शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

ग्रामपंचायत सशक्तीकरण गुंडाळले

By admin | Updated: July 25, 2015 03:16 IST

केंद्र आणि राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर ग्रामीण विकासाला गती मिळण्याची अपेक्षा होती.

गणेश हूड नागपूरकेंद्र आणि राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर ग्रामीण विकासाला गती मिळण्याची अपेक्षा होती. परंतु आघाडी सरकारच्या काळातील अनेक चांगल्या योजना बंद करण्याचा सपाटा सुरू आहे. अशीच राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण योजना गुंडाळली आहे. योजना बंद झाल्याने ३६ कंत्राटी अभियंते बेरोजगार झाले असून ग्रामीण विकासाला ब्रेक लागले आहे. ग्रामपंचायतींना अधिकाधिक सक्षम करण्यासाठी २०११ पासून जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागागाच्या माध्यमातून राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानाला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला अभियान संथ होते. परंतु मागील दोन वर्षात गती पकडल्याने ग्रामीण भागातील विकास कामांना गती मिळाली होती. गावाचा विकास करतानाच ग्रामपंचायत सक्षम असावी. हक्काचे कार्यालय असावे, यासाठी सर्वप्रथम या अभियानातून राजीव गांधी भवन ही संकल्पना गावागावात राबविण्यात आली. यातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत भवनाची कामे हाती घेण्यात आली. ग्रामपंचायतीच्या कारभाराला गती मिळण्याला मदत झाली.या योजनेंतर्गत ५ हजाराहून अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना ग्रामपंचायत भवन बांधकामासाठी प्रत्येकी १२ लाखाचा निधी ग्रामपंचायत भवन बांधकामासाठी मिळत होता. २०१३-१४ या वर्षात नागपूर जिल्ह्याला केंद्राकडून ४.४१ कोटी तर राज्य सरकारकडून १.४७ कोटी असा ५.८८ कोटीचा निधी प्राप्त झाला होता. अभियान राबविण्यासाठी जि.प.ते ग्रामपंचायत स्तरापर्यत कर्मचारी व अधिकाऱ्यांची यंत्रणा निर्माण करण्यात आली होती. यात ५ हजाराहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावाच्या ठिकाणी कंत्राटी अभियंता नियुक्त करण्यात आले होते. जिल्ह्यात ३६ कंत्राटी अभियंता व ८ गटअभियंता यांची नियुक्ती करण्यात आली. तर जिल्हा कार्यालयात लेखाधिकारीं , साहायक,लिपीक व परिचर अशी पदे कंत्राटी पद्धतीवर भरण्यात आली होती. परंतु केंद्रात सत्ताबदल झाल्याने २०१४-१५ या वर्षात निधी मिळाला नाही. वर्षभरात निधी नसल्याने या योजनेचे काम ठप्प आहे.