शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षवेली हिरवे हिरवे, चिमण्यांचा किलबिलाट चोहीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 20:51 IST

कोरोना नावाच्या या अतिसुक्ष्म दैत्याने मानवाला निसर्गाकडे बघण्याचा आदेशच जणू दिला आहे. गेल्या ११-१२ दिवसापासून कोरानामुळे मानवाला भोगाव्या लागत असलेल्या ‘लॉकडाऊन’चा अतिशय सुरेख परिणाम निसर्गावर झालेला दिसायला लागला आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे दिसताहेत निसर्गाच्या अद्भूत छटा

प्रवीण खापरे /लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘‘ऐसे गजबले रस्ते, गर्दीच गर्दी चोहीकडे,ध्वनी-धुळीच्या मापदंडात, वृक्षवेली-पशूपक्षी सारेच काळवंडले!’’... अशी स्थिती ऐरवी सर्वत्र दिसून येते. कुणालाच कुणाची फिकीर नाही. प्रत्येकच जण आपल्याच गरजांच्या व्यस्ततेत गुंतलेले असतात. शहरात असणाऱ्यांना आपल्यासारख्या दिसणाऱ्या मानवाकडे लक्ष द्यावेसे वाटत नाही तेथे वृक्षवेली-पशूपक्षी यांच्या अस्तित्त्वाचे काय देणे-घेणे असणार! माणूस जन्मला काय की मेला काय, आपल्याशिवाय आपल्या गरजांशिवाय निसर्गही आहे, याचे भान त्याला मुळीच नाही. त्याला भानावर आणण्याची किमया एका दूष्ट दैत्याने केली. कोरोना नावाच्या या अतिसुक्ष्म दैत्याने मानवाला निसर्गाकडे बघण्याचा आदेशच जणू दिला आहे. गेल्या ११-१२ दिवसापासून कोरानामुळे मानवाला भोगाव्या लागत असलेल्या ‘लॉकडाऊन’चा अतिशय सुरेख परिणाम निसर्गावर झालेला दिसायला लागला आहे.ऐरवी रस्ते गजबजलेले असतात. गाड्यांचा आवाज, हॉर्नचे कर्णकर्कश स्वर, सायलेन्सरमधून निघणारा काळाशार धूरात सगळेच माखलेले असतात. दिवसभर राबराबून घरी गेल्यावर मनुष्य स्वत:ला स्नान घालतो आणि मळ दूर करतो. घरात निवांत बसून दिवसभराचा गोंगाट शमवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, पशू-पक्ष्यांना शहरात मानवासारखी ही सुविधा नाही. पाणी नाही, जंगल नसल्याने त्यांना स्वत:चे घर नाही. वृक्षवेलींचेही तसेच. शहरात अधामधात कुठेतरी उगवलेल्या या वृक्षांना महिनोनमहिने तोच गोंगाट सतत सहन करावा लागतो तर प्रदुषणाच्या धुराचे आवरण पानफुलांवर आच्छादलेले असतात. ही धूळ स्वच्छ करण्यासाठी या वृक्षवेलींना पावसाची चातकासारखी प्रतिक्षाच करावी लागते. मात्र, कोरोनामुळे मानवाला भोगाव्या लागत असलेल्या लॉकडाऊनने वृक्षवेली-पशूपक्ष्यांना जणू संजीवनीच दिली आहे. माणसाने स्वत:ला कोंडून घेतले आहे. माणूस घरात दडपून बसल्याने गाड्या रस्त्यावर उतरत नाही आणि म्हणून निसर्गाला मोकळा श्वास घेता येत आहे. रस्त्यांवरील निरव शांततेने गोंगाड कधीचा पळाला आहे. शहर स्वच्छ असल्याचे दिसायला लागले आहे. जणू शांघाय, सिंगापूर नागपुरातच अवतरले आहे, असे सौंदर्य शहराचे दिसायला लागले आहे. वृक्षांची पानेफुले प्रदुषणमुक्तीचा आस्वाद घेत आहेत. ऐरवी प्रदुषणामुळे वृक्षवेलींची हिरवी पानेही डांबरासारखी भासत होती. आता मात्र ती स्वत:च्या अस्सल हिरव्याकंच रंगात रंगलेली आहेत. वृक्षवेलींच्या याच पाना-फुलांवर हुंदडणाºया पक्षांना प्रदुषण ओसरल्याने शुद्ध भोजन आणि रसग्रहण करता येत आहे. पक्षीच नव्हे तर मधूमक्षीकेसारख्या छोट्या किटकांनाही शुद्धतेचा आस्वाद घेता येत आहे. त्यामुळे कदाचित या काळात निर्माण झालेले मधही अतिशय शुद्ध असेल. चिमण्यांच्या चिवचिवाटाचे तरंग वातावरणात उसळी मारत आहेत आणि इतका स्वच्छ स्वर शहरी माणूस प्रथमच ऐतक आहे. प्रदुषणमुक्तीमुळे निरभ्र झालेल्या आकाशात पांढºया शुभ्र ढगांना छेद देत संध्याकाळी आपल्या घरट्यांकडे परतणारे पक्षांचे थवे आल्हाद देत आहेत. कुत्री, गार्इंचे घोळक्यांच्या असण्याचा वेगळाचा आभास मानवाला घेता येत आहे. पुस्तकांच्या पानात वाचलेल्या कोकीळेचा आवाज प्रत्येकाच्या कर्ण इंद्रियेतून हृदयातचा ठाव घेत आहे. ‘कुहू कुहू’ हा कोकीळ स्वर कधी कुणी ऐकलाय का? नसेल ऐकला तर तो या काळात कर्णपटलांवर पडत असल्याचा अनुभव घेता येतो. इवलीशी खारूताई बघता येत आहे. रस्ते निरव असल्याने रस्त्याच्या कडेने असलेल्या वृक्षांच्या सावलीत ती निवांत दाणा खुडताना दिसत आहे. एकूणच.. कोरोना नावाची महामारी संपूर्ण मनुष्य समाजाला घातक ठरत असली तरी त्या भयाने मनुष्याला निसर्गाच्या जवळ नेले आहे.‘‘नाही गजबजलेले रस्ते, निरव शांतता सगळीकडेगोंगाट नाही-धुळ नाही, आल्हाद अवतरले चोहीकडे’’... निसर्गाची ही रया कायम ठेवण्यासाठी, कोरोना प्रकरणातून माणूस धडे घेईल का, असा प्रश्न आता उपस्थित व्हायला लागला आहे.

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या