान तीन अपत्य हवीत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी येथे केले.

कठाळे कुलसंमेलनाचे आयोजन रविवारी दीक्षाभूमीजवळील बी. आर. ए. मुंडले शाळेच्या प्लॅटिनम ज्युबली सभागृहात करण्यात आले. उद्घाटन सत्रात प्रमुख अतिथी म्हणून सरसंघचालक बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी अनिल कठाळे, संजय कठाळे, उदय कठाळे आणि शुभांगी कठाळे उपस्थित होते.

डॉ. भागवत म्हणाले, कुलसंमेलनाने धर्म व संस्कृती टिकते. कुलनीती चालली पाहिजे. त्यातून संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते. आपली संस्कृती टिकविली जाते. माणसाचा स्वभाव वाटणाऱ्यांचा असला पाहिजे. वाटणाऱ्यांचा मान मोठा असतो. तशीच समाजाची संस्कृती असते. महिलेचे महत्व आपल्या संस्कृतीत मातेचे असते. पाश्चात्य संस्कृतीत मात्र पत्नीचे असते. धन माणसाजवळ असावे, पण ते आवश्यकतेपेक्षा जास्त असू नये.

घरातील लहान गोष्टीतून संस्कृती जपायला हवी

मुलांना घरातच लागलेले वळण फार महत्त्वाचे असते. ते परंपरेने चालत आलेले असते. पाश्चात्य संस्कृतीमध्ये या गोष्टी वेगळ्या प्रकारे होत्या. पण आता त्याचा त्यांना विसर पडला आहे. याउलट आपल्याकडे संस्कृती अजूनही जपली जात आहे. घरातील लहान-लहान गोष्टीतून आपली संस्कृती जपली जाते. ही व्यवस्था आपल्याकडे आहे. कुटुंबापासून संस्कृती गाव आणि मग राज्यात जाते, असे सरसंघचालक म्हणाले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतnagpurनागपूर