शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महामानवाच्या शेकडो ऐतिहासिक वस्तू पुन्हा धोक्यात

By आनंद डेकाटे | Updated: April 10, 2025 17:38 IST

शांतिवन चिचोलीतील वस्तु संग्रहालय अपूर्णच : पीएमओ कार्यालयाच्या आदेशालाही केराची टोपली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान कार्यालयाने आदेश दिल्यानंतरही शांतिवन चिचोलीचा प्रकल्प दोन वर्षे लोटल्यानंतरही अपूर्णच आहे. त्यामुळे पीएमओ कार्यालयाच्या आदेशालाही राज्य शासन व प्रशसनाकडून केराची टोपली दाखवण्यात आल्याचा प्रकार दिसून येत आहे. परिणामी भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेचा मुळगाभा ज्यावर सर्वप्रथम टाईप केला त्या टाईपराईटरसह बाबासाहेबांनी प्रत्यक्ष वापरलेल्या शेकडो ऐतिहासिक वस्तू पुन्हा एकदा नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

कळमेश्वर रोडवरील फेटरी जवळ चिचोली गावात शांतिवन चिचोली हा प्रकल्प आहे. येथे बुद्धिस्ट सेमिनरी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तु संग्रहालय उभारले जात आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मदतीने हा प्रकल्प उभारला जात आहे. संग्रहालयासह, सभागृह, मेडिटेशन सेंटर आदींच्या इमारती उभा झाल्या आहेत. परंतु अंतर्गत कामे बरीच शिल्लक आहे.

१४ एप्रिल २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात येणार होते. त्यापूर्वी तत्कालीन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि पीएमचे अधिकारी यांनी शआंतिवनाला भेट दिली होती. तेव्हा संग्रहालयासह बरीच कामे शिल्लक असल्याचे दिसून आले. त्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. प्रकल्पाची कामे सहा महिन्यात पूर्ण करा. त्यासाठी निधीची कुठलीही कमतरता पडू देऊ नका, त्यानंतरह पंतप्रधान याचे लोकार्पण करतील, असे स्पष्ट निर्देश पीएमओ कार्यालयाने दिले. यादृष्टीने केंद्रीय मंत्री अर्जून मेघवाल यांनी तीन वेळा शांतिवन चिचोलीला भेट देऊन पाहणी केली. आता दोन वर्षे लोटली आहेत. परंतु परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. प्रकल्पच नव्हे तर वस्तु संग्रहालयातील अंतर्गत कामही शिल्लक आहे.

रासायनिक प्रक्रिया होऊन लोटली चार वर्षेयेथील शेकडो वस्तू नष्ट होण्याचा धोका असल्याने त्यावर मध्यवर्ती संग्रहालयात रासायनिक प्रक्रिया करण्यात आली. त्याला आता चार वर्षे लोटली आहेत. या वस्तू शांतिवनातच एका खोलीत ठेवली आहेत. चार वर्षाचा कालावधी मोठा आहे. या वस्तू तातडीने संग्रहालयात योग्य पद्धतीने सुरक्षित ठेवली गेली नाही तर त्या पुन्हा नष्ट होण्याचा धोका आहे.

"वस्तु संग्रहालयाची इमारत पूर्ण झाली असली तरी अंतर्गत कामासाठी १४ कोटीची गरज आहे. शासनाला तसा प्रस्ताव पाठवलेला आहे. पीएमओ कार्यालयाने आदेश जारी केले. केंद्रीय मंत्र्यांनी तीन वेळा भेट दिली. राज्य शासनाने आश्वासन दिले परंतु दोन वर्षे लाेटली तरी संग्रहालयाचे काम तसेच आहे. संग्रहालय तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे, अन्यथा बाबासाहेबांच्या वस्तुंवर करण्यात आलेली रासायनिक प्रक्रिया व्यर्थ ठरेल."- संजय पाटील , कार्यवाहन शांतिवन चिचोली

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीnagpurनागपूर