शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

नागपुरात बेलगाम विद्यार्थ्यांवर कारवाईचा ‘हंटर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 23:27 IST

वाहतुकीचे नियम पाळत दुचाकीस्वाराने वाहन चालविताना हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. मात्र महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या नियमांचा विसर पडला आहे.‘लोकमत’च्या ‘आॅन द स्पॉट’मध्ये ७५ टक्के विद्यार्थी विना हेल्मेट, ट्रिपल सीट व दुचाकी चालविताना मोबाईल व हेडफोनचा वापर करताना आढळून आले. या वृत्ताने शहरात खळबळ उडाली. वाहतूक पोलीस उपायुक्त (वाहतूक) राज तिलक रौशन यांनी याची गंभीर दखल घेत विद्यार्थ्यांच्या ट्रिपल सीट व विना हेल्मेटविरोधात विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार विविध महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारासमोरच सकाळी ७ वाजतापासून कारवाईला सुरुवात झाली. यात तब्बल ५४८ विद्यार्थी दोषी आढळून आले. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येत विद्यार्थ्यांवर कारवाई झाल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देलोकमतचा प्रभाव५४८ विद्यार्थ्यांवर कारवाई४२२ विना हेल्मेट, ६१ ट्रिपल सीट६५ अल्पवयीन विद्यार्थ्यांचे फाडले चालान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाहतुकीचे नियम पाळत दुचाकीस्वाराने वाहन चालविताना हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. मात्र महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या नियमांचा विसर पडला आहे.‘लोकमत’च्या ‘आॅन द स्पॉट’मध्ये ७५ टक्के विद्यार्थी विना हेल्मेट, ट्रिपल सीट व दुचाकी चालविताना मोबाईल व हेडफोनचा वापर करताना आढळून आले. या वृत्ताने शहरात खळबळ उडाली. वाहतूक पोलीस उपायुक्त (वाहतूक) राज तिलक रौशन यांनी याची गंभीर दखल घेत विद्यार्थ्यांच्या ट्रिपल सीट व विना हेल्मेटविरोधात विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार विविध महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारासमोरच सकाळी ७ वाजतापासून कारवाईला सुरुवात झाली. यात तब्बल ५४८ विद्यार्थी दोषी आढळून आले. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येत विद्यार्थ्यांवर कारवाई झाल्याचे बोलले जात आहे.दुचाकीवर स्वार होऊन तीन विद्यार्थिनी भरधाव वेगाने महाविद्यालयात जात असताना ‘मेट्रो’च्या ‘क्रेन’वर आदळल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला. समाजात याबाबत हळहळ व्यक्त झाली. महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या ‘सोशल मीडिया’वर याबाबत ‘स्टेटस’देखील ठेवले. मात्र वास्तवात या घटनेपासून विद्यार्थ्यांनी काही बोध घेतला का, याची चाचपणी ‘लोकमत’ने ‘आॅन द स्पॉट’मधून शहरातील विविध महाविद्यालयांच्या परिसरात भेट देऊन केली. समोर आलेले वास्तव हादरविणारे होते. तरुणाईच्या अतिउत्साहावर स्वार होऊन भरधाव वेगाने दुचाकी दामटणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी अक्षरश: मृत्यूशीच स्पर्धा करीत आहेत की काय, असा प्रश्न उत्पन्न झाला. अर्ध्याहून अधिक विद्यार्थी वाहतुकींचे साधे नियम पाळत नसल्याचे दुर्दैवी चित्र होते. आश्चर्य म्हणजे गर्दीच्या रस्त्यांवर ‘ट्रिपल सीट’ जाणाऱ्यांचे प्रमाण तर जास्त प्रमाणात दिसून आले. आपली एक चूक स्वत:सोबतच कुटुंबीयांच्या स्वप्नांची एका क्षणात राखरांगोळी करू शकते, याची जाणीवदेखील विद्यार्थ्यांना नसल्याचे सामोर आले. ‘लोकमत’ने २१ आॅगस्टच्या अंकात ‘ट्रिपल सीट, जीवाहून प्यारी’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध करताच खळबळ उडाली. शहरातील अनेक मोठ्या महाविद्यालय प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली. जे विद्यार्थी विना हेल्मेट व ट्रिपल सीट येतील त्यांना प्रवेश दिला जाणार नसल्याच्या सूचना काढल्या. वाहतूक पोलीस उपायुक्तांनीही याची गंभीर दखल घेत गुरुवारी सकाळी ७ वाजेपासून विविध महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच कारवाईचे निर्देश पाच वाहतूक झोनला दिले. त्यानुसार ५४८ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. यात ४२२ विना हेल्मेट , ६१ ट्रिपल सीट, ६५ अल्पवयीन विद्यार्थ्यांचा समावेश होता. 

 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसStudentविद्यार्थी