शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

अभिव्यक्तीसाठी विचार प्रगल्भ हवेत : विजय दर्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:53 AM

माध्यम कुठलेही असो अभिव्यक्तीसाठी आधी विचार प्रगल्भ व्हायला हवेत. ही प्रगल्भता मनाच्या एकाग्रतेतूनच शक्य आहे. त्यामुळे चित्रकारांनी कुंचला हातात घेण्याआधी मन शांत आणि एकाग्र ठेवले पाहिजे, असे विचार लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे निसर्ग चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन व पारितोषिक वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माध्यम कुठलेही असो अभिव्यक्तीसाठी आधी विचार प्रगल्भ व्हायला हवेत. ही प्रगल्भता मनाच्या एकाग्रतेतूनच शक्य आहे. त्यामुळे चित्रकारांनी कुंचला हातात घेण्याआधी मन शांत आणि एकाग्र ठेवले पाहिजे, असे विचार लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केले. जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीतर्फे रामबेगी येथे घेण्यात आलेल्या आर्ट कॅम्पमध्ये कलावंतांनी जी चित्रे साकारली या चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी झाले. या उद्घाटनीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष व विख्यात चित्रकार वासुदेव कामथ, ज्येष्ठ चित्रकार प्रमोदबाबू रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते. विजय दर्डा पुढे म्हणाले, आज संपूर्ण जगात चित्रकलेचे तंत्र बदलत आहे. हे तंत्र या क्षेत्रातील नवोदितांनीही शिकले पाहिजे. कलावंतामध्ये जिद्द असली पाहिजे. एम. एफ. हुसेन यांनी चक्क रस्त्यावर बसून काम केले. पुढे ते आपल्या प्रतिभेच्या बळावर महान चित्रकार झाले. असे दर्जेदार चित्रकार घडविण्यासाठी जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आता येथील विद्यार्थ्यांचे चित्र विदेशात गेले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. प्रमोदबाबू रामटेके म्हणाले, निसर्ग चित्रणात चित्रकलेचे मूळ आहे, कारण यात जे समोर दिसते ते रेखाटले जाते. प्रत्येक कलावंताचे चित्र वेगळे असते, कारण ते काढण्यामागे प्रत्येकाची मनोभूमिका वेगळी असते. या कार्यक्रमात पाहुण्यांच्या हस्ते ज्येष्ठ चित्रकारांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये दिलीप भालेराव, श्याम डोंगरवार, नितीन पाटील, अजय रायबोले, सुनील पुराणिक, भारत सलाम, किरण पराते, दयानंद रामटेके, संजय मालधुरे, प्रफुल डेकाटे व समीर देशमुख यांचा समावेश होता. यावेळी निसर्ग चित्रण स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.यांनी जिंकले पुरस्कारप्रथम- सुमित ब्राम्हणकरद्वितीय - शिवराज टिटमेतृतीय - नंदकिशोर सालवटकरचतुर्थ - करण कवाडेपाचवे - स्वप्निल रामागडेउत्तेजनार्थ - रोहित मानेकउत्तेजनार्थ - श्रीपाद भोंगाडेउत्तेजनार्थ - स्वप्निल शिरूकर

चित्र कुठे थांबवायचे हे कळले पाहिजे

निसर्ग चित्रण करताना अनेकदा कलावंत वाहवत जातात. नदी, पहाड, सूर्य, पक्षी असे सारेच समोर दिसत असल्याने चित्रचा आकार वाढतो. परिणामी दर्जा खालावतो. त्यामुळे एखादवेळी चित्रत काही उणो झाले तरी चालेल अतिरिक्त मात्र काहीच होऊ नये. चित्र काढताना आपण कुठे थांबायला हवे याचे ज्ञान चित्रकाराला असले पाहिजे, असे विचार विख्यात चित्रकार वासुदेव कामत यांनी व्यक्त केले. कलावंत व समाज यांच्यातील अदृश्य दरी भरून काढण्याचे काम निसर्ग चित्रण करते. कारण, हे चित्रण करताना चित्रकार प्रत्यक्ष लोकांमध्ये मिसळत असतो. निसर्ग चित्रण हा विषय केवळ हायस्कूलच्या सबमिशनपुरता मर्यादित नाही. या चित्रंमध्ये प्राण ओतायचे असतील तर रानावनात भटकावे लागेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

टॅग्स :Jawaharlal Darda Art Galleryजवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीpaintingचित्रकला