शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

नागपुरात ऐतिहासिक निर्णय; खिवारी-गाेंधळी समाजाची जातपंचायत बरखास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 20:55 IST

Nagpur News विदर्भ तसेच छत्तीसगडच्या भागात राहणाऱ्या खिवारी-गाेंधळी समाजाने ही जातपंचायतीची प्रथाच बरखास्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

 

नागपूर : देशातील अनेक समाजांमध्ये न्यायनिवाडा करण्यासाठी जातपंचायतीची प्रथा आजही कायम आहे. कमजाेर वर्गासाठी ती अमानुष वाटत असली तरी माेठ्यांसाठी प्रतिष्ठेची वाटते. मात्र, विदर्भ तसेच छत्तीसगडच्या भागात राहणाऱ्या खिवारी-गाेंधळी समाजाने ही जातपंचायतीची प्रथाच बरखास्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. अलीकडच्या काळातील हे एकमेव उदाहरण असेल. नागपुरात ही घाेषणा करण्यात आली. (Historic decision in Nagpur; Dismissal of caste panchayat of Khiwari-Gandhali community)

शहरातील श्री गुरुदेव सेवाश्रम येथे बहिष्कृत हितकारिणी परिषदेचे आयाेजन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते रमेश धुमाळ आणि गणेश ओगले-उघडे यांच्या पुढाकारातून ही परिषद घेण्यात आली. विदर्भ आणि छत्तीसगड राज्यातील सातवाडीच्या पंचप्रमुखांसह यापूर्वी जातपंचायतीने ज्यांना बहिष्कृत केले असे लाेक आणि खिवारी-गाेंधळी समाजातील शेकडाे लाेक या परिषदेमध्ये उपस्थित हाेते. ही कदाचित या समाजाची शेवटची महापंचायत हाेती. याप्रसंगी भटके विमुक्त समाजातील ज्येष्ठ विचारवंत प्रा. वासुदेव डहाके, सामाजिक कार्यकर्ते प्रा. माेहन चव्हाण, मिलिंद साेनुने, उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय आयुक्त माेहन वर्धे, ॲड. मेघा बुरंगे, संविधान फाऊंडेशनचे प्रा. महेंद्रकुमार मेश्राम, दिगांबर गाेंडाणे, अतुल खाेब्रागडे आदी प्रामुख्याने उपस्थित हाेते.

मेढकरी, महाजन, पाटील, गाेते ही पंचप्रमुखांची परंपरा यानंतर कायमची बंद, मानाचा टीळा लावण्याची प्रथा ऐच्छिक असेल व यापुढे समाजाची काेणतीही जातपंचायत भरणार नाही, अशी घाेषणा एकमताने करण्यात आली. अनेकदा जातपंचायतीच्या निर्णयामुळे समाजातील उपेक्षित लाेकांनाच बहिष्कृत केले जाते, त्यांची राेटीपाणी बंद करून अनेक प्रकारचे अत्याचार केले जातात, आर्थिक लूट केली जाते. बहिष्कृतपणाचे चटके साेसलेल्या कुटुंबातील तरुणी जयश्रीने मांडलेल्या व्यथा बाेलक्या ठरल्या. यापुढे जातपंचायतीमुळे काेणत्याही कुटुंबाला अमानुष वेदना सहन कराव्या लागणार नाही, या तिच्या भावनेने सभागृहातून टाळ्यांची दाद मिळाली.

टॅग्स :Socialसामाजिक