शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

फडणवीस, पटेल यांच्या विरोधातच लढणार : नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 19:45 IST

भाजपाला रामराम ठोकल्यानंतर माजी खासदार नाना पटोले यांनी भाजप नेत्यांवर हल्ले वाढविले आहेत. आता तर त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले आहे. भंडारा-गोदिंया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उमेदवार म्हणून उतरले किंवा भाजपाने राष्ट्रवादीचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी दिली तर त्यांच्या विरोधात आपण निवडणूक लढू, अशी घोषणा पटोले यांनी गुरुवारी केली.

ठळक मुद्देपश्चात्ताप यात्रा व काँग्रेस प्रवेशही लांबणीवर

आॅनलाईन लोकमतनागपूर : भाजपाला रामराम ठोकल्यानंतर माजी खासदार नाना पटोले यांनी भाजप नेत्यांवर हल्ले वाढविले आहेत. आता तर त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले आहे. भंडारा-गोदिंया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उमेदवार म्हणून उतरले किंवा भाजपाने राष्ट्रवादीचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी दिली तर त्यांच्या विरोधात आपण निवडणूक लढू, अशी घोषणा पटोले यांनी गुरुवारी केली.नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर टीका करीत गुजरात निवडणुकीची धामधूम सुरू असताना राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांचीही भेट घेतली. तेव्हापासून पटोले हे भाजपावर अधिक आक्रमक झाले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत पटोले यांनी भंडारा-गोंदिया मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. आता पटोले यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदावर पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. यावर पटोले म्हणाले, मुख्यमंत्र्यांना दिल्लीचे बोलावणे येण्याची शक्यता आहे. तसे झाले तर ते भंडारा-गोंदियातून लोकसभेची पोटनिवडणूक लढू शकतात. प्रफुल्ल पटेल यांचीही भाजपाशी जवळीक वाढली आहे. ते ही भाजपाचे उमेदवार होऊ शकतात. या दोन नेत्यांपैकी एकानेही निवडणूक लढविली तर त्यांच्या विरोधात आपण रिंगणात उतरू, असे आव्हान त्यांनी दिले. ते लढले नाहीत तर काँग्रेसचा दुसरा कार्यकर्ता निवडणूक लढेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या पार्श्ववभूमीवर पटोले यांची १२ जानेवारीपासून सुरू होणारी प्रस्तावित पश्चात्ताप यात्रा व त्यांचा काँग्रेस प्रवेशही लांबणीवर पडला आहे. राज्यभर हिंसाचाराच्या घटना घडत असताना अशांत वातावरणात यात्रा काढणे योग्य होणार नाही, असे पटोले यांनी स्पष्ट केले. बुधवारी पटोले यांनी दिल्ली येथे खा. अशोक चव्हाण यांच्यासमवेत पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतरच पटोले यांच्या काँग्रेस प्रवेशाची घोषणा होणार होती. मात्र, राज्यात बंदचे वातावरण असताना राजकीय प्रवेशाची घोषणा करणे टाळण्यात आले.दाभडीत ११ रोजी सभा नाना पटोले यांच्या नेतृत्वात १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेड राजा (जि. बुलडाणा) येथून जयंतीनिमित्त सुरू होणारी ही पश्चात्ताप यात्रा शिवजयंतीला (१९ फेब्रुवारी) साकोली येथे पोहोचणार होती. ती आता पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, ११ जानेवारी रोजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी येथे पश्चात्ताप यात्रा काढून जाहीर सभा घेणार असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेnagpurनागपूर