शहरं
Join us  
Trending Stories
1
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
2
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
3
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
4
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
5
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
6
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
7
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
8
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
9
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
10
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
11
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
12
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
13
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
14
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
15
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
16
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
17
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
18
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
19
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
20
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात आरोग्य भारतीकडून आरोग्यवर्धक वनस्पतींच्या प्रचार-प्रसाराचा वसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:46 IST

निसर्ग हा प्रत्येक आजारावर उपचार आहे. त्यासाठी संयम व चिकित्सकवृत्ती आवश्यक आहे. पण मानवीय मानसिकतेवर मॉडर्न मेडिसीनच्या झालेल्या प्रभावामुळे आरोग्याच्या बाबतीत आपण निसर्गापासून दूर होत आहोत. मॉडर्न मेडिसीनची मानसिकता बदलविण्यासाठी आरोग्य भारती गेल्या १० वर्षांपासून नागपुरात कार्यरत आहे. पारंपरिक आणि आरोग्यवर्धक वनस्पतीचा प्रचार, प्रसार आरोग्य भारतीतर्फे सुरू आहे.

ठळक मुद्देझोपडपट्टी, वस्त्यांमध्ये जनजागृती : व्यक्ती, कुटुंब आणि समाजाच्या स्वास्थ्यासाठी कार्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निसर्ग हा प्रत्येक आजारावर उपचार आहे. त्यासाठी संयम व चिकित्सकवृत्ती आवश्यक आहे. पण मानवीय मानसिकतेवर मॉडर्न मेडिसीनच्या झालेल्या प्रभावामुळे आरोग्याच्या बाबतीत आपण निसर्गापासून दूर होत आहोत. मॉडर्न मेडिसीनची मानसिकता बदलविण्यासाठी आरोग्य भारती गेल्या १० वर्षांपासून नागपुरात कार्यरत आहे. पारंपरिक आणि आरोग्यवर्धक वनस्पतीचा प्रचार, प्रसार आरोग्य भारतीतर्फे सुरू आहे.‘स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम् ’ हे ब्रीद आरोग्य भारतीचे आहे. आरोग्य भारतीतर्फे ज्या ११ वनस्पतींचा प्रचार-प्रसार करण्यात येतो, त्या वनस्पती घरी लावल्यास रोगमुक्त व्यक्ती, कुटुंब आणि समाज होऊ शकतो. वातावरणामुळे पसरणारे साथीचे आजार झाल्यास, डॉक्टरांची गरज भासणार नाही, याचे प्रबोधन घराघरात, झोपडपट्ट्यांमध्ये, वस्त्यांमध्ये शिबिराच्या माध्यमातून आरोग्य भारती करते. शहरात आरोग्य भारतीचे ५० च्या वर सक्रिय कार्यकर्ते आहेत. यात सर्वच पॅथीचे डॉक्टरसुद्धा आहेत. या डॉक्टरांच्या मार्गदर्शनातून गुळवेल, अश्वगंधा, अगस्त्य, भूम्यामलकी, गवती चहा, ब्राह्मी, कोरपड, हेटी, प्राजक्त, शतावरी आणि तुळशी अशा ११ वनस्पतींचा प्रचार करण्यात येतो.झोपडपट्ट्यांमध्ये त्यासंदर्भात छोटी छोटी शिबिरे घेऊन मार्गदर्शन करण्यात येते. त्यांना वनस्पती उपलब्ध करून देण्यात येतात. प्रत्येक वनस्पतीतील औषधी गुणांची माहिती देण्यात येते. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना या वनस्पतीसंदर्भात माहिती देण्यात येते. शहरातील ४० हजार कुटुंब आज आरोग्य भारतीशी जुळलेले आहेत. आरोग्य भारतीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. रमेश गौतम, शहराचे अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध मुरार, सचिव अशोक गव्हाणे, कोषाध्यक्ष रवींद्र बडगे यांच्या माध्यमातून आरोग्य भारतीचे काम सुरू आहे.

आजाराचा उद्रेक होताच पोहचते आरोग्य भारतीशहरात ज्या भागात साथीच्या आजाराचा उद्रेक होतो त्या भागातील नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी आरोग्य भारतीची चमू त्या भागात पोहचते. वनस्पतीच्या प्रचारासोबतच उपचाराची माहिती देते. अशा अनेक वस्त्यांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये आरोग्य भारती पोहोचली आहे.आजार होण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय कराभारतीय चिकित्सा पद्धतींकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. वस्तुत: आयुर्वेदासारख्या चिकित्सा पद्धतींच्या आधारे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे सहज शक्य आहे. साध्या साध्या गुळवेल, आवळ्यातून डेंग्यू, स्वाईन फ्लूसारखे आजार सहज दूर ठेवता येतात. याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे जीवनाचा दर्जा खालावला आहे. त्यासाठीच आरोग्य भारतीच्या वतीने ‘प्रतिबंधात्मक आरोग्य’ ही संकल्पना रुजविण्याचा प्रयत्न होतो आहे. व्यक्ती आजारी पडूच नये यासाठी आरोग्य भारती समाजात काम करतेय. जेव्हा समाज सुदृढ राहील तेव्हाच राष्ट्र सुदृढ होईल, असा आरोग्य भारतीचा दृष्टिकोन आहे.रवींद्र बडगे, कोषाध्यक्ष, आरोग्य भारती

 

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर