शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

विदर्भात पावसाचे थैमान; अनेक ठिकाणी पूर परिस्थिती, जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2022 14:52 IST

विदर्भात अनेक ठिकाणी संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला असून वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक धरणांचे दरवाजे उघडल्याने परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.

राज्यात पावसाच्या जोरधारा कायम असून अनेक नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक धरणांचे दरवाजे उघडल्याने परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. राज्यात गेल्या दहा दिवसांत पावसाच्या कहरात एकूण ८४ जणांचा मृत्यू झाला आहे. विदर्भात अनेक ठिकाणी संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

नागपूर : जिल्ह्यातील दारे नसलेले एकूण १४ धरणे ओव्हर फ्लो झाले आहेत. तर, चार  धरणाची दारे उघडण्यात आली आहे. एकूण लहान व मोठ्या १८ धरणांतून विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील इसासनी परिसरात रविवारी नाल्याचा पूर ओलांडताना आई व मुलगी वाहून गेल्याची घटना समोर आली होती. तर, मंगळवारी सावनेर तालुक्यात पुरात गाडी वाहून गेल्याने ६ जणांना जलसमाधी मिळाली. संततधार पावसामुळे नवेगावखैरी, नांद, वेना या धरणांमधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सावनेर, पारशिवनी, रामटेक, उमरेड, भिवापूर या तालुक्यातील अनेक गावांना पुराचा धोका संभवतो आहे. तसेच गोसेखुर्द प्रकल्पातील बॅकवॉटरमुळेही काही ठिकाणी पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. या परिसरातील गावकऱ्यांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे.

चंद्रपूर : जिल्ह्यात वर्धा व पैनगंगा नदीला पूर, अनेक रस्ते बंद, वाहतूक प्रभावित. राजुरा व कोरपना तालुक्यातील अनेक मार्ग बंद. इरई धरणाचे सातही दरवाजे उघडले, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन.

गोंदिया : जिल्ह्यातील आठही तालुक्यात अतिवृष्टी. आमगाव तालुक्यातील गिरोला सिंधीटोला पांगोली नदीवरील कच्चा पूल वाहून गेल्याने या गावांचा आमगाव तालुक्याशी संपर्क तुटला.

भंडारा : जिल्ह्यात २४ तासांत जोरदार पाऊस. २५ मंडळात अतिवृष्टीची नोंद.  गोसेखुर्द प्रकल्पाचे २८ गेट उघडले, ५ गेट एक मीटरने, तर २३ गेट अर्धा मीटरने उघडले, ४०९०.७ क्युमेक पाण्याचा विसर्ग. पवनी - बोरगाव रस्त्यावरील नाल्याच्या पुराचे पाणी पुलावर, सकाळपासून वाहतूक ठप्प. मोहाडी तालुक्यातील मोहगाव देवी येथे शेतात वीज कोसळून तरुण ठार. बुधवारी सकाळी ८.१५ वाजताची घटना. शुभम विजय लेंडे (२४) रा. मोहगाव देवी असे मृताचे नाव.

गडचिरोली : तेलंगणा सीमेवरील मेडीगड्डा प्रकल्पाचे (लक्ष्मी बॅरेज) सर्व ८५ गेट उघडले, १२,१०,६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग, सिरोंचा तालुक्यातील शेती आणि गावांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता. 

नदी-नाल्यावरील पूल ठरताहेत धोकादायक

पुलावरून पाणी जात असल्याचे दिसत असतानाही अनेकजण तो ओलांडण्याचा प्रयत्न करतात. चालक अतिआत्मविश्वासाने गाडी नेण्याचा प्रयत्न करतात. गाडीच्या चाकांमध्ये उच्च दाबाची हवा असते. दीड फुटावर गाडी जाताच ती तरंगू लागते व पुलाखाली फेकली जाते. त्यामुळे अशावेळी पूल ओलांडण्याचे धाडस करण्यापेक्षा पाणी ओसरण्याची वाट पाहिलेले बरे. 

टॅग्स :RainपाऊसfloodपूरVidarbhaविदर्भGosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प