शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात हिवसाळ्यात गारपिटीचा मार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 22:31 IST

गुरुवारी तर थंडी, पाऊस यात भरीस भर म्हणून गारपीटदेखील झाली व शहराने निसर्गाची विचित्र महाआघाडी अनुभवली. ऐन हिवाळ्यात नागपूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे जनसामान्यांसह शेतकऱ्यांनादेखील मोठा फटका बसला आहे.

ठळक मुद्देनिसर्गाची विचित्र महाआघाडीउपराजधानीकर गारठले, बोचऱ्या थंडीने हैराणशहरात काही तासातच ३६ मिमी पाऊस, पाऱ्याने विशीदेखील गाठली नाहीजिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले : पिकांचे नुकसान, शेतकरी हवालदिल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीतील हिवाळा म्हणजे कसा...हवीहवीशी थंडी अन् जोडीला उबदार ‘स्वेटर्स’ची मजा. मात्र हिवाळ्यात अंगात ‘स्वेटर’ घालायचे की ‘रेनकोट’ असा प्रश्न निर्माण झाला तर! एरवी उन-पावसाचा खेळ नेहमीच अनुभवणाऱ्या नागपूरकरांसाठी मागील काही दिवस अक्षरश: परीक्षेचे ठरत आहेत. गुरुवारी तर थंडी, पाऊस यात भरीस भर म्हणून गारपीटदेखील झाली व शहराने निसर्गाची विचित्र महाआघाडी अनुभवली. ऐन हिवाळ्यात नागपूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे जनसामान्यांसह शेतकऱ्यांनादेखील मोठा फटका बसला आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आधीच संकटात असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परत एकदा अस्मानी संकटाचा धक्का बसला आहे. 

नागपूर जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री गारपिटीसह पाऊस झाला तर शहरात गुरुवारी सकाळपासूनच वादळासह पाऊस सुरू झाला. बऱ्याच ठिकाणी तर गारपीटदेखील झाली. यात प्रामुख्याने खामला, गोपालनगर, प्रतापनगर, दीनदयालनगर, सहकारनगर यासह दक्षिण-पश्चिम नागपुरातील अनेक भागांचा समावेश होता. काही ठिकाणी तर गारांचा खच पडला होता. सकाळी ८.३० पासून ते सायंकाळपर्यंत नागपुरात ३६.८ मिमी पावसाची नोंद झाली. २४ तासात शहरात ५०.२ मिमी पाऊस झाला. सकाळच्या सुमारास पावसाचा जोर जास्त होता. दिवसभर बोचऱ्या थंडीमुळे नागरिक हैराण झाले होते.
पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले होेते. यामुळे विद्यार्थ्यांची तसेच चाकरमान्यांची फारच तारांबळ उडाली. अनेक विद्यार्थ्यांना पावसाचा व थंडीचा जोर वाढल्यामुळे शाळांमध्ये जाताच आले नाही. नागरिकांना भरले कापरेउत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे विदर्भातच तापमान घटले आहे. शिवाय शहरात पाऊस असल्याने दिवसभरात तापमानात ९ अंशांची घट दिसून आली. कमाल तापमान १८.४ अंश सेल्सिअस इतके होते तर किमान तापमान १२.३ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. पाऱ्याने २० अंशांची पातळीदेखील गाठली नाही. पाऊस, गारपीट, वारा यामुळे नागरिकांना अक्षरश: कापरे भरले होते व शहरच कुडकुडताना दिसून आले. पुढील २४ तासात वातावरण ढगाळलेले असेल व पाऊस येण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविलेला आहे.शेतकऱ्यांवर अस्मानी संकट
दुसरीकडे गारपीट आणि वादळ व अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील संत्रा, मोसंबीसह खरीप व रब्बी तसेच भाजीपाल्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील नरखेड, काटोल, कळमेश्वर आणि सावनेर तालुक्यातील काही भागांमध्ये गारपीट झाली. गारपिटीमुळे कळमेश्वर तालुक्यातील मोहपा तसेच नरखेड तालुक्यातील सावरगाव व जलालखेडा परिसरातील संत्र्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या चार तालुक्यांसह हिंगणा, कामठी, नागपूर (ग्रामीण), पारशिवनी, रामटेक, मौदा, कुही, उमरेड व भिवापूर तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे झाडांना असलेला कापूस भिजला असून, गहू जमिनदोस्त झाला आहे. शिवाय, तुरी, हरभरा आणि भाजीपाल्याच्या विविध पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.पिकांना कसा मिळणार समाधानकारक भाव ?गारांचा मार लागल्याने संत्रा आणि पावसामुळे कापूस व इतर पिकांचा दर्जा खालावणार असल्याने त्यांना बाजारात समाधानकारक भाव मिळणार नाही. जिल्ह्यातील बहुतांश भागातील हरभऱ्याचे पीक फुले फळांवर (घाटे)आले आहे. या काळात हरभऱ्याच्या झाडांना खार येतो. पावसामुळे हा खार धुतल्या गेल्याने हरभऱ्याचे घाटे भरण्याची शक्यता मावळली आहे. शिवाय, धुके व ढगाळ वातावरणामुळे तूर, हरभरा, फुलकोबी, पानकोबी या पिकांवर मोठ्या प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. या किडींच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना महागड्या कीटकानाशकांची फवारणी करावी लागणार असल्याने त्या पिकांचा उत्पादनखर्च वाढणार आहे.‘स्वेटर’वर ‘रेनकोट’घराबाहेर निघताना ‘रेनकोट’ घालावा की ‘स्वेटर’ असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित झाला होता. घसरलेला पारा, पाऊस आणि बोचरा वारा यामुळे शहरात ‘हिवसाळा’ या नव्या ऋतूत अनेक जण ‘स्वेटर’वर ‘रेनकोट’ घालून जाताना दिसून आले.‘हिल स्टेशन’चा अनुभवसाधारणत: डिसेंबर महिन्यात उपराजधानीत पाऊस पडत नाही. मात्र गुरुवारी गारपिटीसह झालेल्या पावसामुळे शहराचे तापमान २० अंशांहून अधिक गेले नाही. त्यामुळे सगळीकडेच ‘हिल स्टेशन’चा अनुभव येत होता. विशेषत: फुटाळा तलाव परिसर, सेमिनरी हिल्स, सिव्हील लाईन्ससारख्या भागांमध्ये तर वातावरणत तसेच झाले होते. दिवसादेखील शहरातील विविध भागात शेकोट्या पेटविण्यास सुरुवात झाली.नरेंद्रनगरात वाहतूक कोंडी
नरेंद्रनगर रेल्वेपुलाखाली नेहमीप्रमाणे पाणी जमा झाले. यामुळे एका बाजूने जाणारी वाहतूक पूर्णत: बंद झाली होती. जमलेल्या पाण्यात चारचाकी वाहनेदेखील अडकली होती. दुसरा भाग सुरू असला तरी वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. याशिवाय लोखंडी पूल, धंतोली आरओबी येथेदेखील पाणी साचले होते व वाहतूक कोंडी होती.नवीन ‘आरओबी’ पाण्यातमनीषनगर ते वर्धा मार्गदरम्यान नवीन ‘आरओबी’चे बांधकाम सुरू आहे. याचे काम वेगाने सुरू असून येथे कुठल्याही प्रकारे पाणी साचणारच नाही अशी व्यवस्था केल्याचे दावे प्रशासनाकडून करण्यात आले होते. परंतु गुरुवारी झालेल्या पावसाने या दाव्यांची पोलखोल केली. नवीन ‘आरओबी’त पाणी जमा झाले होते व तेथून पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नव्हता. भरीस भर म्हणून उज्ज्वलनगरमधील रस्त्यांवरील साचलेले पाणीदेखील सातत्याने ‘आरओबी’त पडत होते. आताच याची अशी स्थिती आहे तर प्रत्यक्ष येथे वाहतूक सुरू झाल्यावर काय चित्र असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर