शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

रोज दारूसाठी तगादा लावणाऱ्या मित्राला त्यांनी पडक्या शाळेत नेले आणि...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 08:45 IST

Nagpur News व्यसनाधीन मित्राचा त्रास संपवण्यासाठी तिघांनी एका तरुणालाच संपवून टाकले. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री ही थरारक घटना घडली. ती गुरुवारी सकाळी उघडकीस आली.

ठळक मुद्देएमआयडीसीत आरोपींना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर - व्यसनाधीन मित्राचा त्रास संपवण्यासाठी तिघांनी एका तरुणालाच संपवून टाकले. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री ही थरारक घटना घडली. ती गुरुवारी सकाळी उघडकीस आली. (He took his friend, who used to fight for alcohol every day, to the school and..) (murder)शुभम आनंद तिलघरे (वय ३०, रा. वाघधरा) असे मृताचे नाव आहे. त्याला दारू आणि गांजाचे भारी व्यसन होते. तो त्याच्या मित्रांना नेहमीच दारू पाजण्यासाठी त्रास देत होता. प्रसंगी हिंसक होऊन मारहाण करत धमकीही द्यायचा. त्याच्या या त्रासाला त्याचे सर्वच मित्र कंटाळले होते. दिवसभर कबाटकष्ट करून रोजी मिळवायची आणि शुभमवर कशाला उडवायची, असे त्यांना वाटत होते. त्याचा नेहमीसाठी बंदोबस्त करायला पाहिजे, असेही त्यांना वाटायचे. मात्र, मांजराच्या गळ्यात घंटी कोण बांधणार, अशी त्यांची अवस्था होती. त्यामुळे आरोपी नीलेश उर्फ गजनी शहा, अरून जसवंत सिंग आणि बबलू रामाधर सलोडिया या तिघांनी शुभम तिलघरेला संपवण्याचा कट रचला.नेहमीप्रमाणे शूभम बुधवारी रात्री आरोपींच्या मागे दारूसाठी लागला. आरोपींनी त्याला राजीवनगरमधील दारूच्या भट्टीत दारू पाजली. नंतर त्याला एका पडक्या शाळेच्या आवारात नेले. तेथे दाट झाडंझुडपं वाढली आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी तिकडे कुणी फिरकत नाही. आरोपींनी शूभमला तिकडे नेले आणि त्याच्यावर चाकूचे घाव घालून त्याला ठार मारले. गुरुवारी सकाळी ५.४५ च्या सुमारास त्याचा मृतदेह पडून दिसल्याने नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली. माहिती कळताच एमआयडीसीचे ठाणेदार उमेश बेसरकर यांनी आपल्या सहका?्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनीही भेट देऊन माहिती जाणून घेतली. शूभमला रात्री आरोपी नीलेश, अरूण आणि बबलू या तिघांनी सोबत नेले होते, ही माहिती कळताच पोलिसांनी त्यांना शोधले आणि गुरुवारी सायंकाळी अटक केली.भाजी कापायचे चाकू विकत घेतलेआरोपींनी शूभमची हत्या करण्यासाठी तीन चाकू २० - २० रुपयांत विकत घेतले. हत्या करताना आरोपींच्या एका चाकूचे पाते वाकले. प्रारंभी त्याला धाक दाखवून त्याचा नेहमीचा त्रास संपवण्याचा आरोपींचा उद्देश होता. नंतर मात्र त्याला जिवंत सोडले तर तो नशेसाठी आपलाच कुणाचा जीव घेईल, असे आरोपींना वाटले. त्यामुळे त्यांनी त्याची हत्या केली.---

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी