शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

नागपुरातील कळमन्यात धान्य भिजले, शेतकरी व व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 10:59 IST

Nagpur News कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य बाजारात १६ फेब्रुवारीला आलेल्या अवकाळी पावसाने, खुल्या परिसरात ठेवलेले शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे धान्य भिजल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्दे खुल्या परिसरात डोम उभारण्याची मागणीकृषी उत्पन्न बाजार समितीचे दुर्लक्ष

 लोकमत न्यूज नेटवर्क  

नागपूर : कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य बाजारात १६ फेब्रुवारीला आलेल्या अवकाळी पावसाने, खुल्या परिसरात ठेवलेले शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे धान्य भिजल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक आणि अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

हवामान खात्याने तीन दिवस पाऊस येण्याचा अंदाज व्यक्त केल्यानंतर बाजार समितीने धान्य खळ्यात ठेवण्याचे आवाहन केले होते. पण सर्व खळे धान्याने भरल्याने त्यात अतिरिक्त माल ठेवणे शक्य नव्हते. त्यामुळे बाहेर ठेवलेले धान्य भिजले. अशा धान्याची किंमत कमी होऊन व्यापारी खरेदी करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे.

कळमना धान्य अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष अतुल सेनाड म्हणाले, वर्षभरात १५ पेक्षा जास्त वेळ अवकाळी पाऊस येतो. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे परिसरातील धान्य भिजून लाखो रुपयांचे नुकसान होते. सध्या बाजारात चना, तूर, गहू आणि सोयाबीनची आवक आहे. त्यातच चना आणि तुरीची दररोज ५ ते ६ हजारांपेक्षा जास्त पोती येत आहेत. कळमन्यात धान्यासाठी १२ खळे असून दोन खळ्यांमध्ये ४० फुटांचा रोड आहे. शेतकऱ्यांचे धान्य नेहमीच भिजत असल्याने असोसिएशन बाजार समितीकडे दोन खळ्यांच्या मधल्या जागेत पारदर्शक डोम उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून करीत आहे. पण समिती याकडे दुर्लक्ष करीत आहे. पारदर्शक शीटांचे डोम उभारल्यास ऊन येईल आणि धान्य भिजणार नाही. याकरिता जवळपास दीड कोटींचा खर्च येणार आहे. असाच प्रयोग औरंगाबाद, जालना आणि अमरावती बाजार समितीत करण्यात आला आहे. ही माहिती असतानाही बाजार समिती डोम उभारण्यास तयार नाही. वर्षभरात अवकाळी पावसाने १५ ते २० वेळा परिसरात धान्य भिजल्याच्या घटना घडतात. त्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. आता प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी, अशी मागणी सेनाड यांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊस