शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

'आमच्या पोरांनी न्याय दिला, तर पोलिसांनी मध्ये यायचं नाही'; कल्याण प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 13:15 IST

कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबाला परप्रांतीयांकडून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे, यावरुन आता राजकीय प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

कल्याणमध्ये काल मराठी कुटुंबाला परप्रांतीयांकडून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणावरुन आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे संतापले आहेत. 

मोठी बातमी! धनखड यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव नोटीस फेटाळली; उप सभापतींनी दिली ही कारणे...

कल्याणमध्ये अखिलेश शुक्ला या सरकारी अधिकाऱ्याने गुंडाकरवी मारहाण केली होती. 'तुम्ही मासे खाणारे मराठी माणसं घाण, भिकारी आहात, तुमचे मराठीपण बाहेर काढतो',असं म्हणत त्या अधिकाऱ्याने मराठी भाषिकांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. आमदार आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारवाई नाही केली तर आमच्या पोरांनी न्याय दिला तर पोलिसांनी मध्ये पडू नये असा इशारा दिला आहे. 

आमदार आदित्य ठाकरे म्हणाले, कल्याणमधील घटना संतापजनक आहे. मराठी अमराठी वाद संतापजनक आहे, याआधीचे आणि आताचे सरकार या वादाला प्रोत्साहन देत आहे का हे पाहणे गरजेचे आहे. गेल्या दोन वर्षापासून असे अनेक वाद झाले आहेत. राज्य कोणचही असो आमची मुंबई आमचे राज्य हे मराठी माणसाचेच आहे. अनेक लोक आमच्या राज्यात येतात, मिसळून राहतात. कोणालाही त्रास होत नव्हता. पण कालसारख जर कोण मस्ती दाखवत असेल तर तेव्हा आमच्या तरुणांनी त्यांना न्याय दिला तर न्याय कसा असतो हे दाखवलं तर पोलिसांनी मध्ये येऊ नये, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला. 

"कोण जिथे मराठी माणसाला मारलं आहे, तिथे त्या शुक्लाचे कोणी तोंड फोडलं तर पोलिसांनी मध्ये येऊ नये. तो अधिकारी जिथून आला आहे, त्या अधिकाऱ्याला तिथे पाठवावे, असंही ठाकरे म्हणाले. यापुढे जो कोणी व्हेज सोसायटी करायचा प्रयत्न करत असेल तर त्याची ओसी रद्द करावी, अशी मागणीही ठाकरे यांनी केली. 

जर कोणी आपल्या मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर महाराष्ट्र द्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. जर कोणी दादागीरी करत असेल तर त्या पोलिसांचा दंडूका काय आहे हे दाखवणे गरजेच आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. मला खात्री आहे जर हे मुख्यमंत्री महाराष्ट्र प्रेमी असतील तर आमच्या मागणीला मान देऊन तो कायदा आणतील, असंही ठाकरे म्हणाले.  

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेनाkalyanकल्याण