शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

नागपुरात सर्वाधिक अपघात कार्यालय सुरू व सुटण्याच्या वेळेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 10:51 IST

नागपुरात कार्यालय सुरू होणे व सुटण्याच्या कालावधीतच सर्वात जास्त अपघात होत असल्याची बाब आकडेवारीवरून समोर आली आहे.

‘ऑफिस’ची घाई, जीवावर येई: ‘पार्टीटाइम’ची वेळदेखील धोकादायकचयोगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील इतर मोठ्या शहरांप्रमाणे नागपुरातदेखील कार्यालये सुरू होण्याच्या तसेच सुटण्याच्या वेळेत रस्त्यांवर जास्त गर्दी दिसून येते. कार्यालयाला पोहोचण्यासाठी किंवा घरी लवकर जाण्यासाठी अनेकदा वाहनांची गती वाढते व हाच वेग मृत्यूला आमंत्रण देणारा ठरतो. नागपुरात कार्यालय सुरू होणे व सुटण्याच्या कालावधीतच सर्वात जास्त अपघात होत असल्याची बाब आकडेवारीवरून समोर आली आहे. २०१८ मध्ये शहरात झालेल्या अपघातांपैकी ३५ टक्क्यांहून अधिक अपघात हे सकाळी ९ ते १२ व सायंकाळी ६ ते ९ या कालावधीत झाले आहेत.‘एनसीआरबी’ने (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) जारी केलेल्या २०१५ ते २०१८ या चार वर्षांच्या आकडेवारीकडे नजर टाकल्यावर संबंधित बाब समोर आली आहे. या अहवालात २४ तासांना एकूण आठ भागात विभागण्यात आले व दर तीन तासानिहाय झालेल्या अपघाताची आकडेवारी जाहीर करण्यात आली. नागपूर शहरातील बहुतांश सरकारी आस्थापना, बँका, खासगी कार्यालये, महाविद्यालये सकाळी ९ ते १२ या वेळेतच सुरू होतात, तर सायंकाळी ६ ते रात्री ९ या कालावधीत सुटतात. चारही वर्षांच्या आकडेवारीत सर्वाधिक अपघात याच वेळेत झाल्याची बाब स्पष्टपणे दिसून येत आहे. २०१८ सालच्या आकडेवारीनुसार त्या वर्षात नागपुरात १३४० अपघात झाले. यात २८४ लोकांना जीव गमवावा लागला. यातील सर्वाधिक २९१ अपघात हे सायंकाळी ६ ते रात्री ९ या कालावधीत झाले, तर सकाळी ९ ते १२ या कालावधीत १८४ अपघात झाले. २०१७ साली एकूण १४२१ अपघात झाले होते व त्यातील ३५.४७ टक्के अपघात हे संबंधित कालावधीतील होते. सकाळी ९ ते १२ या कालावधीत २६० व सायंकाळी ६ ते रात्री ९ या कालावधीत २२९ अपघात झाले होते. २०१५ व २०१६ साली कार्यालये सुरू होणे व सुटणे या कालावधीत अनुक्रमे २८.४९ टक्के व ३१.३२ टक्के अपघात झाले होते.

अपघातांसंदर्भात जनजागृतीचे गडकरींचे निर्देशशहरात होणाऱ्या अपघातांबाबत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील चिंता व्यक्त केली आहे. ‘लोकमत’नेदेखील यासंदर्भात प्रकाश टाकला. २०१५ पासून अपघातांची संख्या दरवर्षी कमी होत आहे. परंतु तरीदेखील अपघातमुक्त शहर व्हावे यासाठी गडकरी यांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहे. यासंदर्भात त्यांनी विशेष बैठक घेतली व अपघात कमी व्हावे यासाठी जनजागृती मोहीम राबविण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

उपराजधानीत ‘पार्टी’ कल्चर वाढलेगेल्या काही वर्षांपासून नागपुरात ‘पार्टी कल्चर’ वाढीस लागले आहे. साधारणत: शहराबाहेरील हॉटेल्स, ढाबे, पब्स इत्यादी ठिकाणी ‘पार्टी’ करण्यावर अनेकांचा भर असतोे. अनेक वेळा ‘पार्टी’मध्ये मद्यप्राशन झाल्यास त्याचा परिणाम वाहन चालविण्यावर होतो. कधी वेगाच्या अतिउत्साहात, तर कधी नियंत्रण सुटल्यामुळे अपघाताला आमंत्रण दिले जाते. रात्री ९ ते १२ या वेळेत २०१५ मध्ये २२३, २०१६ मध्ये २२६, २०१७ मध्ये २०२ तर २०१८ मध्ये १६५ अपघात झाले. यातील अनेक अपघात जीवघेणे ठरले.

टॅग्स :Accidentअपघात