शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

ग्राउंड रिपोर्ट - नागपुरातील ‘हायप्रोफाइल’ लढतीची रंगत वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 07:56 IST

बसप, बीआरएसपी, वंचितचाही जोर। संघ परिवारासह भाजप ताकदीने मैदानात

कमलेश वानखेडे

नागपूर - भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रिंगणात असलेल्या नागपूरच्या ‘हायप्रोफाइल’ जागेकडे राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. भंडारा- गोंदियाच्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपाला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये सामील झालेले नाना पटोले त्यांना आव्हान देत आहेत. बसपा, वंचित बहुजन आघाडी व बीआरएसपीनेही आपला ग्राफ वाढविण्यासाठी ताकद लावली आहे.

गडकरी प्रचारात त्यांनी पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडत आहेत, तर काँग्रेसचे नाना पटोले हे नेत्यांचा विकास झाल्याचे सांगत भाजपाला लक्ष्य करीत आहेत. भाजप देशहित, विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढत असून काँग्रेसची भिस्त सामाजिक समीकरणांवर असल्याचे दिसते. भाजपासह संघ परिवार एकदिलाने ‘गड’ सर करण्यासाठी उतरला आहे. तर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीही तूर्तास दबा धरून बसली आहे.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ९ एप्रिल रोजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सभेचा ‘मास्टरस्ट्रोक’ भाजपा मारणार आहे. दुसरीकडे काँग्रेससाठी प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची एखाद दुसरी सभा वगळता स्टार प्रचारक फिरकलेले नाहीत. गुरुवारी राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी सभा घेत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला.बहुजन समाज पक्षाने बाहेरचा उमेदवार देण्याची प्रथा यावेळी खंडित केली. नगरसेवक मोहम्मद जमाल यांना हत्तीवर स्वार केले. शिवाय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांच्या शुक्रवारच्या सभेने ‘हत्ती’ धावण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीने प्रदेश सरचिटणीस सागर डबरासे यांच्यावर डाव लावला आहे. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि खा. असदुद्दीन ओवेसी यांनी नागपुरात जाहीर सभा घेत प्रचाराची धुरा सांभाळली. बसपाला खिंडार पाडत ‘बीआरएसपी’ हा नवा पक्ष स्थापन करणारे पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश माने रिपब्लिकन मते खेचण्यासाठी जोर लावताना दिसत आहेत. अ‍ॅड. श्रीहरी अणे, माजी आ. अ‍ॅड. वामनराव चटप यांच्यासह विदर्भवादी पक्ष व संघटनांचे बळ त्यांच्या कामी लागले आहे.नागपूरच्या ‘मिहान’चा जुन्या मुख्यमंत्र्यांनी फक्त ‘बँडबाजा’ वाजविला. आम्ही प्रत्यक्षात स्वप्न साकार केले. अवघ्या तीन वर्षात मेट्रो धावली. आयआयएम, एम्स, एमएनएसयू, ट्रीपल आयटी, जीईसी एकापाठोपाठ झाले सुरू झाले. युवकांना रोजगार देण्याचे लक्ष्य पूर्ण केले.- नितीन गडकरी, भाजपापाच वर्षांत शहराला खोदण्याचे काम केले. सिमेंट रस्त्यांमुळे मनपावर कर्जाचा डोंगर वाढला. प्रकल्पाच्या नावाखाली मोक्याच्या जागा बळकावल्या. नवीन उद्योग न येता मिहानमधील उद्योग बंद पडले. लोकांना नोकऱ्या तर मिळाल्या नाहीत. नेमका विकास कुणाचा झाला, हाच खरा प्रश्न आहे.-नाना पटोले, काँग्रेसप्रमुख उमेदवारनितीन गडकरी । भाजपनाना पटोले । काँग्रेसमोहम्मद जमाल । बसपकळीचे मुद्देभाजपासह संघ परिवार ‘गड’ सर करण्यासाठी एकदिलाने विकासाचा अजेंडा घेऊन उतरला आहे. समाज घटकांवरही लक्ष केंद्रित आहे.हायकमांडचा वॉच असल्याने काँग्रेसमधील गटबाजी दबा धरून बसली आहे. कार्यकर्ता पक्षाच्या यंत्रणेची वाट न पाहता राबताना दिसतो आहे.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीNana Patoleनाना पटोलेBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक