शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

समाजाचे अस्तित्व टिकवायचे असेल तर तीन अपत्ये हवीत :डॉ. मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 05:19 IST

...तर तो समाज आपोआपच नष्ट होतो : सरसंघचालक

नागपूर : लोकसंख्याशास्त्रानुसार लोकसंख्या वाढीचा दर २.१ च्या खाली आला तर तो समाज आपोआप नष्ट होतो. त्याला कुणी संपवायची गरज नसते. म्हणून समाजाचे अस्तित्व टिकवायचे असेल तर त्यापेक्षा अधिक वेगाने लोकसंख्या वाढणे गरजेचे आहे. ०.१ माणूस तर जन्मत नाही. म्हणून किमान तीन अपत्य हवीत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी येथे केले.

कठाळे कुलसंमेलनाचे आयोजन रविवारी दीक्षाभूमीजवळील बी. आर. ए. मुंडले शाळेच्या प्लॅटिनम ज्युबली सभागृहात करण्यात आले. उद्घाटन सत्रात प्रमुख अतिथी म्हणून सरसंघचालक बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी अनिल कठाळे, संजय कठाळे, उदय कठाळे आणि शुभांगी कठाळे उपस्थित होते.

डॉ. भागवत म्हणाले, कुलसंमेलनाने धर्म व संस्कृती टिकते. कुलनीती चालली पाहिजे. त्यातून संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते. आपली संस्कृती टिकविली जाते. माणसाचा स्वभाव वाटणाऱ्यांचा असला पाहिजे. वाटणाऱ्यांचा मान मोठा असतो. तशीच समाजाची संस्कृती असते. महिलेचे महत्व आपल्या संस्कृतीत मातेचे असते. पाश्चात्य संस्कृतीत मात्र पत्नीचे असते. धन माणसाजवळ असावे, पण ते आवश्यकतेपेक्षा जास्त असू नये.

घरातील लहान गोष्टीतून संस्कृती जपायला हवी

मुलांना घरातच लागलेले वळण फार महत्त्वाचे असते. ते परंपरेने चालत आलेले असते. पाश्चात्य संस्कृतीमध्ये या गोष्टी वेगळ्या प्रकारे होत्या. पण आता त्याचा त्यांना विसर पडला आहे. याउलट आपल्याकडे संस्कृती अजूनही जपली जात आहे. घरातील लहान-लहान गोष्टीतून आपली संस्कृती जपली जाते. ही व्यवस्था आपल्याकडे आहे. कुटुंबापासून संस्कृती गाव आणि मग राज्यात जाते, असे सरसंघचालक म्हणाले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतnagpurनागपूर