शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

ग्राउंड रिपोर्ट - नागपुरातील ‘हायप्रोफाइल’ लढतीची रंगत वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 07:56 IST

बसप, बीआरएसपी, वंचितचाही जोर। संघ परिवारासह भाजप ताकदीने मैदानात

कमलेश वानखेडे

नागपूर - भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रिंगणात असलेल्या नागपूरच्या ‘हायप्रोफाइल’ जागेकडे राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. भंडारा- गोंदियाच्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपाला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये सामील झालेले नाना पटोले त्यांना आव्हान देत आहेत. बसपा, वंचित बहुजन आघाडी व बीआरएसपीनेही आपला ग्राफ वाढविण्यासाठी ताकद लावली आहे.

गडकरी प्रचारात त्यांनी पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडत आहेत, तर काँग्रेसचे नाना पटोले हे नेत्यांचा विकास झाल्याचे सांगत भाजपाला लक्ष्य करीत आहेत. भाजप देशहित, विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढत असून काँग्रेसची भिस्त सामाजिक समीकरणांवर असल्याचे दिसते. भाजपासह संघ परिवार एकदिलाने ‘गड’ सर करण्यासाठी उतरला आहे. तर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीही तूर्तास दबा धरून बसली आहे.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ९ एप्रिल रोजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सभेचा ‘मास्टरस्ट्रोक’ भाजपा मारणार आहे. दुसरीकडे काँग्रेससाठी प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची एखाद दुसरी सभा वगळता स्टार प्रचारक फिरकलेले नाहीत. गुरुवारी राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी सभा घेत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला.बहुजन समाज पक्षाने बाहेरचा उमेदवार देण्याची प्रथा यावेळी खंडित केली. नगरसेवक मोहम्मद जमाल यांना हत्तीवर स्वार केले. शिवाय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांच्या शुक्रवारच्या सभेने ‘हत्ती’ धावण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीने प्रदेश सरचिटणीस सागर डबरासे यांच्यावर डाव लावला आहे. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि खा. असदुद्दीन ओवेसी यांनी नागपुरात जाहीर सभा घेत प्रचाराची धुरा सांभाळली. बसपाला खिंडार पाडत ‘बीआरएसपी’ हा नवा पक्ष स्थापन करणारे पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश माने रिपब्लिकन मते खेचण्यासाठी जोर लावताना दिसत आहेत. अ‍ॅड. श्रीहरी अणे, माजी आ. अ‍ॅड. वामनराव चटप यांच्यासह विदर्भवादी पक्ष व संघटनांचे बळ त्यांच्या कामी लागले आहे.नागपूरच्या ‘मिहान’चा जुन्या मुख्यमंत्र्यांनी फक्त ‘बँडबाजा’ वाजविला. आम्ही प्रत्यक्षात स्वप्न साकार केले. अवघ्या तीन वर्षात मेट्रो धावली. आयआयएम, एम्स, एमएनएसयू, ट्रीपल आयटी, जीईसी एकापाठोपाठ झाले सुरू झाले. युवकांना रोजगार देण्याचे लक्ष्य पूर्ण केले.- नितीन गडकरी, भाजपापाच वर्षांत शहराला खोदण्याचे काम केले. सिमेंट रस्त्यांमुळे मनपावर कर्जाचा डोंगर वाढला. प्रकल्पाच्या नावाखाली मोक्याच्या जागा बळकावल्या. नवीन उद्योग न येता मिहानमधील उद्योग बंद पडले. लोकांना नोकऱ्या तर मिळाल्या नाहीत. नेमका विकास कुणाचा झाला, हाच खरा प्रश्न आहे.-नाना पटोले, काँग्रेसप्रमुख उमेदवारनितीन गडकरी । भाजपनाना पटोले । काँग्रेसमोहम्मद जमाल । बसपकळीचे मुद्देभाजपासह संघ परिवार ‘गड’ सर करण्यासाठी एकदिलाने विकासाचा अजेंडा घेऊन उतरला आहे. समाज घटकांवरही लक्ष केंद्रित आहे.हायकमांडचा वॉच असल्याने काँग्रेसमधील गटबाजी दबा धरून बसली आहे. कार्यकर्ता पक्षाच्या यंत्रणेची वाट न पाहता राबताना दिसतो आहे.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीNana Patoleनाना पटोलेBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक