शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

शाळांमधून हवे वाहतूक नियमांचे मार्गदर्शन - शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 11:15 IST

रस्ता सुरक्षा सप्ताहाचा समारोप

नागपूर : शालेय जीवनात बालमनावर संस्कार घडतात. याच काळात विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन गरजेचे असते. त्यामुळे रस्ते अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होईल. म्हणूनच शाळांमधून वाहतूक नियमांचे मार्गदर्शन मिळावे, अशा भावना आज शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांनी येथे व्यक्त केल्या.

११ जानेवारीपासून राबविण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचा समारोप मंगळवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात झाला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मंचावर वाहतूक शाखेच्या उपायुक्त चेतना तिडके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक श्रीकांत गभने, प्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) रवींद्र भुयार, प्रादेशिक परिवहन अधिकारी (ग्रामीण) विजय चव्हाण उपस्थित होते. रस्ता वापरणाऱ्या घटकांकडून वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन होणे गरजेचे असल्याचे चेतना तिडके म्हणाल्या.

- विद्यार्थिदशेत सुरक्षित वाहतुकीचे धडे

विद्यार्थिदशेत सुरक्षित वाहतुकीचे धडे दिल्यास भविष्यात वाहतुकीचे नियम पाळले जातील व अपघातांची संख्या कमी होईल, असे प्रतिपादन विजय चव्हाण यांनी प्रास्ताविकेतून केले. रवींद्र भुयार म्हणाले की, अपघाताची कारणे फार छोटी असतात, त्याकडे लक्ष वेधण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळण्याची सवय लावा, असे आवाहनही त्यांनी केले. संचालन कांचन देशपांडे यांनी केले.

- ‘रोड रेस गेम’मधून जनजागृती

वर्धेचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी समीर शेख यांनी ‘रोड रेस गेम’बद्दल माहिती देत उपस्थित विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत वाहतूक नियमांविषयी जनजागृती केली. यावेळी अपघातविरहित अनेक वर्षे सेवा देणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या चालकांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, तसेच जनआक्रोश, रोड मार्क, जनजागरण आदी संस्थांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Educationशिक्षणroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकnagpurनागपूर