शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने मनोज जरांगेची मागणी मारून टाकली : सकल मराठा समाजाचा आरोप

By नरेश डोंगरे | Updated: December 8, 2023 19:59 IST

या नेत्यांनी आरक्षणाची मागणी रेटतानाच सरकारवर अनेक आरोप लावले.

नागपूर: वेळ मारून नेण्यासाठी कुणबी दाखले सरसकट देण्याच्या संंबंधाने सरकारने शब्दच्छल केला आहे. एवढेच काय, मनोज जरांगे पाटील यांची मागणी सरकारने मारून टाकली आहे, असा आरोप सकल मराठा समाजाचे नेते राजे संग्रामसिंग भोसले आणि कुणबी समाजाचे अभ्यासक प्रशांत भोसले यांनी केला.

नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सरकारने मराठा आरक्षणासंबंधाने कायदा करावा, या मागणीच्या अनुषंगाने सकल मराठा समाजाने आज पत्रकार परिषद घेतली. त्यात ते बोलत होते. यावेळी दिलीप जाधव, सुनील जगताप, मोहन जाधव, मिलिंद साबळे, लोकेश रसाळ आदी उपस्थित होते. या नेत्यांनी आरक्षणाची मागणी रेटतानाच सरकारवर अनेक आरोप लावले.

सरकारच्या भूमीकेमुळे समाजातील शेकडो तरुणांना हक्काची नोकरी मिळत नाही. कुणब्यांच्या मोठ्या प्रमाणात नोंदी मिळत असल्याचे पाहून सरकार मराठा आणि ओबीसीत वाद निर्माण करीत आहे. दुसरीकडे भूजबळांनी दबाव वाढवल्यामुळे कुणबी नोंदी शोधण्याचे काम थंडबस्त्यात टाकण्यात आले आहे, असा आरोप करून त्यांनी भुजबळांच्या भूमिकेचा निषेध केला.

राज्यात ज्या जातीच नाहीत, अशा ३०० पेक्षा जास्त जाती आरक्षणाच्या यादीत आहेत. काय निकष ते कळायला मार्ग नाही. मात्र आम्ही (मराठा समाज) आठ आठ वेळा मागास ठरूनही आम्हाला आरक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. कुणावर अन्याय होऊ नये मात्र आम्हालाही न्याय मिळावा अशी आमची भूमीका असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे कुणबी समाजाच्या सापडणाऱ्या नोंदी आणि गायकवाड आयोगाच्या शिफारशी लक्षात घेऊन मराठ्यांना आरक्षण द्यावे, अशी मागणी या नेत्यांनी केली.

हिवाळी अधिवेशनात कायदा करा

राज्यातील चार प्रमूख पक्षांपैकी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) सत्तेत आहे. सरकार मराठ्यांना आरक्षण द्यायचेच आहे, असे म्हणते. खरच आरक्षण द्यायचे असेल तर या ट्रीपल इंजिन सरकारने नागपुरात सुरू असलेल्या अधिवेशानत कायदा करावा आणि तो केंद्र सरकारकडे पाठवावा. सध्या केंद्रातही अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे आरक्षण मिळण्यास विलंब होणार नाही, असेही उपरोक्त नेत्यांनी म्हटले.

धडा शिकविण्यासाठी आम्ही सज्जआरक्षणाच्या संबंधाने आमच्यासोबत जे राजकारण सुरू आहे, जो अन्याय केला जात आहे, तो आम्ही लक्षात ठेवणार आहोत. येत्या निवडणुकांमध्ये आमच्यासोबत राजकारण करणाऱ्या आमदार, मंत्र्यांना घरी बसवायचे आहे. त्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे सांगून या संबंधाने २४ डिसेंबरनंतर आमची भूमीका ठरणार असल्याचेही उपरोक्त नेते मंडळींनी पत्रकारांना सांगितले.

 

 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलnagpurनागपूरMaratha Reservationमराठा आरक्षण