शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

वाघांच्या टेरीटरीकरिता वनक्षेत्र विकसित केले का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:20 IST

विदर्भातल्या विविध वनांमधील वाघांची संख्या वाढली असून, त्यांना स्वत:ची टेरीटरी निश्चित करता यावी, याकरिता वनांचा विस्तार करणे आवश्यक झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी यासंदर्भातील अर्जाची गंभीर दखल घेऊन ‘कॉम्पेनसेटरी अफॉरेस्टेशन फंड मॅनेजमेंट अ‍ॅन्ड प्लॅनिंग अ‍ॅथोरिटी’ला नोटीस बजावली व या मुद्यावर चार आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्देहायकोर्ट : कॉम्पेनसेटरी अफॉरेस्टेशन अ‍ॅथोरिटीला नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातल्या विविध वनांमधील वाघांची संख्या वाढली असून, त्यांना स्वत:ची टेरीटरी निश्चित करता यावी, याकरिता वनांचा विस्तार करणे आवश्यक झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी यासंदर्भातील अर्जाची गंभीर दखल घेऊन ‘कॉम्पेनसेटरी अफॉरेस्टेशन फंड मॅनेजमेंट अ‍ॅन्ड प्लॅनिंग अ‍ॅथोरिटी’ला नोटीस बजावली व या मुद्यावर चार आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. विकास कामे, उद्योग इत्यादीसाठी वनक्षेत्र वापरल्या गेल्यास नवीन वनक्षेत्र निर्माण करण्यासाठी ‘कॉम्पेनसेटरी अफॉरेस्टेशन फंड मॅनेजमेंट अ‍ॅन्ड प्लॅनिंग अ‍ॅथोरिटी’ला निधी उपलब्ध करून दिला जातो. तो निधी नवीन वनक्षेत्र निर्माण करण्यासाठीच खर्च करणे बंधनकारक आहे. उच्च न्यायालयात वन्यजीवप्रेमी सरिता सुब्रमण्यम व घनश्याम ठाकूर यांची वाघांच्या संरक्षणासंदर्भात जनहित याचिका प्रलंबित आहे. नवीन वाघांना स्वत:ची टेरीटरी निश्चित करण्यासाठी पुरेसे वनक्षेत्र नसल्याची बाब लक्षात घेता, या याचिकेत अ‍ॅथोरिटीला प्रतिवादी करण्याची अनुमती मिळावी, याकरिता अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने तो अर्ज मंजूर करून अ‍ॅथोरिटीला या गंभीर प्रश्नावर स्पष्टीकरण मागितले.याचिकाकर्त्यांच्या माहितीनुसार, टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यातील वाघांची संख्या वाढली आहे. त्यामुळे त्यांना स्वत:ची टेरीटरी निश्चित करण्यासाठी टिपेश्वरचे वनक्षेत्र कमी पडत आहे. परिणामी, पाच वाघ टिपेश्वर वनातून बाहेर पडून पांढरकवडा वनक्षेत्रात स्थानांतरित झाले आहेत. पांढरकवडा वनक्षेत्रात वाघांना जगण्यासाठी आवश्यक असलेल्या वन्यजीवांची संख्या कमी आहे. त्यामुळे ते माणसे व पाळीव प्राण्यांवर हल्ले करीत आहेत. या परिस्थितीत वाघांकरिता वनक्षेत्राचा विस्तार करणे आवश्यक आहे. त्यासाठी अ‍ॅथोरिटीकडून निधी उपलब्ध व्हावा, अशी याचिकाकर्त्यांची विनंती आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. रवींद्र खापरे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयTigerवाघ