शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नागपूर जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्र बनले गुरांचा गोठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 01:13 IST

गावापासून, तालुक्यापर्यंत आणि तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत प्रशासकीय यंत्रणा मजबूत असतानाही शासनाने बनविलेली इमारत गेल्या पाच वर्षापासून धूळखात पडली आहे. आदिवासी भागात ही इमारत असल्याने याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी अथवा प्रशासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने १७ लाख रुपये खर्चूनही उपकेंद्राच्या इमारतीत आदिवासींच्या आरोग्यावर उपचार सुरू झाले नाही. सध्या हे उपकेंद्र गुरांचा गोठा झाले आहे.

ठळक मुद्देपाच वर्षापासून इमारत धूळखात : उपकेंद्राचा ताबा कुणाकडे?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गावापासून, तालुक्यापर्यंत आणि तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत प्रशासकीय यंत्रणा मजबूत असतानाही शासनाने बनविलेली इमारत गेल्या पाच वर्षापासून धूळखात पडली आहे. आदिवासी भागात ही इमारत असल्याने याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी अथवा प्रशासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने १७ लाख रुपये खर्चूनही उपकेंद्राच्या इमारतीत आदिवासींच्या आरोग्यावर उपचार सुरू झाले नाही. सध्या हे उपकेंद्र गुरांचा गोठा झाले आहे.वनविभागाच्या सेव्हन फॉरेस्ट या हेड अंतर्गत वनांच्या सानिध्यात राहणाऱ्या गावकऱ्यांना आरोग्याच्या सेवा पुरविण्यात येत होत्या. या हेड अंतर्गतच पारशिवनी तालुक्यातील नवेगाव खैरी आरोग्य केंद्रांतर्गत सालेघाट येथे उपकेंद्राची इमारत बांधण्यात आली होती. २००९ मध्ये इमारतीला मंजूरी मिळाली आणि २०१३ मध्ये जि.प.च्या बांधकाम विभागाने इमारतीचे बांधकाम पूर्ण केले. परंतु वनविभागाने आपल्या आरोग्य सेवा पुरविणे बंद केले. त्यामुळे इमारत बांधली पण त्याचा उपयोग झाला नाही. इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर बांधकाम विभागाने इमारतीचा ताबा आरोग्य विभागाला द्यायला हवा होता. आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले की, या इमारतीचा ताबाच दिलेला नाही. मात्र बांधकाम विभागाने सांगितले की तत्कालीन अभियंत्याने स्थानिक आरोग्य अधिकाऱ्याला इमारतीचा ताबा दिला. परंतु दोन्ही विभागाकडे ताब्याची पोचपावती नाही. त्यामुळे आरोग्य विभागाने आपले कर्मचारी तेथे नियुक्त केले नाही. अखेर ही इमारत गेल्या पाच वर्षापासून धूळखात पडली आहे. इमारतीच्या खिडक्या, दरवाजे तुटलेले आहे. गेट चोरून नेले आहे. आतमध्ये गुरांचे वास्तव्य दिसून आले. या उपकेंद्रातून आरोग्याच्या कुठल्याच सेवा उपलब्ध होत नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. एका एनजीओने या उपकेंद्रासाठी शासनाकडे नऊ लाख रुपयांची मागणी केल्यानंतर इमारतीच्या मागचे रहस्य उलगडले. पण स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांनी जर तेव्हाच या इमारतीच्या संदर्भात पाठपुरावा केला असता, तर इमारतीची अशी दुरवस्था झाली नसती.शरद डोणेकर, उपाध्यक्ष, जि.प.

टॅग्स :Healthआरोग्यzpजिल्हा परिषद