शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
2
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: एटीएममधून मतदारांना मतदानासाठी पैसे वाटण्यात आले, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
3
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
4
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
5
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
6
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
7
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
8
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
9
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
10
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
11
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड
12
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
13
Multibagger Stock: ४ वर्षांत ₹१ लाखांचे झाले ४० लाख, दीड रुपयांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे मालामाल
14
Reliance Power Share Price : ₹४५० वर आलेला IPO, आता ₹२६ वर आला हा पॉवर शेअर; एक्सपर्ट म्हणाले...
15
“पंतप्रधान प्रचंड घाबरले, म्हणून मला भटकती आत्मा, राहुल गांधींना शहजादा म्हणाले”: शरद पवार
16
सोनं पुन्हा महागणार, ७५,००० रुपयांच्या पुढे जाणार; इराणमधून आली मोठी बातमी
17
अपघात की हत्या? राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमागे इस्रायलचे षड्यंत्र? चर्चांना उधाण...
18
IPL 2024: RCB कडून खेळण्यापेक्षा त्यांचा सामना पाहणं खूप कठीण; असं का म्हणाली स्मृती?
19
एका कोंबड्यानं घेतला तिघांचा जीव; दोन भावांसह एका युवकाचा मृतदेह विहिरीत सापडला
20
बेडरुममध्ये नोटांचा ढीग, 50 कोटींची रोकड जप्त; IT च्या छापेमारीत सापडलं कोट्यवधींचं घबाड

महाराष्ट्रातील विद्यापीठांचे ‘रँकिंग’ वाढविण्यासाठी ‘कन्सलटन्सी’चे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 11:31 PM

‘एनआयआरएफ’मध्ये (नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क) महाराष्ट्रातील विद्यापीठांचे देशातील स्थान हा एक चिंतेचा विषय आहे. राज्यातील विद्यापीठांचे ‘रँकिंग’ वाढावे यासाठी राज्य शासनाने एक वेगळाच मार्ग अवलंबला आहे. एका खासगी ै‘कन्सलटन्सी’सोबत विविध विद्यापीठांना सामंजस्य करार करण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. या ‘कन्सलटन्सी’च्या मार्गदर्शनात विद्यापीठांना ‘रँकिंग’ वाढविण्याचे प्रयत्न करायचे आहेत. मात्र खरोखरच एखाद्या ‘कन्सलटन्सी’सोबत करार वाढल्याने विद्यापीठांचा दर्जा वाढणार आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देशासनाच्या निर्देशांनुसार खासगी कंपनीशी करार : खरोखरच दर्जा वाढणार का ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘एनआयआरएफ’मध्ये (नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क) महाराष्ट्रातीलविद्यापीठांचे देशातील स्थान हा एक चिंतेचा विषय आहे. राज्यातील विद्यापीठांचे ‘रँकिंग’ वाढावे यासाठी राज्य शासनाने एक वेगळाच मार्ग अवलंबला आहे. एका खासगी ‘कन्सलटन्सी’सोबत विविध विद्यापीठांना सामंजस्य करार करण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. या ‘कन्सलटन्सी’च्या मार्गदर्शनात विद्यापीठांना ‘रँकिंग’ वाढविण्याचे प्रयत्न करायचे आहेत. मात्र खरोखरच एखाद्या ‘कन्सलटन्सी’सोबत करार वाढल्याने विद्यापीठांचा दर्जा वाढणार आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.२०१६ सालच्या ‘एनआयआरएफ’च्या पहिल्या १०० ‘रँकिंग’मध्ये महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांचा समावेश होता. तर २०१७ व २०१८ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वगळता एकाही सार्वजनिक विद्यापीठाचा पहिल्या शंभर विद्यापीठांमध्ये समावेश नव्हता.राज्यातील विद्यापीठांचे ‘रँकिंग’ वाढावे यासाठी राज्य शासनाने ‘आय केअर’ या एका खासगी ‘कन्सलटन्सी’ला नियुक्त केले आहे. राज्यातील सर्व अकृषी सार्वजनिक विद्यापीठे व १०० महाविद्यालयांसमवेत या ‘कन्सलटन्सी’चा सामंजस्य करार करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. त्यानुसार विविध विद्यापीठांना संबंधित प्राधिकरणांमध्ये मान्यता घेण्यास सांगण्यात आले होते.यानुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची सोमवारी व्यवस्थापन परिषदेची तातडीची बैठक बोलविण्यात आली. यात हा प्रस्ताव ठेवण्यात आला व सामंजस्य करार करण्याच्या मुद्द्याला मंजुरी देण्यात आली, अशी माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.खरोखर किती फायदा होणार ?या ‘कन्सलटन्सी’ने कर्नाटक, तामिळनाडू, राजस्थान येथील विद्यापीठांसाठी काम केले आहे. आता राज्यातील विद्यापीठांचे राष्ट्रीयसोबतच आंतरराष्ट्रीय ‘रँकिंग‘ वाढविण्यासाठी या ‘कन्सलटन्सी’कडून मार्गदर्शन करण्यात येईल, असे नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.नीरज खटी यांनी सांगितले. नागपूर विद्यापीठाशी संलग्नित नऊ महाविद्यालयांचादेखील या ‘कन्सलटन्सी’सोबत करार होणार आहे. मात्र राज्यातील विद्यापीठांचा एकूण पसारा पाहता एखाद्या ‘कन्सलटन्सी’च्या मार्गदर्शनाने खरोखरच काही कालावधीतच बदल होईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :universityविद्यापीठMaharashtraमहाराष्ट्र