शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
3
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
4
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
5
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
8
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
9
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
10
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
11
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
12
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
13
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
14
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
17
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
18
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
19
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
20
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले

चटके वाढले! विदर्भात उष्णतेचा कहर, ब्रह्मपुरी-वर्धा ४५ पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2022 12:08 IST

येत्या काही दिवसांत विदर्भात उष्णतेच्या लाटचा इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्देनागपुरात यंदा प्रथमच ४४.५ अंशांहून जास्त तापमान सर्व जिल्हयांत ‘यलो अलर्ट’

नागपूर : मागील आठवड्यापासून विदर्भासह उपराजधानी तापायला लागली असून, बुधवारचा दिवस ब्रह्मपुरी, नागपूर, अकोला व वर्ध्यासाठी परीक्षेचाच ठरला. ब्रह्मपुरीत सर्वात जास्त ४५.१ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले. वर्ध्यात परत एकदा ४५ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली; तर नागपुरात २४ तासात पारा १.८ अंश सेल्सिअसनी वाढला व ४४.८ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदविण्यात आले. विशेष म्हणजे या मोसमात प्रथमच नागपूरचा पारा ४४.५ अंशांपार गेला आहे. येत्या काही दिवसांत विदर्भातील चटके आणखी वाढण्याची शक्यता आहे.

बुधवारी विदर्भातील सर्वच ठिकाणी पारा वाढल्याचे दिसून आले. नागपूरसह अकोल्यातदेखील ४४.८ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. जवळपास प्रत्येकच ठिकाणी २४ तासांत ०.३ ते १.८ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची वाढ नोंदविण्यात आली. नागपुरात सकाळपासूनच उष्णता जाणवत होती. दुपारच्या सुमारास काही वेळ ढगाळलेले वातावरण होते, परंतु गरम वारेदेखील होते. सकाळी ८.३० वाजता आर्द्रता २३ टक्के होती व साडेपाच वाजता १३ टक्क्यांवर घट झाली.

हवामान खात्याने विदर्भात ‘यलो अलर्ट’ घोषित केला असून, पुढील चार ते पाच दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

जिल्हानिहाय कमाल तापमान

जिल्हा : तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

अकोला : ४४.८

बुलडाणा : ४१.८

ब्रह्मपुरी : ४५.१

चंद्रपूर : ४४.६

गडचिरोली : ४२.६

गोंदिया : ४३.८

नागपूर : ४४.८

वर्धा : ४५.०

वाशिम : ४३.६

यवतमाळ : ४४.२

टॅग्स :weatherहवामानTemperatureतापमानVidarbhaविदर्भ