शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

शासनाने शेतकऱ्यांसाठी संवेदनशीलता दाखवावी  : अमर हबीब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 21:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : १२ व १३ फेब्रुवारीला झालेल्या गारपिटीमुळे नागपूर जिल्हा व विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री व शासनाच्या प्रतिनिधींनी या भागाचा दौरा करावा व संकटात असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करून संवेदनशीलता दाखवावी, असे आवाहन किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी पत्रपरिषदेत केले. काटोलच्या शेतकऱ्यांसाठी आमदार आशिष ...

ठळक मुद्देआशिष देशमुखांच्या आंदोलनाला पाठिंबा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : १२ व १३ फेब्रुवारीला झालेल्या गारपिटीमुळे नागपूर जिल्हा व विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री व शासनाच्या प्रतिनिधींनी या भागाचा दौरा करावा व संकटात असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करून संवेदनशीलता दाखवावी, असे आवाहन किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी पत्रपरिषदेत केले. काटोलच्या शेतकऱ्यांसाठी आमदार आशिष देशमुख यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा असल्याचे सांगितले.नुकत्याच झालेल्या गारपिटीमुळे संत्रा, गहू आणि इतर पिकांची नासाडी झाली आहे. शासनाने मात्र अद्याप कुठलाही मोबदला जाहीर केला नाही. मुख्यमंत्र्यांना अद्याप शेतकऱ्यांसाठी वेळ काढता न आल्याचा आरोप हबीब यांनी केला. काही कायद्यांनी शेतकऱ्यांचे हातपाय बांधले आहेत. हे कायदे रद्द होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना मदत करत राहावी लागणार असल्याचे ते म्हणाले. आमदार आशिष देशमुख हे गेल्या १२ दिवसापासून उपोषणाला बसले आहेत. मात्र शासनाने त्यांची दखल घेतली नाही. पहिल्यांदा कुणी आमदार शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे लढा देत आहे, त्यामुळे आ. देशमुखांच्या आंदोलनाला किसानपुत्र आंदोलनाचा पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले.यावेळी उपस्थित जवाहर चरडे यांनी आ. देशमुख यांच्या आंदोलनाबाबत माहिती दिली. मृगबहाराची संत्री गारपिटीमुळे नष्ट झाली आहेत. या संत्र्यांना २५ ते ३० हजार रुपये प्रतिटन भाव मिळतो. आंबियाबहारही नष्ट झाला आहे. त्यामुळे शासनाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना २ लाख १० हजार रुपये मदत द्यावी. गहू प्रति एकर १० क्विंटल होत असल्याने एकरी २० हजार रुपये व हरभऱ्यासाठी एकरी २८ हजार रुपये मदत करण्याची मागणी आ. आशिष देशमुख यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केल्याचे चरडे यांनी सांगितले. १९ मार्चला राज्यव्यापी उपोषण३२ वर्षांपूर्वी १९ मार्च १९८६ ला पवनार येथे पहिल्यांदा शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. तेव्हापासून नापिकी व कर्जबाजारीपणामुळे सतत शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. किसानपुत्र आंदोलनतर्फे अमर हबीब १९ मार्चला पवनार येथे एक दिवसाचे उपोषण करणार आहेत. मागील वर्षी दोन लाख लोक उपोषणात सहभागी झाले होते. यावेळी त्यापेक्षा जास्त होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहरात राहणाऱ्या शेतकरी पुत्रांनी शेतकऱ्यांप्रति आपुलकी दाखवून एक दिवस उपोषण करावे, असे आवाहन हबीब यांनी केले.

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन