शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

भीषण उष्णतेत विजेचा फटका : गोरेवाडा सबस्टेशनचे सात फिडर खराब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:14 IST

शहरात तांत्रिक त्रुटीमुळे विजेचा लपंडाव सुरू आहे. यातच शनिवारी गोरेवाडा येथील ३३ केव्ही सबस्टेशनशी जुळलेले सात फिडर ठप्प पडले. वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलने केलेल्या दाव्यानुसार सातपैकी चार फिडर लगेच दुरुस्त करण्यात आले. परंतु तीन फिडरचे अंडरग्राऊंड केबल खराब झाल्यामुळे वेळ लागला. परंतु याचा फटका नागरिकांना बसला. भीषण उष्णतेत पश्चिम नागपुरातील हजारो लोकांंना सहा तास विजेविना राहावे लागले.

ठळक मुद्देपश्चिम नागपुरातील नागरिक सहा तास विजेविना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात तांत्रिक त्रुटीमुळे विजेचा लपंडाव सुरू आहे. यातच शनिवारी गोरेवाडा येथील ३३ केव्ही सबस्टेशनशी जुळलेले सात फिडर ठप्प पडले. वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलने केलेल्या दाव्यानुसार सातपैकी चार फिडर लगेच दुरुस्त करण्यात आले. परंतु तीन फिडरचे अंडरग्राऊंड केबल खराब झाल्यामुळे वेळ लागला. परंतु याचा फटका नागरिकांना बसला. भीषण उष्णतेत पश्चिम नागपुरातील हजारो लोकांंना सहा तास विजेविना राहावे लागले.वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलनुसार जवळपास चार हजार वीज ग्राहकांची वीज गायब होती. यापूर्वी पश्चिम नागपुरातील अनेक भागांमध्ये तांत्रिक त्रुटींमुळे सकाळी ११ वाजेपासून विजेचा लपंडाव सुरू होता. मिळालेल्या माहितीनुसार गोरेवाडा, एकतानगर, बोरगाव, बरडे ले-आऊट, केटीनगर, फ्रेण्ड्स कॉलनीपासून गिट्टीखदानपर्यंत तर अनंतनगरपासून झिंगाबाई टाकळीपर्यंतच्या परिसरातील वीज गेली. काही भागांना दुसऱ्या फिडरवरून जोडून पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात विजेचे येणे-जाणे सुरू होते. सायंकाळी ६ वाजता वीज पुरवठा सुरळीत झाला. म्हणजेच भीषण उष्णतेत सकाळी ११ पासून तर सायंकाळी ६ वाजेपर्यंत नागरिकांना राहावे लागले. वीज गेल्याबाबत एसएनडीएल कार्यालयात फोन केल्यावर त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचाही अनेकांनी आरोप केला आहे.

 

टॅग्स :electricityवीजPower Shutdownभारनियमन