शहरं
Join us  
Trending Stories
1
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
2
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
3
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
4
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
5
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
6
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
7
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
8
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
9
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
10
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
11
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
12
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
13
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
14
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
15
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
16
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
17
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
18
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
19
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
20
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका

शासन म्हणते रबी हंगामात पीक उत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 23:48 IST

खरीपानंतर पाण्याअभावी रबी हंगामालाही फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु शासन मात्र आलबेल असल्याचे सांगते. कारण रबी हंगामात एकाही गावाची पैसेवारी ५० पेक्षा कमी नसल्याची नोंद आहे. म्हणून प्रशासनानुसार रबीतील पीक परिस्थिती उत्तम आहे.

ठळक मुद्देविभागातील गावांची पैसेवारी ५० पेक्षा जास्त : ६८ गावात घेतलेच नाही पीक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खरीपानंतर पाण्याअभावी रबी हंगामालाही फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु शासन मात्र आलबेल असल्याचे सांगते. कारण रबी हंगामात एकाही गावाची पैसेवारी ५० पेक्षा कमी नसल्याची नोंद आहे. म्हणून प्रशासनानुसार रबीतील पीक परिस्थिती उत्तम आहे.मागील वर्षी कमी पावसामुळे खरीप पिकांवर परिणाम झाला. उत्पादनात घट झाली. शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. काही शेतकऱ्यांच्या खात्यात ही मदत जमाही झाली. मात्र अनेक शेतकरी यापासून वंचित आहेत. नदी, धरणात कमी पाणी असल्याने रबी पिकांसाठी शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळाले नाही. यामुळे पाहिजे त्या प्रमाणात फायदा झाला नसल्याचे सांगण्यात येते. अनेक शेतकऱ्यांनी तर रबीत पीकच घेतले नसल्याची माहिती आहे. पिकांना मिळालेला भावही समाधानकारक नसल्याची ओरड होत आहे. असे असताना शासन दरबारी मात्र सर्व आलबेल असल्याचे चित्र आहे. नागपूर विभागात १६६ गावांमध्ये रबीचे पीक घेण्यात येते. यंदा फक्त ९८ गावांमध्ये रबीचे पीक घेण्यात आले. या गावांमध्ये पैसेवारी ५० पेक्षा जास्त दर्शविण्यात आली आहे. म्हणजे पीक परिस्थिती उत्तम आहे. ६८ गावांमध्ये यंदा पीकच घेण्यात आले नाही. यात सर्वाधिक ६४ गाव गडचिरोली जिल्ह्यातील आहेत तर चार गाव भंडारा जिल्ह्यातील आहेत. पाणी नसल्याने पीक घेण्यात आले नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीVidarbhaविदर्भ