शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

हायकोर्टाचा आदेश : नागपुरातील रोडवरील धोकादायक खड्ड्यांची पाहणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 8:00 PM

शहरातील रोडवरील धोकादायक खड्ड्यांची व वाहतुकीस अडथळा ठरत असलेल्या ठिकाणांची पाहणी करून दोन आठवड्यात अहवाल सादर करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी वाहतूक पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांना दिला.

ठळक मुद्देअहवाल सादर करण्यासाठी दोन आठवड्याची मुदत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील रोडवरील धोकादायक खड्ड्यांची व वाहतुकीस अडथळा ठरत असलेल्या ठिकाणांची पाहणी करून दोन आठवड्यात अहवाल सादर करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी वाहतूक पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांना दिला. तसेच, या कार्याकरिता कनिष्ठ अधिकारी व अशासकीय संस्थांचे सहकार्य घेण्याची सूचना केली.रोडवरील खड्डे नागरिकांसाठी जीवघेणे ठरत असल्यामुळे उच्च न्यायालयाने यासंदर्भात स्वत:च फौजदारी याचिका दाखल करून घेतली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व मिलिंद जाधव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने वरील आदेश देण्यापूर्वी रोडवरील धोकादायक खड्डे व वाहतुकीस अडथळा ठरत असलेल्या आरयूबींवर (रोड अंडर ब्रिज) चिंता व्यक्त केली. कामठी रोड, उप्पलवाडी व नरेंद्रनगर येथील आरयूबी नागरिकांकरिता त्रासदायक ठरत असल्याचे उदाहरण न्यायालयाने दिले. धोकादायक खड्ड्यांचे रोड शहरात सर्वत्र असून त्यामुळे प्राणघातक अपघात होत असल्याचे मतही न्यायालयाने व्यक्त केले.शहरात एकूण २२०१.१९ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या २९.८०, राज्य महामार्ग प्राधिकरणच्या ६.७० तर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ८४.४३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा समावेश आहे. तसेच, नागपूर सुधार प्रन्यासकडील सात योजना व गुंठेवारी क्षेत्रात काही रस्ते आहेत. त्यापैकी अनेक रस्त्यांवर धोकादायक खड्डे आहेत. या प्रकरणावर आता २२ जानेवारी रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. प्रकरणात अ‍ॅड. राहिल मिर्झा न्यायालय मित्र असून, सरकारतर्फे अ‍ॅड. सुमंत देवपुजारी, मनपातर्फे वरिष्ठ वकील एस. के. मिश्रा व अ‍ॅड. गिरीश कुंटे तर, मध्यस्थांतर्फे अ‍ॅड. एम. अनिलकुमार व अ‍ॅड. आर. पी. जोशी यांनी कामकाज पाहिले.खड्ड्यांवरील खटल्याला मुदतवाढलकडगंज पोलिसांच्या हद्दीतील रोडवरील खड्ड्यांमुळे दाखल गुन्ह्याचा एक खटला प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात प्रलंबित आहे. तो खटला निकाली काढण्यासाठी उच्च न्यायालयाने १४ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवून दिली. आधी हा खटला ३० जानेवारीपर्यंत निकाली काढण्याचा आदेश देण्यात आला होता. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त अ‍ॅड. आर. पी. जोशी यांनी काही वैयक्तिक कारणामुळे या खटल्यांचे कामकाज पाहण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे उच्च न्यायालयाने जोशी यांच्याकडील या खटल्याची जबाबदारी काढून घेतली व त्यांच्या जागेवर अ‍ॅड. नीरज खांदेवाले यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याचे सरकारला निर्देश दिले. तसेच, या खटल्यावर रोज सुनावणी घेण्यास सांगितले. खांदेवाले यांना अ‍ॅड. आकांक्षा वंजारी सहकार्य करतील.बॅच मिक्स टेंडरची माहिती मागितलीमहानगरपालिका रोड बांधण्याचा माल तयार करण्यासाठी बॅच मिक्स प्लॅन्ट टाकणार आहे. त्यासंदर्भातील टेंडर प्रक्रिया कुठपर्यंत पोहचली याची माहिती सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने महापालिकेला दिले. महापालिकेकडे सध्या हॉट मिक्स प्लॅन्ट आहे. तो प्लॅन्ट गरजेनुसार माल तयार करण्यास असक्षम आहे. त्यामुळे बॅच मिक्स प्लॅन्ट टाकण्यात येणार आहे.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयcivic issueनागरी समस्या