शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

अहो हे, बसस्थानक की दुचाकींचे वाहनतळ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 22:32 IST

जिल्ह्यातील बहुतांश सर्वच तालुका मुख्यालयी बसस्थानक आहे. तेथून तालुक्यातील गावा-गावांत एसटी बसफेऱ्या होतात. त्यासोबतच जिल्हा मुख्यालयाशीही ‘कनेक्टिव्हिटी’ आहे. मात्र या बसस्थानकावर बाहेरगावी जाण्यासाठी आलेल्या प्रवाशांना वाहनांच्या पार्किंगमुळे त्रासाचा सामना करावा लागतो. परिणामी जिथे जागा मिळेल, तिथे वाहन उभे करून त्यांना बाहेरगावी जावे लागते.

ठळक मुद्देप्रवाशांची वाहने अस्ताव्यस्त : नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर, रामटेकसह सर्वच बसस्थानकाचे वास्तव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: जिल्ह्यातील बहुतांश सर्वच तालुका मुख्यालयी बसस्थानक आहे. तेथून तालुक्यातील गावा-गावांत एसटी बसफेऱ्या होतात. त्यासोबतच जिल्हा मुख्यालयाशीही ‘कनेक्टिव्हिटी’ आहे. मात्र या बसस्थानकावर बाहेरगावी जाण्यासाठी आलेल्या प्रवाशांना वाहनांच्या पार्किंगमुळे त्रासाचा सामना करावा लागतो. परिणामी जिथे जागा मिळेल, तिथे वाहन उभे करून त्यांना बाहेरगावी जावे लागते. परत आल्यावर मात्र ते वाहन सुस्थितीत असेलच याची खात्री नसते. जिल्ह्यातील कळमेश्वर, रामटेक, सावनेर, उमरेड, कामठी, पारशिवनी, नरखेडच नव्हे तर सर्वच बसस्थानकात अशीच स्थिती आहे. याकडे एसटी महामंडळ कधी लक्ष देणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.कळमेश्वर बसस्थानक परिसरात दिवसभर मोटरसायकलसह कारचे अवैधपणे  पार्किंग केले जाते. ही वाहने मिळेल तिथे लावली जात असल्याने बसचालकांनाही बऱ्याचदा त्रास सहन करावा लागतो. येथे पार्किंगचे कंत्राट एखाद्याला दिल्यास वाहने सुस्थितीत असू शकतात. सोबतच त्या कंत्राटामुळे एसटी महामंडळालाही आर्थिक हातभार लागू शकतो. कळमेश्वर येथून दररोज नागपूर, काटोल, नरखेड, सावनेर येथे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या हजारोच्या घरात आहे. सोबतच विद्यार्थीही बाहेरगावी शिकायला जातात. त्या सर्वांची वाहने बसस्थानक आवारात बेवारस असतात. ही वाहने चोरी जाण्याचीही शक्यता अधिक असते. याकडे एसटी महामंडळानेच लक्ष देण्याची गरज आहे.असेच चित्र रामटेक बसस्थानक येथेही आहे. येथून दररोज नागपूर, कामठी, कन्हान, देवलापार, भंडारा, पारशिवनी, मौदा, तुमसर येथे प्रवासी ये-जा करतात. त्या सर्वांची वाहने बसस्थानकाच्या आवारात अस्ताव्यस्त असतात. एवढेच काय तर आजूबाजूच्या गावातील नागरिकांना रामटेक येथून बाहेरगावी जायचे असल्यास ते आपली दुचाकी रामटेक बसस्थानक परिसरात ठेवतात. सायंकाळी परत आल्यावर आपल्या वाहनाने गावाकडे जातात. परिणामी अवैधपणे पार्किंग करणाऱ्या वाहनांची संख्या रामटेक येथे अधिक आहे.पार्किंगसाठी ओळखीचा आधारबसस्थानकावर वाहनांचे पार्किंग स्टॅन्ड नसल्याने बाहेरगावी जाणाऱ्या  प्रवाशांची अडचण होते. त्यामुळे जागा मिळेल तिथे वाहन उभे करून नागरिक पुढच्या प्रवासाला निघतात. काही जण आपल्या ओळखीच्या व्यक्तीकडे वाहन पार्क करतात. एवढेच काय तर बसस्थानकापुढे असलेल्या पानटपरी, दुकानदाराशीही ओळखी वाढविली जाऊन त्याच्या दुकानासमोर अशी वाहने उभी असतात. मात्र परत येईपर्यंत ते वाहन सुस्थितीत असेलच याची खात्री नसते.

टॅग्स :nagpurनागपूरRural Developmentग्रामीण विकास