शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

हापूसची तहान बैगनपल्लीवर; अवकाळी पावसामुळे दर्जा घसरला

By मोरेश्वर मानापुरे | Updated: April 24, 2023 19:06 IST

Nagpur News यंदा अवकाळी पावसामुळे आंब्याचा दर्जा घसरला असून ठोकमध्ये दर्जानुसार १० ते ४० रुपये किलो भाव आहेत. रत्नागिरीचा हापूस ८०० रुपये डझन आहे.

नागपूर : अक्षयतृतीयेपासून आंब्याच्या विक्रीत वाढ होते. सर्वाधिक विक्रीचा बैगनपल्ली आंब्याचे १८० ते २०० मिनी ट्रक (प्रत्येकी ३ ते ४ टन) कळमन्यात दररोज विक्रीसाठी येत आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत आवक वाढली आहे. यंदा अवकाळी पावसामुळे आंब्याचा दर्जा घसरला असून ठोकमध्ये दर्जानुसार १० ते ४० रुपये किलो भाव आहेत. रत्नागिरीचा हापूस ८०० रुपये डझन आहे. जास्त भावामुळे नागरिकांना हापूसची तहान बैगनपल्लीवर भागवावी लागत आहे.

नागपुरात आंध्रप्रदेशातील बैगनपल्ली आंब्याला सर्वाधिक मागणी आणि पसंती असून तेलंगना आणि आंध्रप्रदेश राज्यातून येतात. प्रारंभी ५० ते ६० रुपये भाव होते. आवक वाढल्यानंतर भाव कमी झाले. बैगनपल्लीची आवक मे महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू राहणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. ज्यावर्षी चिंच उत्पादनाचे प्रमाण कमी असते, त्यावर्षी आंबे जास्त प्रमाणात येतात, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. त्यानुसार यंदा कळमन्यात आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भाव कमी असल्यामुळे घरोघरी आमरसाचा पाहुणचार सुरू आहे. किरकोळ बाजारात बहुतांश हातगाड्यांवर बैगनपल्लीची विक्री मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. 

दशेरी, तोतापल्ली, लंगडा आंब्याची सोमवारपासून विक्रीअक्षयतृतीयेनंतर कळमन्यात सोमवारी पहिल्या दिवशी लोकल दशेरी, तोतापल्ली आणि गावरानी लंगडा आंब्याची विक्री सुरू झाली. याआधी आंध्रप्रदेशातून येणारा तोतापल्ली आंब्याची आवक संपली आहे. आता भिवापूर, मांढळ, कुही, तुमसर, गोंदिया, वरूड येथून आवक सुरू झाली आहे. कळमन्यात लोकल दशेरी आंबा ८० रुपये, गावरानी लंगडा ३० ते ६० रुपये आणि तोतापल्लीचे २० ते ३० रुपये किलो भाव आहेत. सोमवारी तिन्ही प्रकारच्या आंब्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगिले.

केशर आंबा ६० ते ८० रुपये किलोकळमन्यात केशर आंब्याची आवक सुरू आहे. आंध्रप्रदेशातील केशर आंबा ६० ते ७० रुपये आणि गुजरातचा केशर आंबा ८० रुपये किलो आहे. गुजरातचा केशर १० किलो पॅकिंगमध्ये येतो.

रत्नागिरीचा हापूस खातोय भावहापूस हा आंब्याचा राजा समजला जातो. नागपुरात या आंब्याची खरेदी करणारा विशेष वर्ग आहे. कळमन्यात दररोज डझनाच्या १०० पेट्यांची आवक आहे. दर्जानुसार भाव ७०० ते ८०० रुपये आहेत.

आवक वाढली; भावही उतरलेसध्या बैगनपल्ली, केशर, दशेरी, तोतापल्ली, गावरान लंगडा, केशर आणि हापूस आंब्याची सुरू आहे. यंदा आवक जास्त असल्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत भाव कमी आहेत. सर्वाधिक विक्रीचा बैगनपल्लीची आवक तेलंगना आणि आंध्रप्रदेशातून होत आहे. मे महिन्यात भाव कमी होतील.आनंद डोंगरे, अध्यक्ष, कळमना फळे बाजार असोसिएशन.

टॅग्स :fruitsफळे