शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

एचएसआरपी मुदत तीन दिवसांवर, राज्यात ८०% वाहनांवर अजूनही जुन्याच नंबरप्लेट

By सुमेध वाघमार | Updated: August 13, 2025 13:44 IST

दोन कोटी वाहनचालकांची धाकधूक वाढली : मुदतवाढ की दंड?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुन्या वाहनांसाठी 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट' (एचएसआरपी) बसवण्याची अंतिम मुदत १५ ऑगस्ट रोजी संपत आहे, तरीही राज्यातील ८० टक्के वाहनांवर अजूनही जुन्याच नंबरप्लेट आहेत. तब्बल दोन कोटींपेक्षा जास्त वाहनचालकांची धाकधूक वाढली आहे. १६ ऑगस्टपासून दंडात्मक कारवाई होणार की पुन्हा मुदतवाढ मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

२०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या राज्यातील सर्व वाहनांना 'एचएसआरपी' लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही मोहीम १ जानेवारी २०२५ पासून सुरू झाली असून, तीनदा मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु, सुरुवातीपासून 'एचएसआरपी' बसविण्याला संथ प्रतिसाद मिळाला. त्यामुळे सात महिन्यांचा कालावधी होऊनही १९.५७टक्के वाहनांना 'एचएसआरपी' बसविण्यात आलेली आहे. महत्त्वाचे म्हणजे, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी पुण्यात ११ व १२ ऑगस्ट अशी दोन दिवस राज्यभरातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत फिटमेंट सेंटर वाढविण्याची, 'एचएसआरपी' बसविण्यात वाहनचालकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या आणि जनजागृती करण्यावर भर देण्यात आला. परंतु, मुदत वाढीबाबत काहीच बोलले नसल्याची माहिती आहे. 

'एचएसआरपी' बसविण्यात सिंधुदुर्ग अव्वलराज्यात 'एचएसआरपी' बसवण्याच्या बाबतीत आतापर्यंत सिंधुदुर्ग (एमएच ०८) अव्वल आहे, जिथे ३३ टक्के वाहनांनी ही प्लेट बसवली आहे. त्यानंतर वर्धा (एमएच ३२), नागपूर ग्रामीण (एमएच ४०), सातारा (एमएच ११) आणि गडचिरोली (एमएच३३) या आरटीओ कार्यालयांचा क्रमांक लागतो.

दोन कोटी ५४ लाख ९० हजार वाहनेराज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वीची दोन कोटी ५४ लाख ९० हजार १५९ जुनी वाहने आहेत. यातील केवळ ४९ लाख ८९ हजार ६५६ वाहनांना 'एचएसआरपी' बसविण्यात आली आहे. पुढील तीन दिवसांत उर्वरित २ कोटी ५ लाख ५०३ वाहनांना म्हणजे जवळपास ८० टक्के अजूनही या प्रक्रियेपासून दूर आहेत. अवघ्या तीन दिवसांत उर्वरित वाहनांना नंबरप्लेट बसवणे अशक्य असल्याने, वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

टॅग्स :nagpurनागपूर