शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
4
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
5
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
6
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
7
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
8
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
9
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
10
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
11
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
12
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
13
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
14
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
15
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
16
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
17
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
18
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
19
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
20
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू

नागपुरात आरोग्य भारतीकडून आरोग्यवर्धक वनस्पतींच्या प्रचार-प्रसाराचा वसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:46 IST

निसर्ग हा प्रत्येक आजारावर उपचार आहे. त्यासाठी संयम व चिकित्सकवृत्ती आवश्यक आहे. पण मानवीय मानसिकतेवर मॉडर्न मेडिसीनच्या झालेल्या प्रभावामुळे आरोग्याच्या बाबतीत आपण निसर्गापासून दूर होत आहोत. मॉडर्न मेडिसीनची मानसिकता बदलविण्यासाठी आरोग्य भारती गेल्या १० वर्षांपासून नागपुरात कार्यरत आहे. पारंपरिक आणि आरोग्यवर्धक वनस्पतीचा प्रचार, प्रसार आरोग्य भारतीतर्फे सुरू आहे.

ठळक मुद्देझोपडपट्टी, वस्त्यांमध्ये जनजागृती : व्यक्ती, कुटुंब आणि समाजाच्या स्वास्थ्यासाठी कार्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निसर्ग हा प्रत्येक आजारावर उपचार आहे. त्यासाठी संयम व चिकित्सकवृत्ती आवश्यक आहे. पण मानवीय मानसिकतेवर मॉडर्न मेडिसीनच्या झालेल्या प्रभावामुळे आरोग्याच्या बाबतीत आपण निसर्गापासून दूर होत आहोत. मॉडर्न मेडिसीनची मानसिकता बदलविण्यासाठी आरोग्य भारती गेल्या १० वर्षांपासून नागपुरात कार्यरत आहे. पारंपरिक आणि आरोग्यवर्धक वनस्पतीचा प्रचार, प्रसार आरोग्य भारतीतर्फे सुरू आहे.‘स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम् ’ हे ब्रीद आरोग्य भारतीचे आहे. आरोग्य भारतीतर्फे ज्या ११ वनस्पतींचा प्रचार-प्रसार करण्यात येतो, त्या वनस्पती घरी लावल्यास रोगमुक्त व्यक्ती, कुटुंब आणि समाज होऊ शकतो. वातावरणामुळे पसरणारे साथीचे आजार झाल्यास, डॉक्टरांची गरज भासणार नाही, याचे प्रबोधन घराघरात, झोपडपट्ट्यांमध्ये, वस्त्यांमध्ये शिबिराच्या माध्यमातून आरोग्य भारती करते. शहरात आरोग्य भारतीचे ५० च्या वर सक्रिय कार्यकर्ते आहेत. यात सर्वच पॅथीचे डॉक्टरसुद्धा आहेत. या डॉक्टरांच्या मार्गदर्शनातून गुळवेल, अश्वगंधा, अगस्त्य, भूम्यामलकी, गवती चहा, ब्राह्मी, कोरपड, हेटी, प्राजक्त, शतावरी आणि तुळशी अशा ११ वनस्पतींचा प्रचार करण्यात येतो.झोपडपट्ट्यांमध्ये त्यासंदर्भात छोटी छोटी शिबिरे घेऊन मार्गदर्शन करण्यात येते. त्यांना वनस्पती उपलब्ध करून देण्यात येतात. प्रत्येक वनस्पतीतील औषधी गुणांची माहिती देण्यात येते. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना या वनस्पतीसंदर्भात माहिती देण्यात येते. शहरातील ४० हजार कुटुंब आज आरोग्य भारतीशी जुळलेले आहेत. आरोग्य भारतीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. रमेश गौतम, शहराचे अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध मुरार, सचिव अशोक गव्हाणे, कोषाध्यक्ष रवींद्र बडगे यांच्या माध्यमातून आरोग्य भारतीचे काम सुरू आहे.

आजाराचा उद्रेक होताच पोहचते आरोग्य भारतीशहरात ज्या भागात साथीच्या आजाराचा उद्रेक होतो त्या भागातील नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी आरोग्य भारतीची चमू त्या भागात पोहचते. वनस्पतीच्या प्रचारासोबतच उपचाराची माहिती देते. अशा अनेक वस्त्यांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये आरोग्य भारती पोहोचली आहे.आजार होण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय कराभारतीय चिकित्सा पद्धतींकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. वस्तुत: आयुर्वेदासारख्या चिकित्सा पद्धतींच्या आधारे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे सहज शक्य आहे. साध्या साध्या गुळवेल, आवळ्यातून डेंग्यू, स्वाईन फ्लूसारखे आजार सहज दूर ठेवता येतात. याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे जीवनाचा दर्जा खालावला आहे. त्यासाठीच आरोग्य भारतीच्या वतीने ‘प्रतिबंधात्मक आरोग्य’ ही संकल्पना रुजविण्याचा प्रयत्न होतो आहे. व्यक्ती आजारी पडूच नये यासाठी आरोग्य भारती समाजात काम करतेय. जेव्हा समाज सुदृढ राहील तेव्हाच राष्ट्र सुदृढ होईल, असा आरोग्य भारतीचा दृष्टिकोन आहे.रवींद्र बडगे, कोषाध्यक्ष, आरोग्य भारती

 

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर