शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

नागपुरात ऐतिहासिक निर्णय; खिवारी-गाेंधळी समाजाची जातपंचायत बरखास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 20:55 IST

Nagpur News विदर्भ तसेच छत्तीसगडच्या भागात राहणाऱ्या खिवारी-गाेंधळी समाजाने ही जातपंचायतीची प्रथाच बरखास्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

 

नागपूर : देशातील अनेक समाजांमध्ये न्यायनिवाडा करण्यासाठी जातपंचायतीची प्रथा आजही कायम आहे. कमजाेर वर्गासाठी ती अमानुष वाटत असली तरी माेठ्यांसाठी प्रतिष्ठेची वाटते. मात्र, विदर्भ तसेच छत्तीसगडच्या भागात राहणाऱ्या खिवारी-गाेंधळी समाजाने ही जातपंचायतीची प्रथाच बरखास्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. अलीकडच्या काळातील हे एकमेव उदाहरण असेल. नागपुरात ही घाेषणा करण्यात आली. (Historic decision in Nagpur; Dismissal of caste panchayat of Khiwari-Gandhali community)

शहरातील श्री गुरुदेव सेवाश्रम येथे बहिष्कृत हितकारिणी परिषदेचे आयाेजन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते रमेश धुमाळ आणि गणेश ओगले-उघडे यांच्या पुढाकारातून ही परिषद घेण्यात आली. विदर्भ आणि छत्तीसगड राज्यातील सातवाडीच्या पंचप्रमुखांसह यापूर्वी जातपंचायतीने ज्यांना बहिष्कृत केले असे लाेक आणि खिवारी-गाेंधळी समाजातील शेकडाे लाेक या परिषदेमध्ये उपस्थित हाेते. ही कदाचित या समाजाची शेवटची महापंचायत हाेती. याप्रसंगी भटके विमुक्त समाजातील ज्येष्ठ विचारवंत प्रा. वासुदेव डहाके, सामाजिक कार्यकर्ते प्रा. माेहन चव्हाण, मिलिंद साेनुने, उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय आयुक्त माेहन वर्धे, ॲड. मेघा बुरंगे, संविधान फाऊंडेशनचे प्रा. महेंद्रकुमार मेश्राम, दिगांबर गाेंडाणे, अतुल खाेब्रागडे आदी प्रामुख्याने उपस्थित हाेते.

मेढकरी, महाजन, पाटील, गाेते ही पंचप्रमुखांची परंपरा यानंतर कायमची बंद, मानाचा टीळा लावण्याची प्रथा ऐच्छिक असेल व यापुढे समाजाची काेणतीही जातपंचायत भरणार नाही, अशी घाेषणा एकमताने करण्यात आली. अनेकदा जातपंचायतीच्या निर्णयामुळे समाजातील उपेक्षित लाेकांनाच बहिष्कृत केले जाते, त्यांची राेटीपाणी बंद करून अनेक प्रकारचे अत्याचार केले जातात, आर्थिक लूट केली जाते. बहिष्कृतपणाचे चटके साेसलेल्या कुटुंबातील तरुणी जयश्रीने मांडलेल्या व्यथा बाेलक्या ठरल्या. यापुढे जातपंचायतीमुळे काेणत्याही कुटुंबाला अमानुष वेदना सहन कराव्या लागणार नाही, या तिच्या भावनेने सभागृहातून टाळ्यांची दाद मिळाली.

टॅग्स :Socialसामाजिक