शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

अपघातातील मृताच्या वारसदाराला मिळणार पाच लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 22:17 IST

नवीन कायद्याप्रमाणे आता मृताच्या कुटुंबीयांना पाच लाख तर अपंगत्व आल्यास दोन लाख ५० हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून मिळेल.

ठळक मुद्देथर्ड पार्टी वाहन विमा हिताचा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरातील कमावत्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास कुटुंबावर गंभीर संकट कोसळते. पूर्वी ‘थर्ड पार्टी’ वाहन विम्यानुसार मृताच्या वारसदारला ५० हजार तर अपंगत्व आल्यास २५ हजार रुपयांची तरतूद होती. परंतु नवीन कायद्याप्रमाणे आता मृताच्या कुटुंबीयांना पाच लाख तर अपंगत्व आल्यास दोन लाख ५० हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून मिळेल.या नवीन कायद्याची माहिती देताना अ‍ॅड. पी. एस. मिराचे म्हणाले, भारत सरकारने मोटार वाहन कायदा १९८८ मध्ये सुधारणा केली आहे. आता २०१९ नुसार ‘थर्ड पार्टी’संबंधी नुकसान भरपाई कलम १६४ प्रमाणे पाच लाख तर जखमी किंवा अपंगत्व आलेल्या व्यक्तीला अडीच लाख रुपये मिळेल. हा ‘क्लेम’ मिळण्यासाठी अर्जदाराने अपघातात दोष सिद्ध करायची आवश्यकता नाही. परंतु वाहन समाविष्ट व उपयोगात होते हे सिद्ध करण्याची गरज आहे. नव्या कायद्याप्रमाणे अपघात झाल्यापासून सहा महिन्याच्या आत ‘क्लेम’ करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, जुन्या कायद्यात अपघातानंतर वाहन न मिळाल्यास म्हणजे ‘हिट अ‍ॅण्ड रन’ प्रकरणामध्ये मृताच्या वारसांना २५ हजार व गंभीर जखमीला १२ हजार रुपयांची तरतूद होती. मात्र नव्या कायद्यानुसार मृताच्या वारसांना दोन लाख तर गंभीर जखमींना ५० हजार रुपये मिळणार आहे. नवा ‘थर्ड पार्टी’ वाहन विमा कायदा हिताचा आहे.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर