शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नागपुरात सर्वाधिक अपघात कार्यालय सुरू व सुटण्याच्या वेळेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 10:51 IST

नागपुरात कार्यालय सुरू होणे व सुटण्याच्या कालावधीतच सर्वात जास्त अपघात होत असल्याची बाब आकडेवारीवरून समोर आली आहे.

‘ऑफिस’ची घाई, जीवावर येई: ‘पार्टीटाइम’ची वेळदेखील धोकादायकचयोगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील इतर मोठ्या शहरांप्रमाणे नागपुरातदेखील कार्यालये सुरू होण्याच्या तसेच सुटण्याच्या वेळेत रस्त्यांवर जास्त गर्दी दिसून येते. कार्यालयाला पोहोचण्यासाठी किंवा घरी लवकर जाण्यासाठी अनेकदा वाहनांची गती वाढते व हाच वेग मृत्यूला आमंत्रण देणारा ठरतो. नागपुरात कार्यालय सुरू होणे व सुटण्याच्या कालावधीतच सर्वात जास्त अपघात होत असल्याची बाब आकडेवारीवरून समोर आली आहे. २०१८ मध्ये शहरात झालेल्या अपघातांपैकी ३५ टक्क्यांहून अधिक अपघात हे सकाळी ९ ते १२ व सायंकाळी ६ ते ९ या कालावधीत झाले आहेत.‘एनसीआरबी’ने (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) जारी केलेल्या २०१५ ते २०१८ या चार वर्षांच्या आकडेवारीकडे नजर टाकल्यावर संबंधित बाब समोर आली आहे. या अहवालात २४ तासांना एकूण आठ भागात विभागण्यात आले व दर तीन तासानिहाय झालेल्या अपघाताची आकडेवारी जाहीर करण्यात आली. नागपूर शहरातील बहुतांश सरकारी आस्थापना, बँका, खासगी कार्यालये, महाविद्यालये सकाळी ९ ते १२ या वेळेतच सुरू होतात, तर सायंकाळी ६ ते रात्री ९ या कालावधीत सुटतात. चारही वर्षांच्या आकडेवारीत सर्वाधिक अपघात याच वेळेत झाल्याची बाब स्पष्टपणे दिसून येत आहे. २०१८ सालच्या आकडेवारीनुसार त्या वर्षात नागपुरात १३४० अपघात झाले. यात २८४ लोकांना जीव गमवावा लागला. यातील सर्वाधिक २९१ अपघात हे सायंकाळी ६ ते रात्री ९ या कालावधीत झाले, तर सकाळी ९ ते १२ या कालावधीत १८४ अपघात झाले. २०१७ साली एकूण १४२१ अपघात झाले होते व त्यातील ३५.४७ टक्के अपघात हे संबंधित कालावधीतील होते. सकाळी ९ ते १२ या कालावधीत २६० व सायंकाळी ६ ते रात्री ९ या कालावधीत २२९ अपघात झाले होते. २०१५ व २०१६ साली कार्यालये सुरू होणे व सुटणे या कालावधीत अनुक्रमे २८.४९ टक्के व ३१.३२ टक्के अपघात झाले होते.

अपघातांसंदर्भात जनजागृतीचे गडकरींचे निर्देशशहरात होणाऱ्या अपघातांबाबत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील चिंता व्यक्त केली आहे. ‘लोकमत’नेदेखील यासंदर्भात प्रकाश टाकला. २०१५ पासून अपघातांची संख्या दरवर्षी कमी होत आहे. परंतु तरीदेखील अपघातमुक्त शहर व्हावे यासाठी गडकरी यांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहे. यासंदर्भात त्यांनी विशेष बैठक घेतली व अपघात कमी व्हावे यासाठी जनजागृती मोहीम राबविण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

उपराजधानीत ‘पार्टी’ कल्चर वाढलेगेल्या काही वर्षांपासून नागपुरात ‘पार्टी कल्चर’ वाढीस लागले आहे. साधारणत: शहराबाहेरील हॉटेल्स, ढाबे, पब्स इत्यादी ठिकाणी ‘पार्टी’ करण्यावर अनेकांचा भर असतोे. अनेक वेळा ‘पार्टी’मध्ये मद्यप्राशन झाल्यास त्याचा परिणाम वाहन चालविण्यावर होतो. कधी वेगाच्या अतिउत्साहात, तर कधी नियंत्रण सुटल्यामुळे अपघाताला आमंत्रण दिले जाते. रात्री ९ ते १२ या वेळेत २०१५ मध्ये २२३, २०१६ मध्ये २२६, २०१७ मध्ये २०२ तर २०१८ मध्ये १६५ अपघात झाले. यातील अनेक अपघात जीवघेणे ठरले.

टॅग्स :Accidentअपघात