शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

आचारसंहितेत अडकला ग्रामपंचायतींचा २८ कोटींचा विकास निधी 

By गणेश हुड | Updated: October 18, 2023 14:45 IST

विकास कामे लांबणीवर

नागपूर : जिल्ह्यात ३६५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. ७ ऑक्टोबरपर्यंत आदर्श आचारसंहिता राहणार आहे. त्यामुळे केंद्र शासनाकडून प्राप्त झालेला १५ व्या वित्त आयोगाचा २८ कोटी १९ लाखांचा निधी अडकला आहे. हा निधी  निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींच्या तिजोरीत पोहोचू शकला नाही. परिणामी विकास कामे लांबणीवर पडली आहेत. 

ग्रामपंचायत विकासाचा केंद्रबिंदू मानत केंद्र सरकारने  वित्त आयोगाचा निधी जिल्हा परिषदांना न देता थेट ग्रामपंचायतींना पाठविण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. ग्रामपंचायती समृद्ध व्हाव्यात व विकासाच्या वर्गवारीत याव्यात हा उद्देश यामागे आहे. प्राप्त झालेला निधी ग्रामपंचायतींना पाठवायचा की नाही. याबाबत जि.प.च्या पंचायत विभागाने शासनाकडे मार्गदर्शन मागितले आहे. 

अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीव्दारे निधी वितरित केला जातो. निकषानुसार वित्त आयोगाचा निधी जिल्हा परिषदेला १० टक्के, पंचायत समिती १० टक्के व ग्रामपंचायतीला ८० टक्के निधी दिला जातो. २०२३-२४ वा वर्षाच्या बंधित निधीचा पहिला हप्ता राज्य शासनाने ३ ऑक्टोबरला वितरित केला. याच दिवशी पंचायत निवडणूकांची घोषणा  झाली.  जिल्ह्यातील  ग्रामपंचायसाठी २८ कोटी २९ लाख ४६ हजार रुपयांचा निधी वितरण होईल.

जिल्ह्यात ७६३ ग्रामपंचायती आहेत. वित्त आयोगाच्या निधीचे ग्रामपंचायतींना लोकसंख्येच्या प्रमाणात वाटप होते. जिल्ह्याची ग्रामीण लोकसंख्या जवळपास २६ लाखांच्या जवळपास आहे. गावाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधी वाटप करण्यात येते.  पंचायत समितीच्या लेखाशिर्षासाठी तीन कोटी ५७ लाख ४४  हजार, तर जिल्हा परिषदेला तीन कोटी ५७ लाख ५५ हजार  असा एकूण ३५ कोटी ३४ लाख ४५ हजार रुपयाचा निधी प्राप्त आहे. मात्र ग्रामपंचायतीच्या  निधीला आचारसंहितेमुळे 'ब्रेक' लागला आहे. हा निधी स्वच्छता आणि हागणदारीमुक्त कार्यक्रम अपि स्थानिक स्वराज्य संस्थांची देखभाल दुरुस्ती, पेयजल पाणीपुरवठा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वॉटर रिसायकलिंग आदी कामावर खर्च करायचा आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतfundsनिधीnagpurनागपूर