शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

गुरूपौर्णिमा विशेष; तरुणाईच्या ध्येयातून साकारले वंचित मुलांचे ज्ञानमंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 10:19 AM

आर्थिक परिस्थितीमुळे कधी शिक्षणाचा मार्ग थांबतो किंवा सोईसुविधांच्या अभावामुळे तो माघारला जातो. शहरातील रामबाग वस्तीत राहणाऱ्या गरीब मुलांचीही हीच अवस्था आहे. पण अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी भक्कम आधार या मुलांना आता सापडला आहे.

ठळक मुद्देविवंचनेतून भरारी घेतलेल्या उच्चशिक्षितांचा छंद देतोय अनेकांच्या आयुष्याला दिशाविविध सामाजिक उपक्रमातही योगदान

आनंद डेकाटे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : झोपडपट्टी किंवा गरीब वस्त्यातील मुलेही हुशार असतात पण हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे कधी शिक्षणाचा मार्ग थांबतो किंवा सोईसुविधांच्या अभावामुळे तो माघारला जातो. शहरातील रामबाग वस्तीत राहणाऱ्या गरीब मुलांचीही हीच अवस्था आहे. पण अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी भक्कम आधार या मुलांना आता सापडला आहे. हा आधार आहे या वस्तीत शिकविणाऱ्या उच्चशिक्षित तरुणांचा. गुरू आपल्या मार्गातील अडचणी दूर करतो व दिशा दाखवितो. हे तरुणही गरीब मुलांसाठी शिक्षणाच्या मार्गाने लावणारे दिशादर्शक झाले आहेत.सुनील जवादे, धर्मपाल धाबर्डे, राजू गायकवाड, अभिनव मेंढे, शुभम ढेंगरे, प्रशिक वाहाने, ऋषभ जवादे, साहिल धाबर्डे ही आहेत गरीब मुलांच्या गुरुस्थानी असलेले तरुण. रामबागसारख्या गरीब व मागासलेल्या वस्तीत ते वाढले. स्वत:च्या मेहनतीने शिकले. उच्च विद्याविभूषित झाले. एखादा नोकरीवर लागला तर इतर अजूनही शिक्षण घेत नोकरीच्या शोधात आहेत. समोर उज्ज्वल भविष्य असून आपणही समाजाचे काही देणे लागतो, या उद्देशाने या तरुणांनी गरीब विद्यार्थ्यांना शिकवणी देण्याचा निर्णय घेतला. कदाचित याच विवंचना असलेल्या परिस्थितीतूनच ते गेले आहेत. त्यातील राजू गायकवाड हे जीएसटी अधिकारी आहेत. अभिनव मेंढे मेकॅनिकल इंजिनियर, शुभम ढेंगरे हा सुद्धा मेकॅनिकल इंजिनियर आहे. साहिल धाबर्डे व ऋषभ हा डिप्लोमा इन फायर इंजिनियर आहेत. रामबाग परिसरात तथागत बहुउद्देशीय संस्था आहे. संस्थेंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती आदींसह विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात.२०१५ सालची ही गोष्ट. रामबाग हा परिसर तसा गरीब, कामगार कष्टकऱ्यांचा परिसर. बहुतांश विद्यार्थी हे हुशार परंतु शिकवणी नसल्याने स्पर्धेत माघारतात. परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना काम करावे लागते. त्यामुळे अभ्यासात मागे राहतात. असे अनेक अनुभव या तरुणांनी जवळून पाहिले होते. त्यामुळे किमान आपण चांगले शिकलो तेव्हा इतर गरीब विद्यार्थ्यांंची शिकवणी घ्यायची असा निर्णय या तरुणांनी घेतला. सर्वांना ही कल्पना आवडली. यासाठी एक बॅनर तयार करण्यात आला. तथागत अभ्यासिका असे नाव देण्यात आले. या तरुणांनी संपूर्ण वस्तीत फिरून असे गरजू विद्यार्थी शोधले. त्यांच्या पालकांना सांगितले. तेही तयार झाले.तथागत बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यालयातच अभ्यासिका सुरू झाली. सुरुवातीला विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. परंतु हळूहळू ती वाढली. परिसरातील लोकांचाही विश्वास वाढला. आज ५ वी पासून १२ वीपर्यंतचे अनेक गरीब विद्यार्थी येथे शिकवणीसाठी येतात. अभिनव, साहिल, शुभम आणि ऋषभ हे १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचे विशेष वर्ग घेतात. याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. गेल्या वर्षी दहावीत अनेक विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. या ध्येयशील तरुणांच्या प्रयत्नांनी विद्यार्थ्यांनाही शिकण्याची एक ओढ लागली असून अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेत चांगले यश प्राप्त केले आहे. चांगल्या विचारांनी, संस्काराने समाज घडविणारे गुरुच तर असतात. हे उच्चशिक्षित तरुण त्यापेक्षा काही वेगळे नव्हेत.

शिकवणीमुळे लागली शाळेची ओढया तरुणांनी सुरू केलेला हा एक छोटाचा प्रयत्न आहे. यातून दहावी-बारावीमध्ये विद्यार्थी एकदम चांगले गुण मिळवू लागले असेही नाही. परंतु या लहानशा पुढाकाराने एक खूप मोठे काम झाले आहे. कदाचित ही मुले शिक्षण सोडून वेगळ्या मार्गाला लागली असती. पण तरुणांच्या शिकवणीमुळे अनेक विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शाळेची ओढ लागली. ते शाळेत जाऊ लागले. नियमित अभ्यास करू लागले. शिकून जीवनात काहीतरी बनू असे स्वप्न पाहू लागले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रGuru Purnimaगुरु पौर्णिमा