शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी रिक्त पदे आरक्षणाद्वारे भरा : अनुसूचित जाती मोर्चाच्या अधिवेशनात ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 21:09 IST

केंद्र सरकारकडून रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाने लाखो सरकारी पद रिक्त असून त्यांना आरक्षणाचे पालन करत भरण्यात यावे, अशी मागणी भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चातर्फे मांडण्यात आली. मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनात मांडण्यात आलेल्या ठरावात ही मागणी करण्यात आली.

ठळक मुद्देपंतप्रधान, शहा यांचे केले अभिनंदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारकडून रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाने लाखो सरकारी पद रिक्त असून त्यांना आरक्षणाचे पालन करत भरण्यात यावे, अशी मागणी भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चातर्फे मांडण्यात आली. मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनात मांडण्यात आलेल्या ठरावात ही मागणी करण्यात आली.न्यायपालिकेत अनुसूचित जातीचे प्रतिनिधित्व नगण्य आहे. तेथे आरक्षणाची व्यवस्था लागू करुन न्यायपालिकेतदेखील अनुसूचित जातीला योग्य प्रतिनिधित्व दिले गेले पाहिजे. सोबतच सर्व विद्यापीठांमध्ये २०० ‘पॉईंट  रोस्टर’ लागू करुन अनुसूचित जातीच्या हितांचे संरक्षण व्हावे, अशी भूमिका प्रस्तावातून मांडण्यात आली. कर्नाटक, पश्चिम बंगाल, केरळ यासारख्या भाजपाचे शासन नसलेल्या राज्यात अनुसूचित जातीच्या लोकांवर अत्याचार वाढत असल्याचा आरोपदेखील यावेळी लावण्यात आला.रविवारी राष्ट्रीय अधिवेशनात उत्तर प्रदेशमधील अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष कौशल किशोर यांनी प्रस्ताव मांडला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा जागर करण्यासाठी मौलिक पुढाकार घेतला. सरकारने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित पाच जागांना पंचतीर्थ म्हणून विकसित केले आहे. नागपूरच्या दीक्षाभूमीसाठी भाजपा शासनांनी निधी दिला. लंडनमध्ये बाबासाहेबांचे घर विकत घेऊन त्याला राष्ट्रीय स्मारक बनविले. त्यांच्या जन्मस्थळाला आंबेडकर नगर असे नाव दिले. इंदू मिल येथे स्मारक बनविले जात आहे. दिल्लीत आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र बनविण्यात आले. या कामांसाठी सरकार, पंतप्रधान व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला.भाजपाचे पदाधिकारी पक्षावरच नाराजदरम्यान, भाजपाच्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये अनुसूचित जातीच्या पदाधिकाऱ्यांना योग्य सन्मान दिला जात नसल्याचा आरोप यावेळी बिहारचे आमदार रामप्रित पासवान यांनी केला. अनुसूचित जाती-जमातीच्या मतांचे प्रमाण फार जास्त आहे. त्यामुळे या प्रवर्गातील पदाधिकाऱ्यांना पक्षाने योग्य तो सन्मान दिला पाहिजे. राष्ट्रीय नेतृत्वाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :BJPभाजपाreservationआरक्षण