शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
4
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
5
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
6
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
7
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
8
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
9
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
10
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
11
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
12
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
13
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
14
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
15
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
16
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
17
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
18
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
19
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

गुरुपौर्णिमा विशेष: गुरुदेव सेवाश्रमाचा मानव कल्याणाचा वसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 10:27 AM

गुरुदेव सेवाश्रमातून राष्ट्रसंताचे हेच विचार आणि मानव कल्याणाचा प्रसार समाजाच्या तळागळापर्यंत पोहचविला जात आहे.

ठळक मुद्देपरिवर्तनाचा विचार समाजात पेरला

मंगेश व्यवहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘गुरु हाडामांसाचा नोव्हे, गुरु नव्हे जाति-संप्रदाय, गुरु शुद्ध ज्ञानतत्त्वची आहे, अनुभवियांचे’ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हाडामांसाच्या व्यक्तीला गुरू समजून त्याची पूजा करण्यापेक्षा, त्याचे तत्त्वज्ञान जे सत्याच्या मार्गावर असेल त्याची पूजा करा, असे प्रबोधन केले आहे. गुरुदेव सेवाश्रमातून राष्ट्रसंताचे हेच विचार आणि मानव कल्याणाचा प्रसार समाजाच्या तळागळापर्यंत पोहचविला जात आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामहितापासून राष्ट्रहितापर्यंतची संकल्पना मांडली आहे. महाराजांनी स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळातही सेवाभाव, राष्ट्रहित, मानवकल्याण हे विचार समाजात रुजविले आहे. राष्ट्रसंतांच्या या विचारांनी प्रभावित होऊन ते हयात असताना देशभरात ४० हजार शाखा स्थापन झाल्या होत्या. त्याकाळी सामान्यजनांपासून राज्यकर्तेही त्यांच्या विचारांचे पाईक होते. पण राष्ट्रसंतांनी गुरु म्हणून कुणालाही माळ घातली नाही आणि कानही फुंकले नाही. राष्ट्रसंतांनी गुरुला देव मानले. त्यामुळे त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेला गुरुदेव असे नाव दिले. गुरुदेव मासिक, गुरुदेव विद्यामंदिर, श्रीगुरुदेव सेवाश्रम, श्री गुरुदेव आदर्श विवाह संस्था, श्री गुरुदेव सेवामंडळ या संस्था उभारल्या. राष्ट्रसंत या संस्थांबद्दल म्हणतात, या संस्था तुकडोजी महाराजांच्या चेल्याचपाट्यांच्या संस्था नाही, तर परिवर्तनाचा विचार आहे. खरोखरच राष्ट्रसंतांनी या संस्थांच्या माध्यमातून परिवर्तनाचा विचार समाजात पेरला.परंतु आज समाजात गुरुचे पीक आलेले दिसते. देवभोळे लोक गुरुच्या पूजनात धन्यता मानत आहे. त्यांचा गुरु कारागृहाच्या आत असला तरी, त्याच्या पूजनाचे भव्य सोहळे साजरे होत आहे. अंधश्रद्धेत समाजाला बुडविणाऱ्या गुरुंना राष्ट्रसंतांनी कुत्र्याची उपमा दिली आहे. सोबतच ज्या व्यक्तीला आपण श्रद्धास्थानी पूजतो, त्या गुरुच्या विद्वत्तेची पारख करण्यास सांगितले आहे. गुरुबद्दलचे आजही हे तत्त्वज्ञान गुरुदेव सेवाश्रमातून प्रचारक समाजात रुजवित आहे. गुरुदेव सेवाश्रमात गुरुपूजन सोहळ्यात राष्ट्रसंतांचे पूजन न करता त्यांचे विचार पुजले जात आहे.राष्ट्रसंतांनी गुरुदेव या शब्दाची फोड ‘अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा, अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा’ अशी केली आहे. हे सत्कार्य करणाºया प्रत्येक व्यक्तीला गुरु मानले आहे. त्यामुळे गुरुदेव सेवाश्रमाशी जुळलेली सर्व मंडळी एकमेकांशी भेटल्यानंतर ‘जयगुरु’ असे संबोधतात. कारण प्रत्येक व्यक्ती ही महान असल्याचे ते समजतात.राष्ट्रसंतांपासून प्रभावित होऊन अनेकजण त्यांना गुरू करण्यास इच्छुक होते. पण तुकडोजी महाराज त्यांना वेडा असे संबोधून रोज प्रार्थना, ज्ञान करीत जा आणि त्यानुसार जगत जा, असा सल्ला द्यायचे. राष्ट्रसंतांचा हाच कित्ता आजही गुरुदेव सेवाश्रम, गुरुदेव सेवामंडळातून गिरविला जात आहे.- ज्ञानेश्वर रक्षक, उपसेवाधिकारी,श्री गुरुदेव सेवाश्रम नागपूर

 

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमा