शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

सरकारी रिक्त पदे आरक्षणाद्वारे भरा : अनुसूचित जाती मोर्चाच्या अधिवेशनात ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 21:09 IST

केंद्र सरकारकडून रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाने लाखो सरकारी पद रिक्त असून त्यांना आरक्षणाचे पालन करत भरण्यात यावे, अशी मागणी भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चातर्फे मांडण्यात आली. मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनात मांडण्यात आलेल्या ठरावात ही मागणी करण्यात आली.

ठळक मुद्देपंतप्रधान, शहा यांचे केले अभिनंदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारकडून रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाने लाखो सरकारी पद रिक्त असून त्यांना आरक्षणाचे पालन करत भरण्यात यावे, अशी मागणी भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चातर्फे मांडण्यात आली. मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनात मांडण्यात आलेल्या ठरावात ही मागणी करण्यात आली.न्यायपालिकेत अनुसूचित जातीचे प्रतिनिधित्व नगण्य आहे. तेथे आरक्षणाची व्यवस्था लागू करुन न्यायपालिकेतदेखील अनुसूचित जातीला योग्य प्रतिनिधित्व दिले गेले पाहिजे. सोबतच सर्व विद्यापीठांमध्ये २०० ‘पॉईंट  रोस्टर’ लागू करुन अनुसूचित जातीच्या हितांचे संरक्षण व्हावे, अशी भूमिका प्रस्तावातून मांडण्यात आली. कर्नाटक, पश्चिम बंगाल, केरळ यासारख्या भाजपाचे शासन नसलेल्या राज्यात अनुसूचित जातीच्या लोकांवर अत्याचार वाढत असल्याचा आरोपदेखील यावेळी लावण्यात आला.रविवारी राष्ट्रीय अधिवेशनात उत्तर प्रदेशमधील अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष कौशल किशोर यांनी प्रस्ताव मांडला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा जागर करण्यासाठी मौलिक पुढाकार घेतला. सरकारने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित पाच जागांना पंचतीर्थ म्हणून विकसित केले आहे. नागपूरच्या दीक्षाभूमीसाठी भाजपा शासनांनी निधी दिला. लंडनमध्ये बाबासाहेबांचे घर विकत घेऊन त्याला राष्ट्रीय स्मारक बनविले. त्यांच्या जन्मस्थळाला आंबेडकर नगर असे नाव दिले. इंदू मिल येथे स्मारक बनविले जात आहे. दिल्लीत आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र बनविण्यात आले. या कामांसाठी सरकार, पंतप्रधान व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला.भाजपाचे पदाधिकारी पक्षावरच नाराजदरम्यान, भाजपाच्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये अनुसूचित जातीच्या पदाधिकाऱ्यांना योग्य सन्मान दिला जात नसल्याचा आरोप यावेळी बिहारचे आमदार रामप्रित पासवान यांनी केला. अनुसूचित जाती-जमातीच्या मतांचे प्रमाण फार जास्त आहे. त्यामुळे या प्रवर्गातील पदाधिकाऱ्यांना पक्षाने योग्य तो सन्मान दिला पाहिजे. राष्ट्रीय नेतृत्वाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :BJPभाजपाreservationआरक्षण