शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

शाळांमधून हवे वाहतूक नियमांचे मार्गदर्शन - शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 11:15 IST

रस्ता सुरक्षा सप्ताहाचा समारोप

नागपूर : शालेय जीवनात बालमनावर संस्कार घडतात. याच काळात विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन गरजेचे असते. त्यामुळे रस्ते अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होईल. म्हणूनच शाळांमधून वाहतूक नियमांचे मार्गदर्शन मिळावे, अशा भावना आज शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांनी येथे व्यक्त केल्या.

११ जानेवारीपासून राबविण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचा समारोप मंगळवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात झाला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मंचावर वाहतूक शाखेच्या उपायुक्त चेतना तिडके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक श्रीकांत गभने, प्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) रवींद्र भुयार, प्रादेशिक परिवहन अधिकारी (ग्रामीण) विजय चव्हाण उपस्थित होते. रस्ता वापरणाऱ्या घटकांकडून वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन होणे गरजेचे असल्याचे चेतना तिडके म्हणाल्या.

- विद्यार्थिदशेत सुरक्षित वाहतुकीचे धडे

विद्यार्थिदशेत सुरक्षित वाहतुकीचे धडे दिल्यास भविष्यात वाहतुकीचे नियम पाळले जातील व अपघातांची संख्या कमी होईल, असे प्रतिपादन विजय चव्हाण यांनी प्रास्ताविकेतून केले. रवींद्र भुयार म्हणाले की, अपघाताची कारणे फार छोटी असतात, त्याकडे लक्ष वेधण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळण्याची सवय लावा, असे आवाहनही त्यांनी केले. संचालन कांचन देशपांडे यांनी केले.

- ‘रोड रेस गेम’मधून जनजागृती

वर्धेचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी समीर शेख यांनी ‘रोड रेस गेम’बद्दल माहिती देत उपस्थित विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत वाहतूक नियमांविषयी जनजागृती केली. यावेळी अपघातविरहित अनेक वर्षे सेवा देणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या चालकांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, तसेच जनआक्रोश, रोड मार्क, जनजागरण आदी संस्थांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Educationशिक्षणroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकnagpurनागपूर