शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कसा शिकवणार धडा? गुन्हेगारांची धिंड काढणारे पोलीस दहशतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 12:32 IST

कायद्याचा बडगा उगारण्याची मुभा असलेले पोलीसच धास्तीत येत असतील तर गुन्हेगारांना वठणीवर कोण आणेल, असा सामान्यांचा प्रश्न आहे.

नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : त्यांची एक टोळी आहे. त्यांचे ‘भाई’ दारू, गांजा, हेरॉईन, एमडी अशा सर्वच प्रकारच्या व्यसनात बुडाले आहेत. व्यसनपूर्तीसाठी ते चाकू, तलवारी, गुप्ती घेऊन कुणावरही हल्ला करतात आणि करवून घेतात. कुणालाही लुटतात. शहरातील वर्दळीच्या भागात हैदोस घालतात. खंडणी वसुलीही होते. त्यांचे हे सर्व बिनबोभाट सुरू आहे. ते कुणाला घाबरत नाहीत. मात्र, त्यांना वठणीवर आणायला गेलेले पोलीस आता घाबरू लागले आहेत. होय, सर्वत्र चर्चेचे रान पेटविणाऱ्या धिंड प्रकरणाने सध्या नागपूर पोलिसांना चांगलीच धडकी भरवली आहे.प्रकरण जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे. बुधवारी रात्री बिअर बारमध्ये अचानक चाकू, तलवार, गुप्ती असे घातक शस्त्र घेऊन सहा गुंड शिरले. त्यांनी नंग्या तलवारी दाखवून ग्राहकांनाच नव्हे तर बार व्यवस्थापकालाही धमकावले. बारच्या गल्ल्यासोबत दारूच्या बाटल्या लुटल्या. काहींनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर घातक शस्त्र उगारले. सुदैवाने शस्त्र कुणाला लागले नाही. अवघ्या पाच मिनिटात बार लुटून आरोपी फरार झाले. ते नाराकडे गेले. तेथे यथेच्छ दारू पिले आणि मनसोक्त जेवून पुन्हा नव्या गुन्ह्याच्या तयारीत लागले. दरम्यान, भर वस्तीतील बार सिनेस्टाईल लुटला गेल्यामुळे पोलिसांची विविध पथके रात्रभर आरोपींचा शोध घेऊ लागली. गुरुवारी पहाटेच्या वेळी सहाही आरोपी पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी त्यांना आहे त्या अर्धनग्न अवस्थेत बाजारपेठ दाखवली. काही तासांपूर्वी नागरिकांना शस्त्र दाखवून, त्यांच्या जानमालाला धोका निर्माण करणाºया आणि दहशत पसरविणाºया गुंडांची नशा उतरली होती. गुंडांची ही अवस्था सर्वसामान्य नागरिकांना आश्वस्तच नव्हे आनंदित करणारी होती. मात्र गुंडांच्या पाठिराख्यांनी त्यांच्या वयाचे अस्त्र पोलिसांवर उगारून त्यांना थंड करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. या पार्श्वभूमीवर, अल्पवयीन मुलांची धिंड काढण्याचा कांगावा करून पोलिसांवर प्रकरण उलटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.विशेष म्हणजे, बार लुटणारे अल्पवयीन असले तरी त्यांचा यापूर्वीचाही गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. खापरखेडा, यशोधरानगर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. आधीच्या गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना सुधारगृहात पाठवले होते. त्यांच्या वर्तनात सुधारणा व्हावी हा त्यामागचा उद्देश होता. दोन आठवड्यांपूर्वीच ते सुधारगृहातून बाहेर आले आणि पुन्हा गुन्हे करू लागले. गुरुवारी सकाळी पोलिसांनी त्यांची वरात काढल्यानंतर काहीजण पडद्याआडून पोलिसांवर मानवाधिकार नामक अस्त्र उगारून त्यांची कोंडी करण्याचे प्रयत्न करीत आहेत.वय लहान, गुन्हे मोठेनागपुरात बालगुन्हेगारांची संख्या मोठी आहे. प्रत्येक दहाव्या गुन्ह्यात एक ना एक अल्पवयीन आरोपी असतोच. गेल्या आठवड्यात अवघ्या सोळा वर्षाच्या एका आरोपीने धडधाकट मात्र निरपराध तरुणाची गळा कापून हत्या केली. मृत तरुण रोजगाराच्या शोधात आपले कुटुंब सोडून बिहारमधून नागपुरात आला होता. येथे मिळेल ते काम करून आपला खर्च भागवीत होता. तो त्यांच्या कुटुंबीयांचीही होईल ती मदत करत होता. टायगर नामक हा तरुण काम आटोपून रात्रीच्या वेळी घराकडे जात असताना व्यसनाधीन १६ वर्षीय आरोपीने त्याला शंभर रुपये मागितले आणि दिले नाही म्हणून त्याच्या गळ्यावर कैचीचे घाव घालून त्याची निर्घृण हत्या केली. नागपुरात हे पहिले प्रकरण नाही. अपहरण, बलात्कार, दरोडे, खून, खुनाचे प्रयत्न, हाणामाºया अशा गंभीर गुन्ह्यात गेल्यावर्षी २०० पेक्षा जास्त अल्पवयीन आरोपींचा समावेश होता, हे येथे विशेष!अशा गुन्हेगारांना धडा शिकवायलाच हवा. कायद्याचा बडगा उगारण्याची मुभा असलेले पोलीसच धास्तीत येत असतील तर गुन्हेगारांना वठणीवर कोण आणेल, असा सामान्यांचा प्रश्न आहे. 

 

टॅग्स :Policeपोलिस