शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

वडिलांकडून २० लाखांची खंडणी उकळण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 01:28 IST

स्वत:च्या अपहरणाचा कट रचून वडिलांकडून २० लाखांची खंडणी उकळण्याचा एका तरुणाचा डाव एमआयडीसी पोलिसांनी उघडा पाडला. पोलिसांनी ताब्यात घेताच त्या तरुणाने मित्रांसोबत मौजमजा करण्यासाठी आपणच आपल्या अपहरणाचा कट रचला होता, अशी कबुली दिली. परिणामी पोलिसांनी त्याला त्याच्या एका साथीदारासह अटक केली. तिसरा आरोपी फरार आहे.

ठळक मुद्देस्वत:च रचला स्वत:च्या अपहरणाचा कट : एमआयडीसी पोलिसांनी डाव उलटवला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वत:च्या अपहरणाचा कट रचून वडिलांकडून २० लाखांची खंडणी उकळण्याचा एका तरुणाचा डाव एमआयडीसी पोलिसांनी उघडा पाडला. पोलिसांनी ताब्यात घेताच त्या तरुणाने मित्रांसोबत मौजमजा करण्यासाठी आपणच आपल्या अपहरणाचा कट रचला होता, अशी कबुली दिली. परिणामी पोलिसांनी त्याला त्याच्या एका साथीदारासह अटक केली. तिसरा आरोपी फरार आहे.गौरव प्रदीप दिनकर (वय २०) असे या कथित अपहरणकांडातील सूत्रधाराचे नाव आहे. त्याचे वडील प्रदीप रामकृष्ण दिनकर (वय ५१) शिक्षक असून ते वानाडोंगरीत राहतात. गौरव याने वैमानिकाशी संबंधित कामकाजाचे प्रशिक्षण घेतले आहे. या प्रशिक्षणानंतर संबंधित प्रशिक्षणार्थ्याला विमानतळावर वेगवेगळी जबाबदारी मिळते. मात्र गौरवला कोणतेच काम मिळाले नाही. त्यामुळे तो निराश झाला होता. त्याला मित्रांसोबत मौजमजा करण्याची सवय जडल्याने आणि पालकांकडून पाहिजे त्या प्रमाणात रक्कम मिळत नसल्याने गौरव अस्वस्थ होता. झटपट मोठी रक्कम मिळवण्यासाठी काय करावे, असा त्याच्यासमोर प्रश्न होता. त्याचा मित्र आरोपी सागर विक्रम बग्गा (वय २३) हा भामटी परसोडीत राहतो. तो टॅक्सीचालक आहे तर, दुसरा एक आरोपी राजू हरडे प्रॉपर्टी डीलिंगचे काम करतो. या दोघांसमोर त्याने झटपट लाखोंची रक्कम मिळवण्यासाठी स्वत:च्या अपहरणाचा कट बोलून दाखवला. माझ्या वडिलांना फोन करून तुम्ही २० लाखांची खंडणी मागा, रक्कम मिळताच ती आपण समप्रमाणात वाटून घेऊ आणि नंतर मौजमजा करू. वडील पोलिसांकडे जाणार नाही, अशी हमीही त्याने आरोपी सागर आणि राजूला कटकारस्थानात सहभागी करून घेताना दिली. त्यानुसार, गुरुवारी दुपारी गौरव, सागर आणि राजू तिघेही वानाडोंगरीतून बाहेर पडले. दुपारी १ वाजता आरोपीने गौरवच्या वडिलांच्या मोबाईलवर फोन केला. ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात असून तो सुखरूप हवा असेल तर २० लाख रुपये खंडणी द्या. पोलिसांना सांगितल्यास गौरवला ठार मारू’, अशी धमकीही आरोपींनी दिली. या फोनमुळे घाबरलेल्या दिनकर यांनी लगेच एमआयडीसी पोलिसांकडे धाव घेतली. २० लाखांच्या खंडणीसाठी शिक्षकाच्या मुलाचे अपहरण झाल्याचे कळताच ठाणेदार भारत क्षीरसागर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपींना शोधण्यासाठी धावपळ सुरू केली.त्यानुसार, खंडणीची रक्कम कुठे आणून द्यायची, असे सांगणारा दुसरा फोन येताच दिनकर यांनी मुलाला काही करू नका, आपण रक्कम द्यायला तयार आहोत, असे सांगितले. त्यानंतर एका बॅगमध्ये रक्कम घेऊन दिनकर आरोपी सांगत असलेल्या ठिकाणावर जाऊ लागले. दुपारपासून रात्री ७ वाजेपर्यंत आरोपी प्रतापनगर, खामला, सीताबर्डीसह ठिकठिकाणी दिनकर यांना बोलवत होते. पोलीस मागावर असल्याचा संशय आला म्हणून की काय ते स्वत: त्या ठिकाणी रक्कम घ्यायला येत नव्हते. अखेर ७ वाजता गौरवचाच फोन वडिलांना आला. आपले अपहरण करणाºयांनी रेल्वेस्थानकावर सोडल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे दिनकर यांनी रेल्वेस्थानकाजवळ जाऊन त्याला सोबत आणले. गौरव मिळताच त्याला एमआयडीसी ठाण्यात आणण्यात आले. त्याचे संशयास्पद वर्तन आणि तो वारंवार अपहरणाची विसंगत माहिती देत असल्यामुळे पोलिसांनी त्याला आपल्या भाषेत विचारणा केली. प्राथमिक चौकशीतच गौरवने अपहरण झालेच नाही, आपणच वडिलांकडून रक्कम काढण्यासाठी हा डाव टाकला होता, असे कबूल केले. या डावबाजीत सागर बग्गा आणि राजू हरडे सहआरोपी असल्याचेही त्याने कबूल केले. त्यानुसार, पोलिसांनी गौरव आणि सागरला अटक केली. राजू फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.पैसे मिळण्याचा होता विश्वास !स्वत:च्या वडिलांकडून रक्कम उकळण्यासाठी कथित अपहरणाचा डाव रचणारा गौरव याला खंडणीची रक्कम वडिलांकडून हमखास मिळेल, वडील पोलिसांकडे जाणार नाही, असा विश्वास होता. त्यामुळे तो गणेश टेकडी परिसरात बसून रकमेची वाट बघत होता. मात्र, त्याचे वडील पोलिसांकडे गेल्याने त्याच्या कटकारस्थानावर पाणी फेरले गेले. एका कथित अपहरणाचा कट उधळून आरोपींना अटक करण्याची कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहआयुक्त रवींद्र कदम, उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एसीपी मारूती शिंदे यांच्या नेतृत्वात ठाणेदार भारत क्षीरसागर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बजावली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक