शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

कळमन्यात धान्य भिजले, शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान

By मोरेश्वर मानापुरे | Updated: March 16, 2024 22:41 IST

धान्य लिलावाच्या शेडवर झाड पडले.

नागपूर : नागपुरातील कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शनिवारी दुपारी आलेल्या वादळी पावसाने परिसराची धूळधाण केली. मुख्यत्वे धान्य बाजारात रस्त्यावर ठेवलेले धान्य अचानक भिजले. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. बाजार समितीच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे नुकसान झाल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. 

शनिवारी सकाळी आकाशात ऊन होते. मात्र दुपारनंतर पावसाचे वातावरण तयार झाले आणि दुपारी ३.३० पूर्वी पावसाच्या हलक्या सरी येऊ लागल्या. तेव्हाच शेतकरी, अडतिया आणि व्यापाऱ्यांनी धान्य ताडपत्रीने झाकले. पण ३.३० नंतर तब्बल ३० मिनिटे आलेल्या मुसळधार वादळी पावसाने शेडबाहेर रस्त्यावर ठेवलेले आणि ताडपत्रीने झाकलेले हरभरे, तूरी आणि सोयाबीन भिजले. यामध्ये शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांचेही नुकसान झाले. त्यातच एका धान्य लिलावाच्या शेडवर निलगिरीचे झाड पडल्याने शेडचे नुकसान झाले.

धान्य बाजार अडतिया असोसिएशनचे पदाधिकारी कमलाकर घाटोळे म्हणाले, पावसानंतर धान्याचा लिलाव बंद झाला, पण धान्याचे वजन करणे सुरू होते. सध्या बाजारात हरभरा, तूरी आणि सोयाबीनची आवक सुरू आहे. कळमन्यात दररोज हरभरा ५ हजारांहून अधिक पोते, तूर ३ हजार आणि सोयाबीन ५०० पोत्यांची आवक आहे. उन्हाळ्यात पावसाची चिन्हे नसल्याने बरेचसे धान्य शेडबाहेरच होते. धान्य भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

टॅग्स :nagpurनागपूर