शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

आर्थिक मंदीच्या नियंत्रणाचा ‘समन्वय’ कसा साधणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 20:26 IST

सद्यस्थितीत देश आर्थिक मंदीच्या सावटाखाली असून या पार्श्वभूमीवर शनिवार ७ सप्टेंबरपासून राजस्थानमधील पुष्कर येथे संघ तसेच भाजपाची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे७ सप्टेंबरपासून संघ-भाजपा समन्वय बैठक : संघ परिवारातील सर्व संघटनांचा समावेश

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सद्यस्थितीत देश आर्थिक मंदीच्या सावटाखाली असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील काही संघटनांकडून केंद्र शासनाबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवार ७ सप्टेंबरपासून राजस्थानमधील पुष्कर येथे संघ तसेच भाजपाची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत संघ परिवारातील सर्व संघटना समाविष्ट होणार आहेत. या बैठकीत आतापर्यंतच्या कामगिरीचा आढावा घेण्यासोबतच पुढील नियोजनावरदेखील सखोल मंथन होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरवर्षी नियमितपणे तीन ते चार वेळा अशी बैठक आयोजित करण्यात येते. तरी यंदा जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविणे, ‘एनआरसी’ मुद्दा व त्यातच मंदीवरुन तापलेले राजकारण यामुळे या बैठकीला महत्त्व आले आहे.या बैठकीत संघाशी जुळलेल्या विश्व हिंदू परिषद, स्वदेशी जागरण मंच, अखिल भारतीय शिक्षण मंडळ,सेवा भारती, भारतीय मजदूर संघ यांच्यासह एकूण ३६ संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होतील. शिवाय भाजपाचेदेखील प्रतिनिधी राहतील. ७ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या या बैठकीला सरसंघचालक डॉ.मोहन भागवत, सरकार्यवाह भय्याजी जोशी, सहसरकार्यवाह डॉ.कृष्णगोपाल, दत्तात्रेय होसबळे यांच्यासह भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा, राष्ट्रीय महामंत्री बी. एल. संतोष यांच्यासह काही केंद्रीय मंत्रीदेखील उपस्थित राहतील. या बैठकीत प्रामुख्याने सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, कृषी, पर्यावरण, जलसंवर्धन या मुद्यांवर मंथन होईल. शिवाय देशाच्या आर्थिक स्थितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत संघाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी या स्थितीवर आपली बाजू मांडतील. शिवाय केंद्र शासनाशी समन्वय आणखी प्रभावी पद्धतीने कसा वाढीस लागेल यावरदेखील चर्चा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.उद्योगांमधील मंदीवरून ‘भामसं’ आक्रमकऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदीचा फटका अर्थव्यवस्थेला बसत असून उद्योगांमध्ये मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित भारतीय मजदूर संघाने या मुद्यावरून केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. केंद्राची आर्थिक धोरणं सपशेल अपयशी ठरली असून खासगीकरणाचा आग्रह भोवतो आहे. देशातील खासगीकरण बंद करुन ‘नीती’ आयोगाचे पुनर्गठन करण्याची मागणी ‘भामसं’तर्फे करण्यात आली आहे. मागील महिन्यात दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत यावर चर्चादेखील झाली होती.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपा