शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

रेल्वे तिकिट ‘रिफंड’साठी आलेले शेकडो नागरिक गेले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 01:09 IST

तीन महिन्यापासून नागरिकांचे तिकिटांचे पैसे अडकून पडले आहेत. रेल्वेने रिफंड देणे सुरु करताच नागरिकांची गर्दी आरक्षण कार्यालयात होत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक प्रवास करण्याचे टाळत असून रिफंड घेण्यासाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांना परत करण्यासाठी रक्कम पुरत नसल्याचे चित्र आहे. गुरुवारी इतवारी आणि कामठी आरक्षण कार्यालयात रक्कमच नसल्यामुळे शेकडो नागरिकांवर आल्यापावली परत जाण्याची वेळ आली.

ठळक मुद्देरक्कम नव्हती उपलब्ध : तिकीट विक्री कमी अन् ‘रिफंड’मध्ये अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तीन महिन्यापासून नागरिकांचे तिकिटांचे पैसे अडकून पडले आहेत. रेल्वेने रिफंड देणे सुरु करताच नागरिकांची गर्दी आरक्षण कार्यालयात होत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक प्रवास करण्याचे टाळत असून रिफंड घेण्यासाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांना परत करण्यासाठी रक्कम पुरत नसल्याचे चित्र आहे. गुरुवारी इतवारी आणि कामठी आरक्षण कार्यालयात रक्कमच नसल्यामुळे शेकडो नागरिकांवर आल्यापावली परत जाण्याची वेळ आली.नागरिकांनी उन्हाळ्यात प्रवास करण्यासाठी मार्च महिन्यापूर्वीच तिकिटांचे आरक्षण केले होते. परंतु रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे रेल्वेगाड्या ठप्प झाल्या. दरम्यान रेल्वे प्रशासनाने तिकिटाचे बुकिंग केलेल्या प्रवाशांना तिकिटाची १०० टक्के रक्कम परत करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे तीन महिने प्रवाशांचे पैसे रेल्वे प्रशासनाकडे अडकले होते. मागील चार दिवसापासून रेल्वे प्रशासनाकडून तिकिटाची रक्कम परत करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक आपली रक्कम परत घेण्यासाठी आरक्षण कार्यालयात गर्दी करीत आहेत. रेल्वे प्रशासनाच्या वतीने राजधानी एक्स्प्रेस चालविण्यात येत आहेत. त्यातून आलेले पैसे तिकीट रद्द करणाऱ्या प्रवाशांना परत करण्याचे रेल्वे प्रशासनाने ठरविले होते. परंतु कोरोनामुळे बहुतांश नागरिक तिकिटांचे आरक्षण करीत नसल्यामुळे रेल्वेला बुकिंगच्या माध्यमातून खूप कमी रक्कम मिळत आहे. उलट तिकीट रद्द करणारे असंख्य प्रवासी येत असल्यामुळे त्यांना देण्यासाठी रक्कमच उरत नसल्याची स्थिती आहे. गुरुवारी सकाळी इतवारी आणि कामठी रेल्वेस्थानकावर आलेल्या प्रवाशांनाही हाच अनुभव आला. आरक्षण खिडक्यांवर रद्द केलेल्या तिकिटांची रक्कम देण्यासाठी रक्कमच उपलब्ध नव्हती. त्यामुळे शेकडो प्रवाशांना आल्यापावली परत जावे लागले.टप्प्याटप्प्याने पाठविण्यात येते रक्कम‘रेल्वेतर्फे चालविण्यात येणाऱ्या विशेष रेल्वेगाड्यांसाठी रेल्वे आरक्षण खिडक्या सुरु करण्यात आल्या. यातच प्रवाशांना रिफंड देणे सुरु करण्यात आले. परंतु बुकिंग कमी आणि रिफंड घेणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्यामुळे रक्कम पुरत नाही. रेल्वेतर्फे टप्प्याटप्प्याने रक्कम पाठविण्यात येत आहे. प्रवाशांना तिकीट रद्द करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी आरक्षण कार्यालयात गर्दी करू नये.’के. व्ही. रमणा, ‘सिनिअर डीसीएम’, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर विभाग

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर