शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

अमित शाह निर्दोष असतील तर निष्पक्ष चौकशी व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 20:06 IST

सरकारने मनात आणले तर कोणत्याही प्रकरणाचे सत्य सहज बाहेर येते. मात्र न्या. लोया यांच्या प्रकरणात सरकारला सत्य बाहेर येऊ द्यायचे नाही, त्यामुळे संपूर्ण चौकशीमध्ये एकतर्फी दबाव आणण्यात आला. लोया यांच्या मृत्यूचे प्रकरण गंभीर आहे व ते थेट भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्याशी जुळलेले आहे. अमित शाह निर्दोष असतील तर निष्पक्ष चौकशीला भीती कशाची? त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शी चौकशी व्हावी, अशी मागणी कॅरव्हान पत्रिकेचे संपादक हरतोष सिंह बल यांनी केली.

ठळक मुद्देन्या. लोया मृत्यूचे गूढ : हरतोष सिंह बल यांचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सरकारने मनात आणले तर कोणत्याही प्रकरणाचे सत्य सहज बाहेर येते. मात्र न्या. लोया यांच्या प्रकरणात सरकारला सत्य बाहेर येऊ द्यायचे नाही, त्यामुळे संपूर्ण चौकशीमध्ये एकतर्फी दबाव आणण्यात आला. लोया यांच्या मृत्यूचे प्रकरण गंभीर आहे व ते थेट भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्याशी जुळलेले आहे. अमित शाह निर्दोष असतील तर निष्पक्ष चौकशीला भीती कशाची? त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शी चौकशी व्हावी, अशी मागणी कॅरव्हान पत्रिकेचे संपादक हरतोष सिंह बल यांनी केली.शनिवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीतील अनेक त्रुटी पत्रकारांसमोर मांडल्या. कॅरव्हान पत्रिकेने न्या. लोया यांच्या मृत्यूचे वृत्त प्रकाशित केले होते. लोया यांच्या कुटुंबीयांशी अनेक दिवस चर्चा केल्यानंतरच याबाबत वृत्त प्रकाशित केल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, ज्या रविभवन येथे न्या. लोया थांबले होते, तेथील प्रक्रियेत स्पष्टता नाही. रजिस्टरवर त्यांच्या नावाचा उल्लेख नाही. एका संवेदनशील प्रकरणातील न्यायमूर्ती येथे थांबले असताना आवश्यक प्रोटोकॉल देण्यात आला नाही. ज्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले, तेथील तपासणीबाबतही तफावत दिसून येते. ईसीजी होता की नव्हता याबाबतही स्पष्टता नाही. शवविच्छेदन करतानाही सोबत असलेल्यांनी कुटुंबाशी संपर्क साधण्याऐवजी भलत्याशीच संपर्क साधल्याचे बल यांनी नमूद केले. त्यांचे शव घरी पोहचविले तेव्हा, रुग्णवाहिकेच्या चालकाऐवजी कुणीही सोबत नसल्याचा उल्लेख कुटुंबीयांनी केला होता. रविभवन येथे लोया यांच्यासोबत चार इतर जज असल्याचे सांगण्यात येते. मात्र प्रकरणाच्या तपासणीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला, त्यामध्ये या चार न्यायमूर्तीचे बयान घेतल्याचा कुठेही उल्लेख नाही. उलट प्रत्यक्षदर्शी नसलेल्या न्यायमूर्तींचे बयान कसा घेतले, ही बाब समजण्यापलिकडे आहे. अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या नसताना २०१६ मध्ये प्रकरणच बंद करण्यात आले. एवढ्या संवेदनशील प्रकरणातील न्यायाधीशांच्या मृत्यूच्या चौकशीत दिसणारी तफावत अनाकलनीय असल्याचे मत हरतोष सिंह यांनी व्यक्त केले. लोया यांचा मुलगा अनुज याने कोणत्याही संस्थेवर भरोसा राहिला नाही, असा उल्लेख केला होता. त्यामुळे प्रकरणात नागरिकांची थेट निगराणी राहील आणि माध्यमांना बातम्या करण्याचे स्वातंत्र राहील अशाप्रकारे कोणत्याही संविधानिक संस्थेमार्फ त चौकशी व्हावी अशी मागणी बल यांनी केली. यावेळी प्राचार्य बबनराव तायवाडे उपस्थित होते.

टॅग्स :Amit Shahअमित शाहnagpurनागपूर