शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

मुसळधारचा अलर्ट, पण संततधारेने भिजले नागपूर, दिवसभरात २७ मि.मी.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 12:04 IST

सायंकाळी वाढला जाेर : पुढचे दाेन दिवस पावसाचा जाेर अधिक राहण्याची शक्यता

नागपूर : हवामान विभागाने नागपूर जिल्ह्यात सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट देत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला हाेता. अंदाजानुसार जाेरदार हजेरी लागली नसली तरी दिवसभर चाललेली रिपरिप आणि सायंकाळी झालेल्या चांगल्या सरींनी नागपूरकरांना भिजविले.

सकाळपासून आकाशात काळ्या ढगांची गर्दी जमली हाेती. त्यामुळे दमदार हजेरी लागेल, अशी परिस्थिती हाेती. मात्र दिवसभर पावसाचा वेग वाढला नाही. मात्र दिवसभर थांबून-थांबून पावसाच्या सरी बरसत राहिल्या. यामुळे रस्त्यावरील वाहनचालकांची तारांबळही उडत हाेती. दुपारी चार वाजताच्या दरम्यान जाेरात सरी बरसल्या. सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत १२ मि.मी. पावसाची नाेंद झाली. सायंकाळी सहा वाजल्यापासून पुन्हा पावसाने जाेर धरला व जवळपास तासभर दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रात्री ८.३० पर्यंत पुन्हा १५ मि.मी. पावसाची भर पडली. रात्रीही ढगांचा जाेर कायम हाेता. मात्र पुढचे दाेन दिवस पावसाचा जाेर अधिक राहण्याची शक्यता वर्तवली असून ऑरेंज अलर्ट दिला आहे. स्थिती अनुकूल असल्याने आणखी काही दिवस पावसाची तीव्रता कायम राहणार असल्याचे दिसते.

पावसाची तूट १६ टक्क्यांवर

सध्या नागपूर जिल्ह्यात पावसाची तूट १६ टक्क्यांवर आहे, जी सामान्य मानली जाते. पुढच्या काही दिवसांत ही भरून निघण्याची शक्यता आहे.

पुरात वाहून बैलजोडीचा मृत्यू

भिवापूर : शेतातून घराकडे निघालेली शेतकऱ्यांची बैलजोडी पुराच्या पाण्यात वाहून गेली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारासची आहे. तुळशीदार आंभोरे, रा. मालेवाडा असे पीडित शेतकऱ्याचे नाव आहे. मालेवाडा शिवारातून वाहणाऱ्या चिचाळा नदीपलीकडे अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. मंगळवारी संध्याकाळी शेतातील कामे आटोपल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्या घराकडे जाण्यासाठी सोडून दिल्या. दरम्यान, सहा बैलजोड्या नदीच्या पाण्यातून पोहत बाहेर पडत असतानाच, तुळशीदास आंभोरे यांची बैलजोडी एकमेकांना बांधून असल्यामुळे तुडुंब भरलेल्या नदीपात्रातून बाहेर पडणे कठीण झाले. यातील एक बैल नदीपात्रातच मृत्युमुखी पडला तर दुसरा नदीच्या प्रवाहासोबत वाहून गेला. दोन्ही बैलांच्या मृत्यूमुळे शेतकऱ्यांचे अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

पारडगावात वीज कोसळून शेळ्या ठार

उमरेड : पारडगाव शिवारात मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास वीज कोसळल्याने त्यात होरपळून सहा जनावरे ठार झाली. यामध्ये चार शेळ्या आणि दोन बोकडांचा समावेश आहे. मंगळवारी सकाळी शंकर नथ्थूजी राऊत यांनी शेतालगतच्या झुडपी भागात जनावरे चराईसाठी नेली होती. दरम्यान, दुपारी वाजताच्या सुमारास वीज कोसळली. यामध्ये पाच शेळ्या आणि एक बोकड ठार झाले. शंकर राऊत यांच्याकडील चार शेळ्या, तर तुकाराम राऊत आणि दीपक अरतपायरे यांच्याकडील प्रत्येकी एका बोकडाचा यात समावेश आहे. घटनेनंतर सायकी येथील तलाठी रोशन बारमासे यांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला. नुकसानभरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. परिसरात दोन मजूर होते. ते या नैसर्गिक संकटातून थोडक्यात बचावल्याचे समजते.

टॅग्स :Rainपाऊसmonsoonमोसमी पाऊसnagpurनागपूर