शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
5
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
6
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
7
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
8
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
9
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
10
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
11
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
12
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
13
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
14
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
15
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
16
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
17
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
18
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
19
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
20
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य

सरकारने मनोज जरांगेची मागणी मारून टाकली : सकल मराठा समाजाचा आरोप

By नरेश डोंगरे | Updated: December 8, 2023 19:59 IST

या नेत्यांनी आरक्षणाची मागणी रेटतानाच सरकारवर अनेक आरोप लावले.

नागपूर: वेळ मारून नेण्यासाठी कुणबी दाखले सरसकट देण्याच्या संंबंधाने सरकारने शब्दच्छल केला आहे. एवढेच काय, मनोज जरांगे पाटील यांची मागणी सरकारने मारून टाकली आहे, असा आरोप सकल मराठा समाजाचे नेते राजे संग्रामसिंग भोसले आणि कुणबी समाजाचे अभ्यासक प्रशांत भोसले यांनी केला.

नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सरकारने मराठा आरक्षणासंबंधाने कायदा करावा, या मागणीच्या अनुषंगाने सकल मराठा समाजाने आज पत्रकार परिषद घेतली. त्यात ते बोलत होते. यावेळी दिलीप जाधव, सुनील जगताप, मोहन जाधव, मिलिंद साबळे, लोकेश रसाळ आदी उपस्थित होते. या नेत्यांनी आरक्षणाची मागणी रेटतानाच सरकारवर अनेक आरोप लावले.

सरकारच्या भूमीकेमुळे समाजातील शेकडो तरुणांना हक्काची नोकरी मिळत नाही. कुणब्यांच्या मोठ्या प्रमाणात नोंदी मिळत असल्याचे पाहून सरकार मराठा आणि ओबीसीत वाद निर्माण करीत आहे. दुसरीकडे भूजबळांनी दबाव वाढवल्यामुळे कुणबी नोंदी शोधण्याचे काम थंडबस्त्यात टाकण्यात आले आहे, असा आरोप करून त्यांनी भुजबळांच्या भूमिकेचा निषेध केला.

राज्यात ज्या जातीच नाहीत, अशा ३०० पेक्षा जास्त जाती आरक्षणाच्या यादीत आहेत. काय निकष ते कळायला मार्ग नाही. मात्र आम्ही (मराठा समाज) आठ आठ वेळा मागास ठरूनही आम्हाला आरक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. कुणावर अन्याय होऊ नये मात्र आम्हालाही न्याय मिळावा अशी आमची भूमीका असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे कुणबी समाजाच्या सापडणाऱ्या नोंदी आणि गायकवाड आयोगाच्या शिफारशी लक्षात घेऊन मराठ्यांना आरक्षण द्यावे, अशी मागणी या नेत्यांनी केली.

हिवाळी अधिवेशनात कायदा करा

राज्यातील चार प्रमूख पक्षांपैकी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) सत्तेत आहे. सरकार मराठ्यांना आरक्षण द्यायचेच आहे, असे म्हणते. खरच आरक्षण द्यायचे असेल तर या ट्रीपल इंजिन सरकारने नागपुरात सुरू असलेल्या अधिवेशानत कायदा करावा आणि तो केंद्र सरकारकडे पाठवावा. सध्या केंद्रातही अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे आरक्षण मिळण्यास विलंब होणार नाही, असेही उपरोक्त नेत्यांनी म्हटले.

धडा शिकविण्यासाठी आम्ही सज्जआरक्षणाच्या संबंधाने आमच्यासोबत जे राजकारण सुरू आहे, जो अन्याय केला जात आहे, तो आम्ही लक्षात ठेवणार आहोत. येत्या निवडणुकांमध्ये आमच्यासोबत राजकारण करणाऱ्या आमदार, मंत्र्यांना घरी बसवायचे आहे. त्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे सांगून या संबंधाने २४ डिसेंबरनंतर आमची भूमीका ठरणार असल्याचेही उपरोक्त नेते मंडळींनी पत्रकारांना सांगितले.

 

 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलnagpurनागपूरMaratha Reservationमराठा आरक्षण