शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

शासनाने शेतकऱ्यांसाठी संवेदनशीलता दाखवावी  : अमर हबीब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 21:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : १२ व १३ फेब्रुवारीला झालेल्या गारपिटीमुळे नागपूर जिल्हा व विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री व शासनाच्या प्रतिनिधींनी या भागाचा दौरा करावा व संकटात असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करून संवेदनशीलता दाखवावी, असे आवाहन किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी पत्रपरिषदेत केले. काटोलच्या शेतकऱ्यांसाठी आमदार आशिष ...

ठळक मुद्देआशिष देशमुखांच्या आंदोलनाला पाठिंबा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : १२ व १३ फेब्रुवारीला झालेल्या गारपिटीमुळे नागपूर जिल्हा व विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री व शासनाच्या प्रतिनिधींनी या भागाचा दौरा करावा व संकटात असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करून संवेदनशीलता दाखवावी, असे आवाहन किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी पत्रपरिषदेत केले. काटोलच्या शेतकऱ्यांसाठी आमदार आशिष देशमुख यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा असल्याचे सांगितले.नुकत्याच झालेल्या गारपिटीमुळे संत्रा, गहू आणि इतर पिकांची नासाडी झाली आहे. शासनाने मात्र अद्याप कुठलाही मोबदला जाहीर केला नाही. मुख्यमंत्र्यांना अद्याप शेतकऱ्यांसाठी वेळ काढता न आल्याचा आरोप हबीब यांनी केला. काही कायद्यांनी शेतकऱ्यांचे हातपाय बांधले आहेत. हे कायदे रद्द होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना मदत करत राहावी लागणार असल्याचे ते म्हणाले. आमदार आशिष देशमुख हे गेल्या १२ दिवसापासून उपोषणाला बसले आहेत. मात्र शासनाने त्यांची दखल घेतली नाही. पहिल्यांदा कुणी आमदार शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे लढा देत आहे, त्यामुळे आ. देशमुखांच्या आंदोलनाला किसानपुत्र आंदोलनाचा पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले.यावेळी उपस्थित जवाहर चरडे यांनी आ. देशमुख यांच्या आंदोलनाबाबत माहिती दिली. मृगबहाराची संत्री गारपिटीमुळे नष्ट झाली आहेत. या संत्र्यांना २५ ते ३० हजार रुपये प्रतिटन भाव मिळतो. आंबियाबहारही नष्ट झाला आहे. त्यामुळे शासनाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना २ लाख १० हजार रुपये मदत द्यावी. गहू प्रति एकर १० क्विंटल होत असल्याने एकरी २० हजार रुपये व हरभऱ्यासाठी एकरी २८ हजार रुपये मदत करण्याची मागणी आ. आशिष देशमुख यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केल्याचे चरडे यांनी सांगितले. १९ मार्चला राज्यव्यापी उपोषण३२ वर्षांपूर्वी १९ मार्च १९८६ ला पवनार येथे पहिल्यांदा शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. तेव्हापासून नापिकी व कर्जबाजारीपणामुळे सतत शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. किसानपुत्र आंदोलनतर्फे अमर हबीब १९ मार्चला पवनार येथे एक दिवसाचे उपोषण करणार आहेत. मागील वर्षी दोन लाख लोक उपोषणात सहभागी झाले होते. यावेळी त्यापेक्षा जास्त होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहरात राहणाऱ्या शेतकरी पुत्रांनी शेतकऱ्यांप्रति आपुलकी दाखवून एक दिवस उपोषण करावे, असे आवाहन हबीब यांनी केले.

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन