शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

नागपुरातील कळमन्यात धान्य भिजले, शेतकरी व व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 10:59 IST

Nagpur News कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य बाजारात १६ फेब्रुवारीला आलेल्या अवकाळी पावसाने, खुल्या परिसरात ठेवलेले शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे धान्य भिजल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्दे खुल्या परिसरात डोम उभारण्याची मागणीकृषी उत्पन्न बाजार समितीचे दुर्लक्ष

 लोकमत न्यूज नेटवर्क  

नागपूर : कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य बाजारात १६ फेब्रुवारीला आलेल्या अवकाळी पावसाने, खुल्या परिसरात ठेवलेले शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे धान्य भिजल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक आणि अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

हवामान खात्याने तीन दिवस पाऊस येण्याचा अंदाज व्यक्त केल्यानंतर बाजार समितीने धान्य खळ्यात ठेवण्याचे आवाहन केले होते. पण सर्व खळे धान्याने भरल्याने त्यात अतिरिक्त माल ठेवणे शक्य नव्हते. त्यामुळे बाहेर ठेवलेले धान्य भिजले. अशा धान्याची किंमत कमी होऊन व्यापारी खरेदी करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे.

कळमना धान्य अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष अतुल सेनाड म्हणाले, वर्षभरात १५ पेक्षा जास्त वेळ अवकाळी पाऊस येतो. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे परिसरातील धान्य भिजून लाखो रुपयांचे नुकसान होते. सध्या बाजारात चना, तूर, गहू आणि सोयाबीनची आवक आहे. त्यातच चना आणि तुरीची दररोज ५ ते ६ हजारांपेक्षा जास्त पोती येत आहेत. कळमन्यात धान्यासाठी १२ खळे असून दोन खळ्यांमध्ये ४० फुटांचा रोड आहे. शेतकऱ्यांचे धान्य नेहमीच भिजत असल्याने असोसिएशन बाजार समितीकडे दोन खळ्यांच्या मधल्या जागेत पारदर्शक डोम उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून करीत आहे. पण समिती याकडे दुर्लक्ष करीत आहे. पारदर्शक शीटांचे डोम उभारल्यास ऊन येईल आणि धान्य भिजणार नाही. याकरिता जवळपास दीड कोटींचा खर्च येणार आहे. असाच प्रयोग औरंगाबाद, जालना आणि अमरावती बाजार समितीत करण्यात आला आहे. ही माहिती असतानाही बाजार समिती डोम उभारण्यास तयार नाही. वर्षभरात अवकाळी पावसाने १५ ते २० वेळा परिसरात धान्य भिजल्याच्या घटना घडतात. त्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. आता प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी, अशी मागणी सेनाड यांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊस