शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

वाघांच्या टेरीटरीकरिता वनक्षेत्र विकसित केले का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:20 IST

विदर्भातल्या विविध वनांमधील वाघांची संख्या वाढली असून, त्यांना स्वत:ची टेरीटरी निश्चित करता यावी, याकरिता वनांचा विस्तार करणे आवश्यक झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी यासंदर्भातील अर्जाची गंभीर दखल घेऊन ‘कॉम्पेनसेटरी अफॉरेस्टेशन फंड मॅनेजमेंट अ‍ॅन्ड प्लॅनिंग अ‍ॅथोरिटी’ला नोटीस बजावली व या मुद्यावर चार आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्देहायकोर्ट : कॉम्पेनसेटरी अफॉरेस्टेशन अ‍ॅथोरिटीला नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातल्या विविध वनांमधील वाघांची संख्या वाढली असून, त्यांना स्वत:ची टेरीटरी निश्चित करता यावी, याकरिता वनांचा विस्तार करणे आवश्यक झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी यासंदर्भातील अर्जाची गंभीर दखल घेऊन ‘कॉम्पेनसेटरी अफॉरेस्टेशन फंड मॅनेजमेंट अ‍ॅन्ड प्लॅनिंग अ‍ॅथोरिटी’ला नोटीस बजावली व या मुद्यावर चार आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. विकास कामे, उद्योग इत्यादीसाठी वनक्षेत्र वापरल्या गेल्यास नवीन वनक्षेत्र निर्माण करण्यासाठी ‘कॉम्पेनसेटरी अफॉरेस्टेशन फंड मॅनेजमेंट अ‍ॅन्ड प्लॅनिंग अ‍ॅथोरिटी’ला निधी उपलब्ध करून दिला जातो. तो निधी नवीन वनक्षेत्र निर्माण करण्यासाठीच खर्च करणे बंधनकारक आहे. उच्च न्यायालयात वन्यजीवप्रेमी सरिता सुब्रमण्यम व घनश्याम ठाकूर यांची वाघांच्या संरक्षणासंदर्भात जनहित याचिका प्रलंबित आहे. नवीन वाघांना स्वत:ची टेरीटरी निश्चित करण्यासाठी पुरेसे वनक्षेत्र नसल्याची बाब लक्षात घेता, या याचिकेत अ‍ॅथोरिटीला प्रतिवादी करण्याची अनुमती मिळावी, याकरिता अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने तो अर्ज मंजूर करून अ‍ॅथोरिटीला या गंभीर प्रश्नावर स्पष्टीकरण मागितले.याचिकाकर्त्यांच्या माहितीनुसार, टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यातील वाघांची संख्या वाढली आहे. त्यामुळे त्यांना स्वत:ची टेरीटरी निश्चित करण्यासाठी टिपेश्वरचे वनक्षेत्र कमी पडत आहे. परिणामी, पाच वाघ टिपेश्वर वनातून बाहेर पडून पांढरकवडा वनक्षेत्रात स्थानांतरित झाले आहेत. पांढरकवडा वनक्षेत्रात वाघांना जगण्यासाठी आवश्यक असलेल्या वन्यजीवांची संख्या कमी आहे. त्यामुळे ते माणसे व पाळीव प्राण्यांवर हल्ले करीत आहेत. या परिस्थितीत वाघांकरिता वनक्षेत्राचा विस्तार करणे आवश्यक आहे. त्यासाठी अ‍ॅथोरिटीकडून निधी उपलब्ध व्हावा, अशी याचिकाकर्त्यांची विनंती आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. रवींद्र खापरे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयTigerवाघ