शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ग्राउंड रिपोर्ट - नागपुरातील ‘हायप्रोफाइल’ लढतीची रंगत वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 07:56 IST

बसप, बीआरएसपी, वंचितचाही जोर। संघ परिवारासह भाजप ताकदीने मैदानात

कमलेश वानखेडे

नागपूर - भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रिंगणात असलेल्या नागपूरच्या ‘हायप्रोफाइल’ जागेकडे राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. भंडारा- गोंदियाच्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपाला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये सामील झालेले नाना पटोले त्यांना आव्हान देत आहेत. बसपा, वंचित बहुजन आघाडी व बीआरएसपीनेही आपला ग्राफ वाढविण्यासाठी ताकद लावली आहे.

गडकरी प्रचारात त्यांनी पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडत आहेत, तर काँग्रेसचे नाना पटोले हे नेत्यांचा विकास झाल्याचे सांगत भाजपाला लक्ष्य करीत आहेत. भाजप देशहित, विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढत असून काँग्रेसची भिस्त सामाजिक समीकरणांवर असल्याचे दिसते. भाजपासह संघ परिवार एकदिलाने ‘गड’ सर करण्यासाठी उतरला आहे. तर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीही तूर्तास दबा धरून बसली आहे.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ९ एप्रिल रोजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सभेचा ‘मास्टरस्ट्रोक’ भाजपा मारणार आहे. दुसरीकडे काँग्रेससाठी प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची एखाद दुसरी सभा वगळता स्टार प्रचारक फिरकलेले नाहीत. गुरुवारी राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी सभा घेत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला.बहुजन समाज पक्षाने बाहेरचा उमेदवार देण्याची प्रथा यावेळी खंडित केली. नगरसेवक मोहम्मद जमाल यांना हत्तीवर स्वार केले. शिवाय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांच्या शुक्रवारच्या सभेने ‘हत्ती’ धावण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीने प्रदेश सरचिटणीस सागर डबरासे यांच्यावर डाव लावला आहे. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि खा. असदुद्दीन ओवेसी यांनी नागपुरात जाहीर सभा घेत प्रचाराची धुरा सांभाळली. बसपाला खिंडार पाडत ‘बीआरएसपी’ हा नवा पक्ष स्थापन करणारे पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश माने रिपब्लिकन मते खेचण्यासाठी जोर लावताना दिसत आहेत. अ‍ॅड. श्रीहरी अणे, माजी आ. अ‍ॅड. वामनराव चटप यांच्यासह विदर्भवादी पक्ष व संघटनांचे बळ त्यांच्या कामी लागले आहे.नागपूरच्या ‘मिहान’चा जुन्या मुख्यमंत्र्यांनी फक्त ‘बँडबाजा’ वाजविला. आम्ही प्रत्यक्षात स्वप्न साकार केले. अवघ्या तीन वर्षात मेट्रो धावली. आयआयएम, एम्स, एमएनएसयू, ट्रीपल आयटी, जीईसी एकापाठोपाठ झाले सुरू झाले. युवकांना रोजगार देण्याचे लक्ष्य पूर्ण केले.- नितीन गडकरी, भाजपापाच वर्षांत शहराला खोदण्याचे काम केले. सिमेंट रस्त्यांमुळे मनपावर कर्जाचा डोंगर वाढला. प्रकल्पाच्या नावाखाली मोक्याच्या जागा बळकावल्या. नवीन उद्योग न येता मिहानमधील उद्योग बंद पडले. लोकांना नोकऱ्या तर मिळाल्या नाहीत. नेमका विकास कुणाचा झाला, हाच खरा प्रश्न आहे.-नाना पटोले, काँग्रेसप्रमुख उमेदवारनितीन गडकरी । भाजपनाना पटोले । काँग्रेसमोहम्मद जमाल । बसपकळीचे मुद्देभाजपासह संघ परिवार ‘गड’ सर करण्यासाठी एकदिलाने विकासाचा अजेंडा घेऊन उतरला आहे. समाज घटकांवरही लक्ष केंद्रित आहे.हायकमांडचा वॉच असल्याने काँग्रेसमधील गटबाजी दबा धरून बसली आहे. कार्यकर्ता पक्षाच्या यंत्रणेची वाट न पाहता राबताना दिसतो आहे.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीNana Patoleनाना पटोलेBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक