शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

मी बंडखोरांचा नेता कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 20:50 IST

ज्या कारणांचा हवाला देत मला पक्षातून निष्कासित करण्यात आले याचा आधी पुरावा द्या. मी कोणत्याही काँग्रेस बंडखोर उमेदवाराचा प्रचार केला नाही. त्यामुळे त्यांचा नेता होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा पलटवार माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी रविवारी केला.

ठळक मुद्दे सतीश चतुर्वेदींचा पलटवार : काँग्रेसचा गड उद्ध्वस्त करण्याचा डाव

लोकमत न्युज नेटवर्क  

नागपूर :ज्या कारणांचा हवाला देत मला पक्षातून निष्कासित करण्यात आले याचा आधी पुरावा द्या. मी कोणत्याही काँग्रेस बंडखोर उमेदवाराचा प्रचार केला नाही. त्यामुळे त्यांचा नेता होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा पलटवार माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी रविवारी केला.प्रदेश कॉँग्रेसने दोन दिवसांपूर्वी पक्षातून निष्कासित केल्यानंतर चतुर्वेदी यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. नागपूर व मुंबईतील मूठभर नेत्यांनी व्यक्तिगत स्वार्थ व जातीयवादी शक्तींना अधिक बळ देण्याच्या उद्देशाने माझ्याविरुद्ध षड्यंत्र रचले आहे. या वादात काँग्रेसचा गड उद्ध्वस्त होतो आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून पक्षातून गेलेले नेते आणि कार्यकर्त्यांना स्वगृही आणण्याचे प्रयत्न होत असताना प्रदेश कॉँग्रेसने माझ्यावर कारवाई करून नेमके काय साधले, असा सवालही चतुर्वेदी यांनी केला.  पक्षातून निष्कासित करण्यात आल्याचे प्रदेश काँग्रेसचे कुठलेही पत्र मिळाले नाही. त्यामुळे मी ५२ वर्षांपासून काँग्रेसमध्ये आहे आणि पुढेही राहील, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.नागपुरात यापूर्वीही प्रतिस्पर्धी आणि बंडखोरांना अनेक नेत्यांनी बळ दिले आहे. त्यामुळेच पश्चिम, पूर्व आणि उत्तर नागपूरसारखे काँग्रेसचे मजबूत किल्ले निवडणुकात ढासळले. त्यावेळी कुणी कुणाला मदत केली, याची सर्वांना कल्पना आहे. ज्यांना पक्षांकडून काहीच नको आहे, त्यांना पक्षातून काढून काहीही उपयोग होणार नाही. मी बंडखोरांचे समर्थन केल्याची कोेणतीही नोटीस अजूनही प्रदेश काँग्रेसने पाठविलेली नाही. त्यामुळे एकहाती कारभार असलेल्या शहर काँग्रेसच्या अहवालावर मला पक्षातून निष्कासित करण्यात आल्याबद्दल पक्षश्रेष्ठींकडे नैसर्गिक न्याय मागणार असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. महापालिकेचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, माजी आमदार अशोक धवड यावेळी उपस्थित होते.

 

टॅग्स :nagpurनागपूरcongressकाँग्रेस