शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

'लोकमत नॅशनल मीडिया कॉनक्लेव्ह'; आजच्या माध्यमांच्या भूमिकेवर वरिष्ठ पत्रकारांचे मंथन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 21:05 IST

लोकमत नॅशनल मीडिया कॉन्क्लेव्हमध्ये वरिष्ठ पत्रकारांनी आजच्या माध्यमांच्या भूमिकेबद्दल परखड शब्दात आपलं मत व्यक्त केलं.

नागपूर : माध्यम, मीडियाला लोकशाहीचं चौथा स्तंभ म्हटलं जातं. माध्यम स्वतंत्रतेने, निर्भीडतेने समाजातील विविध घटक, घटना, माहिती जनसामान्यपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करीत असते. परंतु, गेल्या काही काळात मीडियाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. याच प्रश्नावरील चर्चेकरीता व त्याद्वारे समाजमनात निर्माण झालेल्या प्रश्नावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात वरिष्ठ पत्रकारांनी आजच्या माध्यमांच्या भूमिकेबद्दल परखड शब्दात आपलं मत माडंलं.

नागपुरच्या रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये दुपारी तीन वाजता या मीडिया कॉनक्लेव्हचे उद्घाटन करण्यात आले. लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते. तर, एएनआय अर्थात एशियन न्यूज इंटरनॅशनलच्या संपादक (वृत्त) स्मिता प्रकाश, न्यूज १८ चे व्यवस्थापकीय संपादक अमिश देवगण, एबीपीचे राष्ट्रीय संपादक विकास भदौरिया, पंजाब केसरी व नवोदया टाइम्सचे कार्यकारी संपादक अकु श्रीवास्तव, लोकमत मीडिया ग्रुपचे समूह संपादक विजय बाविस्कर, राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे, ज्येष्ठ पत्रकार व लोकमत समाचारचे पहिले संपादक एस. एन. विनोद, हिंदुस्थान टाइम्सचे सहयोगी संपादक प्रदीप मैत्र, एबीपी माझाच्या उप-कार्यकारी संपादक सरिता कौशिक, न्यूज १८ लोकमतचे संपादक आशुतोष पाटील आदि देशातील वरिष्ठ पत्रकार सहभागी झाले होते. 

माध्यमे समाजाचा आरसा, परंतु हा आरसा साफ ठेवणे पत्रकारांची जबाबदारी - अनुराग सिंह ठाकूर

जे विकू शकेल तीच बातमी आहे असं माध्यमांच्या कार्यालयात म्हटलं जाते. याला जबाबदार कोण? माध्यमांमध्ये अनेक उद्योगपतींचा पैसा लागलाय त्यामुळे हे असू शकते. आता या आव्हानांमधून बाहेर पडण्याचं काम पत्रकारांना करावे लागणार आहे. नव्या आव्हानात गुण-दोष दोन्ही पाहायला हवेत असं मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं.

 परदेशी माध्यमे भारताची विकसित देशाकडे होणारी वाटचाल रोखण्याचा प्रयत्न करतंय. कुणी असा प्रपोगेंडा बनवत आहे का? मोदींच्या नेतृत्वात जगात आर्थिकदृष्ट्या ५ व्या नंबरवर भारत आहे हे अन्य कुणाला बघवत नाही. भारताने कोरोना लस उत्पादित कशी केली? ६० कोटी लोकांना वर्षाला आरोग्य सुविधा मोफत कशी दिली जाते? डिजिटल युगाकडे भारत जातोय. हे सत्य आहे जे काही देशांना पाहावत नाही. जे सत्य आहे ते समोर येणारच आहे. यामागे नेमकं काय चाललंय हे समजून घ्यायला हवं असं मंत्री अनुराग ठाकूर यांनी मांडले. 

दुषित दृष्टीनं जे पाहू ते दुषितच दिसते'- सुधीर मुनगंटीवार

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी, भारतीय मीडियाचं ध्रुवीकरण झाले का या विषयावर बोलताना 'नाही! या देशात मीडियाचं ध्रुवीकरण होऊ शकत नाही व होणारही नाही असे मत व्यक्त केले. ध्रुवीकरण म्हणजे आपल्या विचारांची बाब आहे. पत्रकारिता करताना दुषित दृष्टीचे परिणाम आपल्याला सत्याची बाजू मांडायला अडसर ठरते. पत्रकारिता करताना पत्राकाराची संबंधित विषयाबाबतची दृष्टी महत्वाची असून ती राष्ट्राच्या हिताची असावी मत त्यांनी व्यक्त केलं.

विचारांची लढाई हा लोकशाहीचा सर्वात मोठा कणा - राहुल पांडे

माध्यमांचे धुव्रीकरण आपण बोलतोय पण समाजाचं धुव्रीकरण झाले असेल तर त्याचे प्रतिबिंब माध्यमांमध्ये दिसते. माध्यमे हा समाजाचा आरसा आहेत. बोटचेपी धोरण, गोलमेज भाषा वापरायची का हा प्रश्न आहे. १९४७ ते आज आपण स्वातंत्र्याचं ७५ वा अमृत महोत्सव साजरा करतोय. या कालावधीत माध्यमात धुव्रीकरण राहणारच आहेत. समाजात राजकीय, आर्थिक, सामाजिक या विषयांवर वेगवेगळे विचार असणार आहेत. विचारांची लढाई हा लोकशाहीचा सर्वात मोठा कणा आहे असं मत राज्याचे माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी मांडले. 

आजच्या काळात आणीबाणीचा काळ आठवण गरजेचं - अकु श्रीवास्तव

 आजच्या काळात आणीबाणीचा काळ आठवण गरजेचं आहे. कारण, आजच्या चर्चेचा विषय आहे की, माध्यमाचं धुव्रीकरण झालंय का? याचाच अर्थ देशातील लोकशाही जिवंत आहे की नाही, असेही कोणीतरी म्हणू शकते. मात्र, परिस्थिती आज तशी नाही. आपण जो अनुभव घेतलाय, गेल्या ६० ते ७० वर्षात त्यात निश्चित बदल झालाय. आम्ही जेव्हा रेशनच्या दुकानात जात होतो, तेव्हा तो दुकानदारही भल्यामोठ्या रांगतून हाकलून देत होता. तिथं स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि इतरही लोकं गप्प बसत होते, तिथे पत्रकार तरी काय आवाज उठवणार?, असे म्हणत आज पत्रकारितेतून आवाज बुलंद झालाय, असे अकु श्रीवास्तव यांनी म्हटले. 

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटLokmatलोकमतnagpurनागपूरMediaमाध्यमेJournalistपत्रकार