शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता कशी सुधारेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 11:46 IST

नागपूर जिल्हा परिषदेमध्ये अशा ३८७ शाळा आहेत. जि.प.च्या शाळेतील विद्यार्थ्यांचा पट कमी होण्याची इतरही कारणे असली तरी या शाळांवर नियंत्रण ठेवणारी पर्यवेक्षीय यंत्रणा रामभरोसे असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देपर्यवेक्षीय यंत्रणा ‘रामभरोसे’३५० च्यावर शाळांचा पट २० पेक्षा कमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकारने २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा मानस बाळगला आहे. नागपूर जिल्हा परिषदेमध्ये अशा ३८७ शाळा आहेत. जि.प.च्या शाळेतील विद्यार्थ्यांचा पट कमी होण्याची इतरही कारणे असली तरी या शाळांवर नियंत्रण ठेवणारी पर्यवेक्षीय यंत्रणा रामभरोसे असल्याचे चित्र आहे. कारण जि.प.च्या शिक्षण विभागात केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, उपशिक्षणाधिकारी पदापर्यंतची अर्ध्याधिक पदे गेल्या काही वर्षांपासून रिक्त आहेत.शैक्षणिक गुणवत्ता सुधारावी यासाठी सदैव नवनवीन उपक्रम राबविण्याच्या घोषणा शासनाकडून होत असतात. ते उपक्रम यशस्वीपणे राबविल्या जावे यासाठी आटापिटा पण केल्या जातो. परंतु या उपक्रमाकरिता मार्गदर्शन व प्रभावी पर्यवेक्षण करणारी यंत्रणाच जि.प.च्या शिक्षण विभागात नाही. केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी अशाप्रकारची जिल्हा स्तरावर शिक्षण विभागाची फार मोठी पर्यवेक्षीय यंत्रणेची शृंखला आहे. परंतु दुर्दैवाने या शृंखलेतील अनेक पदे मागील अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी कनिष्ठ पदावरील कर्मचाऱ्यांकडे सदर पदाचे अतिरिक्त कार्यभार आहेत. एका पं.स मध्ये तर शिक्षण विस्तार अधिकारीचा कार्यभार शिक्षकांकडे आहेत. जि.प.मध्ये तर शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडे उपशिक्षणाधिकारी पदाचे कार्यभार आहेत. या सर्व बाबींचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असतो. असे असतानाही जि.प.प्रशासन असो की राज्य शासन यांचे धोरण मात्र याबाबत बेपर्वाईचे आहे. परिणामी विद्यार्थ्यांचा पट घसरतो आहे. अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढते आहे. शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, असे भयावह चित्र जि.प.च्या शाळांचे आहे.रिक्त पदे त्वरित भराविद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता विकासाच्या दृष्टीने एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यवेक्षकयंत्रणेतील पदे रिक्त असणे विद्यार्थी हिताचे दृष्टीने योग्य नाही. पर्यवेक्षीय यंत्रणेतील ही सर्व रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी. याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे वतीने राज्य शासन अथवा जि. प. प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा अध्यक्ष लीलाधर ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र