शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

नागपुरात बेलगाम विद्यार्थ्यांवर कारवाईचा ‘हंटर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 23:27 IST

वाहतुकीचे नियम पाळत दुचाकीस्वाराने वाहन चालविताना हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. मात्र महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या नियमांचा विसर पडला आहे.‘लोकमत’च्या ‘आॅन द स्पॉट’मध्ये ७५ टक्के विद्यार्थी विना हेल्मेट, ट्रिपल सीट व दुचाकी चालविताना मोबाईल व हेडफोनचा वापर करताना आढळून आले. या वृत्ताने शहरात खळबळ उडाली. वाहतूक पोलीस उपायुक्त (वाहतूक) राज तिलक रौशन यांनी याची गंभीर दखल घेत विद्यार्थ्यांच्या ट्रिपल सीट व विना हेल्मेटविरोधात विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार विविध महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारासमोरच सकाळी ७ वाजतापासून कारवाईला सुरुवात झाली. यात तब्बल ५४८ विद्यार्थी दोषी आढळून आले. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येत विद्यार्थ्यांवर कारवाई झाल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देलोकमतचा प्रभाव५४८ विद्यार्थ्यांवर कारवाई४२२ विना हेल्मेट, ६१ ट्रिपल सीट६५ अल्पवयीन विद्यार्थ्यांचे फाडले चालान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाहतुकीचे नियम पाळत दुचाकीस्वाराने वाहन चालविताना हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. मात्र महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या नियमांचा विसर पडला आहे.‘लोकमत’च्या ‘आॅन द स्पॉट’मध्ये ७५ टक्के विद्यार्थी विना हेल्मेट, ट्रिपल सीट व दुचाकी चालविताना मोबाईल व हेडफोनचा वापर करताना आढळून आले. या वृत्ताने शहरात खळबळ उडाली. वाहतूक पोलीस उपायुक्त (वाहतूक) राज तिलक रौशन यांनी याची गंभीर दखल घेत विद्यार्थ्यांच्या ट्रिपल सीट व विना हेल्मेटविरोधात विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार विविध महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारासमोरच सकाळी ७ वाजतापासून कारवाईला सुरुवात झाली. यात तब्बल ५४८ विद्यार्थी दोषी आढळून आले. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येत विद्यार्थ्यांवर कारवाई झाल्याचे बोलले जात आहे.दुचाकीवर स्वार होऊन तीन विद्यार्थिनी भरधाव वेगाने महाविद्यालयात जात असताना ‘मेट्रो’च्या ‘क्रेन’वर आदळल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला. समाजात याबाबत हळहळ व्यक्त झाली. महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या ‘सोशल मीडिया’वर याबाबत ‘स्टेटस’देखील ठेवले. मात्र वास्तवात या घटनेपासून विद्यार्थ्यांनी काही बोध घेतला का, याची चाचपणी ‘लोकमत’ने ‘आॅन द स्पॉट’मधून शहरातील विविध महाविद्यालयांच्या परिसरात भेट देऊन केली. समोर आलेले वास्तव हादरविणारे होते. तरुणाईच्या अतिउत्साहावर स्वार होऊन भरधाव वेगाने दुचाकी दामटणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी अक्षरश: मृत्यूशीच स्पर्धा करीत आहेत की काय, असा प्रश्न उत्पन्न झाला. अर्ध्याहून अधिक विद्यार्थी वाहतुकींचे साधे नियम पाळत नसल्याचे दुर्दैवी चित्र होते. आश्चर्य म्हणजे गर्दीच्या रस्त्यांवर ‘ट्रिपल सीट’ जाणाऱ्यांचे प्रमाण तर जास्त प्रमाणात दिसून आले. आपली एक चूक स्वत:सोबतच कुटुंबीयांच्या स्वप्नांची एका क्षणात राखरांगोळी करू शकते, याची जाणीवदेखील विद्यार्थ्यांना नसल्याचे सामोर आले. ‘लोकमत’ने २१ आॅगस्टच्या अंकात ‘ट्रिपल सीट, जीवाहून प्यारी’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध करताच खळबळ उडाली. शहरातील अनेक मोठ्या महाविद्यालय प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली. जे विद्यार्थी विना हेल्मेट व ट्रिपल सीट येतील त्यांना प्रवेश दिला जाणार नसल्याच्या सूचना काढल्या. वाहतूक पोलीस उपायुक्तांनीही याची गंभीर दखल घेत गुरुवारी सकाळी ७ वाजेपासून विविध महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच कारवाईचे निर्देश पाच वाहतूक झोनला दिले. त्यानुसार ५४८ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. यात ४२२ विना हेल्मेट , ६१ ट्रिपल सीट, ६५ अल्पवयीन विद्यार्थ्यांचा समावेश होता. 

 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसStudentविद्यार्थी