शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

नागपुरात सर्वाधिक अपघात कार्यालय सुरू व सुटण्याच्या वेळेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 10:51 IST

नागपुरात कार्यालय सुरू होणे व सुटण्याच्या कालावधीतच सर्वात जास्त अपघात होत असल्याची बाब आकडेवारीवरून समोर आली आहे.

‘ऑफिस’ची घाई, जीवावर येई: ‘पार्टीटाइम’ची वेळदेखील धोकादायकचयोगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील इतर मोठ्या शहरांप्रमाणे नागपुरातदेखील कार्यालये सुरू होण्याच्या तसेच सुटण्याच्या वेळेत रस्त्यांवर जास्त गर्दी दिसून येते. कार्यालयाला पोहोचण्यासाठी किंवा घरी लवकर जाण्यासाठी अनेकदा वाहनांची गती वाढते व हाच वेग मृत्यूला आमंत्रण देणारा ठरतो. नागपुरात कार्यालय सुरू होणे व सुटण्याच्या कालावधीतच सर्वात जास्त अपघात होत असल्याची बाब आकडेवारीवरून समोर आली आहे. २०१८ मध्ये शहरात झालेल्या अपघातांपैकी ३५ टक्क्यांहून अधिक अपघात हे सकाळी ९ ते १२ व सायंकाळी ६ ते ९ या कालावधीत झाले आहेत.‘एनसीआरबी’ने (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) जारी केलेल्या २०१५ ते २०१८ या चार वर्षांच्या आकडेवारीकडे नजर टाकल्यावर संबंधित बाब समोर आली आहे. या अहवालात २४ तासांना एकूण आठ भागात विभागण्यात आले व दर तीन तासानिहाय झालेल्या अपघाताची आकडेवारी जाहीर करण्यात आली. नागपूर शहरातील बहुतांश सरकारी आस्थापना, बँका, खासगी कार्यालये, महाविद्यालये सकाळी ९ ते १२ या वेळेतच सुरू होतात, तर सायंकाळी ६ ते रात्री ९ या कालावधीत सुटतात. चारही वर्षांच्या आकडेवारीत सर्वाधिक अपघात याच वेळेत झाल्याची बाब स्पष्टपणे दिसून येत आहे. २०१८ सालच्या आकडेवारीनुसार त्या वर्षात नागपुरात १३४० अपघात झाले. यात २८४ लोकांना जीव गमवावा लागला. यातील सर्वाधिक २९१ अपघात हे सायंकाळी ६ ते रात्री ९ या कालावधीत झाले, तर सकाळी ९ ते १२ या कालावधीत १८४ अपघात झाले. २०१७ साली एकूण १४२१ अपघात झाले होते व त्यातील ३५.४७ टक्के अपघात हे संबंधित कालावधीतील होते. सकाळी ९ ते १२ या कालावधीत २६० व सायंकाळी ६ ते रात्री ९ या कालावधीत २२९ अपघात झाले होते. २०१५ व २०१६ साली कार्यालये सुरू होणे व सुटणे या कालावधीत अनुक्रमे २८.४९ टक्के व ३१.३२ टक्के अपघात झाले होते.

अपघातांसंदर्भात जनजागृतीचे गडकरींचे निर्देशशहरात होणाऱ्या अपघातांबाबत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील चिंता व्यक्त केली आहे. ‘लोकमत’नेदेखील यासंदर्भात प्रकाश टाकला. २०१५ पासून अपघातांची संख्या दरवर्षी कमी होत आहे. परंतु तरीदेखील अपघातमुक्त शहर व्हावे यासाठी गडकरी यांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहे. यासंदर्भात त्यांनी विशेष बैठक घेतली व अपघात कमी व्हावे यासाठी जनजागृती मोहीम राबविण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

उपराजधानीत ‘पार्टी’ कल्चर वाढलेगेल्या काही वर्षांपासून नागपुरात ‘पार्टी कल्चर’ वाढीस लागले आहे. साधारणत: शहराबाहेरील हॉटेल्स, ढाबे, पब्स इत्यादी ठिकाणी ‘पार्टी’ करण्यावर अनेकांचा भर असतोे. अनेक वेळा ‘पार्टी’मध्ये मद्यप्राशन झाल्यास त्याचा परिणाम वाहन चालविण्यावर होतो. कधी वेगाच्या अतिउत्साहात, तर कधी नियंत्रण सुटल्यामुळे अपघाताला आमंत्रण दिले जाते. रात्री ९ ते १२ या वेळेत २०१५ मध्ये २२३, २०१६ मध्ये २२६, २०१७ मध्ये २०२ तर २०१८ मध्ये १६५ अपघात झाले. यातील अनेक अपघात जीवघेणे ठरले.

टॅग्स :Accidentअपघात