शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांच्या हितासाठी सरकारकडून सोयाबीन, कापसाची होते कमी खरेदी; विधानसभेत मंत्र्यांना घेरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 12:59 IST

विधानसभेत मंत्र्यांना घेरले : सत्ताधारी आणि विरोधी आमदार आक्रमक, अखेर केला सभात्याग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात नाफेड आणि सीसीआयमार्फत सुरू असलेल्या कापूस, सोयाबीन, मका खरेदीवरून सत्ताधारी आणि विरोधी आमदारांनी गुरुवारी विधानसभेत मंत्र्यांना चांगलेच अडचणीत आणले. प्रश्नोत्तराच्या तासात अनेक आमदार आक्रमक झाले होते. जवळपास अर्धा तास यावर चर्चा झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी दालनात बैठक घेण्याचे आश्वासन देऊन सर्व आमदारांना शांत केले. तरीही विरोधकांनी याविषयावर सरकारच्या खरेदी सभात्याग केला. धोरणाविरोधात घोषणाबाजी करत सभात्याग केला. 

सोयाबीनचे सरासरी एकरी उत्पादन १२ क्विंटल आहे, तर सरकारची खरेदी मर्यादा ६ क्विंटल आहे. सोयाबीनचा सरकारचा भाव ५३०० रुपये, तर व्यापारी ४ हजार रुपये देतात. सरकारच्या कमी खरेदीमुळे एका एकराला शेतकऱ्यांचा ७,८०० रुपये तोटा होतो. कापूस एकरी उत्पादन १५ क्विंटल आहे, तर खरेदी मर्यादा ४.८० क्विंटल आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे प्रतिएकर १० हजार रुपये नुकसान होते. मका एकरी उत्पादन ३० क्विंटल असून सहा क्विंटल खरेदी मर्यादा आहे. त्यामुळे प्रतिएकर शेतकऱ्याला २० हजार रुपये तोटा होतो.

सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर

माजी मंत्री विजय वड्डेटीवार यांनी सरकारवर हल्लाबोल करत, शासकीय खरेदी केंद्रावर आलेल्या ५० गाड्यांपैकी कापसाच्या ४० गाड्या परत पाठवल्या जात असल्याचा आरोप केला. शेतकरी कंपन्यांनी खरेदी केंद्राचे प्रस्ताव शासनाकडे पाठवले आहेत, मात्र त्याला मान्यता देण्यासाठी अधिकारी ४ लाख रुपये मागतात असा गंभीर आरोप आमदार बबनराव लोणीकर यांनी केला.

'लोकमत'च्या वृत्तांची दखल : 'लोकमत'मध्ये नोव्हेंबरच्या पहिल्या

आठवड्यात सलग सात वृत्त प्रकाशित करीत या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. विधिमंडळ अधिवेशन काळात 'उत्पादन खर्चापेक्षा हमीभाव कमी, म्हणून उलटी पट्टी', 'सीसीआयच्या मर्यादेत तुटपुंजी वाढ; हेक्टरी ३० क्विंटल कापूस खरेदी करा', 'सोयाबीन खरेदी मर्यादा एकरी किमान १२ क्विंटल करा' या विशेष बातम्यांची दखल घेत विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधिमंडळात शेतकऱ्यांची बाजू लावून धरली.

मुख्यमंत्र्यांनी सावरले

या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री जयकुमार रावल म्हणाले, राज्यात ८० लाख मेट्रिक टन सोयाबीन होणार आहे, आपण २५ टक्के खरेदी करत असतो, त्यानुसार १९ लाख मेट्रिक टन खरेदी करणार आहोत, बाजारातील भाव पडू नये म्हणून ही हस्तक्षेप योजना असते, आपण सगळा शेतमाल खरेदी करत नाही.

अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात हस्तक्षेप केला. अध्यक्ष स्वतः याबाबत बैठक घेत आहेत. यातून मार्ग काढू, सभागृहातील उत्तराने प्रत्येकाचे समाधान होईल असे नाही, काही लोकांना समाधान करून घ्यायचे नाही असे ठरवले असेल तर त्याचे काय करणार, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.

लोकप्रतिनिधी काय म्हणाले...

सरकारची खरेदी केंद्र अजून सुरू झालेले नाही. मंत्र्यांना काहीही माहिती नाही. ३ लाख ३० हजार क्विंटलपैकी मागच्या वर्षी नाफेडने फक्त १७ हजार क्विंटल खरेदी केली. व्यापाऱ्याच्या सोयीसाठी खरेदी केंद्र सुरू करत नाहीत, असा आरोप आमदार प्रकाश सोळंके यांनी केला.सोयाबीन खुल्या बाजारात विकले जात असल्याचे खरे नाही असे सरकार म्हणते. उत्तर छापण्याआधी मंत्र्यांनी माहिती घ्यायला हवी. बारादानाअभावी खरेदी केंद्र बंद आहेत याचा खुलासा करावा, अशी मागणी आ. कैलास पाटील यांनी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Government's low purchase of soybean, cotton for traders' benefit: Assembly cornered ministers.

Web Summary : Legislators grilled ministers over low soybean, cotton procurement benefiting traders. Farmers face significant losses due to limited government purchase quotas compared to actual yields. Opposition staged a walkout, protesting the government's policy.
टॅग्स :FarmerशेतकरीfarmingशेतीnagpurनागपूरWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन