शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

चटके वाढले! विदर्भात उष्णतेचा कहर, ब्रह्मपुरी-वर्धा ४५ पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2022 12:08 IST

येत्या काही दिवसांत विदर्भात उष्णतेच्या लाटचा इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्देनागपुरात यंदा प्रथमच ४४.५ अंशांहून जास्त तापमान सर्व जिल्हयांत ‘यलो अलर्ट’

नागपूर : मागील आठवड्यापासून विदर्भासह उपराजधानी तापायला लागली असून, बुधवारचा दिवस ब्रह्मपुरी, नागपूर, अकोला व वर्ध्यासाठी परीक्षेचाच ठरला. ब्रह्मपुरीत सर्वात जास्त ४५.१ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले. वर्ध्यात परत एकदा ४५ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली; तर नागपुरात २४ तासात पारा १.८ अंश सेल्सिअसनी वाढला व ४४.८ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदविण्यात आले. विशेष म्हणजे या मोसमात प्रथमच नागपूरचा पारा ४४.५ अंशांपार गेला आहे. येत्या काही दिवसांत विदर्भातील चटके आणखी वाढण्याची शक्यता आहे.

बुधवारी विदर्भातील सर्वच ठिकाणी पारा वाढल्याचे दिसून आले. नागपूरसह अकोल्यातदेखील ४४.८ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. जवळपास प्रत्येकच ठिकाणी २४ तासांत ०.३ ते १.८ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची वाढ नोंदविण्यात आली. नागपुरात सकाळपासूनच उष्णता जाणवत होती. दुपारच्या सुमारास काही वेळ ढगाळलेले वातावरण होते, परंतु गरम वारेदेखील होते. सकाळी ८.३० वाजता आर्द्रता २३ टक्के होती व साडेपाच वाजता १३ टक्क्यांवर घट झाली.

हवामान खात्याने विदर्भात ‘यलो अलर्ट’ घोषित केला असून, पुढील चार ते पाच दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

जिल्हानिहाय कमाल तापमान

जिल्हा : तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

अकोला : ४४.८

बुलडाणा : ४१.८

ब्रह्मपुरी : ४५.१

चंद्रपूर : ४४.६

गडचिरोली : ४२.६

गोंदिया : ४३.८

नागपूर : ४४.८

वर्धा : ४५.०

वाशिम : ४३.६

यवतमाळ : ४४.२

टॅग्स :weatherहवामानTemperatureतापमानVidarbhaविदर्भ