शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
3
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
4
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
5
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
6
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
7
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
8
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
9
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
10
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
11
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
12
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
13
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
14
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
15
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
16
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
17
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
18
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
19
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
20
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप

अमित शाह निर्दोष असतील तर निष्पक्ष चौकशी व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 20:06 IST

सरकारने मनात आणले तर कोणत्याही प्रकरणाचे सत्य सहज बाहेर येते. मात्र न्या. लोया यांच्या प्रकरणात सरकारला सत्य बाहेर येऊ द्यायचे नाही, त्यामुळे संपूर्ण चौकशीमध्ये एकतर्फी दबाव आणण्यात आला. लोया यांच्या मृत्यूचे प्रकरण गंभीर आहे व ते थेट भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्याशी जुळलेले आहे. अमित शाह निर्दोष असतील तर निष्पक्ष चौकशीला भीती कशाची? त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शी चौकशी व्हावी, अशी मागणी कॅरव्हान पत्रिकेचे संपादक हरतोष सिंह बल यांनी केली.

ठळक मुद्देन्या. लोया मृत्यूचे गूढ : हरतोष सिंह बल यांचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सरकारने मनात आणले तर कोणत्याही प्रकरणाचे सत्य सहज बाहेर येते. मात्र न्या. लोया यांच्या प्रकरणात सरकारला सत्य बाहेर येऊ द्यायचे नाही, त्यामुळे संपूर्ण चौकशीमध्ये एकतर्फी दबाव आणण्यात आला. लोया यांच्या मृत्यूचे प्रकरण गंभीर आहे व ते थेट भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्याशी जुळलेले आहे. अमित शाह निर्दोष असतील तर निष्पक्ष चौकशीला भीती कशाची? त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शी चौकशी व्हावी, अशी मागणी कॅरव्हान पत्रिकेचे संपादक हरतोष सिंह बल यांनी केली.शनिवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीतील अनेक त्रुटी पत्रकारांसमोर मांडल्या. कॅरव्हान पत्रिकेने न्या. लोया यांच्या मृत्यूचे वृत्त प्रकाशित केले होते. लोया यांच्या कुटुंबीयांशी अनेक दिवस चर्चा केल्यानंतरच याबाबत वृत्त प्रकाशित केल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, ज्या रविभवन येथे न्या. लोया थांबले होते, तेथील प्रक्रियेत स्पष्टता नाही. रजिस्टरवर त्यांच्या नावाचा उल्लेख नाही. एका संवेदनशील प्रकरणातील न्यायमूर्ती येथे थांबले असताना आवश्यक प्रोटोकॉल देण्यात आला नाही. ज्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले, तेथील तपासणीबाबतही तफावत दिसून येते. ईसीजी होता की नव्हता याबाबतही स्पष्टता नाही. शवविच्छेदन करतानाही सोबत असलेल्यांनी कुटुंबाशी संपर्क साधण्याऐवजी भलत्याशीच संपर्क साधल्याचे बल यांनी नमूद केले. त्यांचे शव घरी पोहचविले तेव्हा, रुग्णवाहिकेच्या चालकाऐवजी कुणीही सोबत नसल्याचा उल्लेख कुटुंबीयांनी केला होता. रविभवन येथे लोया यांच्यासोबत चार इतर जज असल्याचे सांगण्यात येते. मात्र प्रकरणाच्या तपासणीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला, त्यामध्ये या चार न्यायमूर्तीचे बयान घेतल्याचा कुठेही उल्लेख नाही. उलट प्रत्यक्षदर्शी नसलेल्या न्यायमूर्तींचे बयान कसा घेतले, ही बाब समजण्यापलिकडे आहे. अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या नसताना २०१६ मध्ये प्रकरणच बंद करण्यात आले. एवढ्या संवेदनशील प्रकरणातील न्यायाधीशांच्या मृत्यूच्या चौकशीत दिसणारी तफावत अनाकलनीय असल्याचे मत हरतोष सिंह यांनी व्यक्त केले. लोया यांचा मुलगा अनुज याने कोणत्याही संस्थेवर भरोसा राहिला नाही, असा उल्लेख केला होता. त्यामुळे प्रकरणात नागरिकांची थेट निगराणी राहील आणि माध्यमांना बातम्या करण्याचे स्वातंत्र राहील अशाप्रकारे कोणत्याही संविधानिक संस्थेमार्फ त चौकशी व्हावी अशी मागणी बल यांनी केली. यावेळी प्राचार्य बबनराव तायवाडे उपस्थित होते.

टॅग्स :Amit Shahअमित शाहnagpurनागपूर