शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

सरकारी वकिलांची अकार्यक्षमता हायकोर्टाच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 11:33 PM

सरकारी वकिलांची अकार्यक्षमता पुन्हा एकदा उच्च न्यायालयाच्या रडारवर आली आहे. न्यायालयाने सरकारी वकिलांवर ताशेरे ओढून राज्य सरकारला यावर सखोल स्पष्टीकरण मागितले आहे.

ठळक मुद्देताशेरे ओढले : राज्य सरकारला मागितले स्पष्टीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारी वकिलांची अकार्यक्षमता पुन्हा एकदा उच्च न्यायालयाच्या रडारवर आली आहे. न्यायालयाने सरकारी वकिलांवर ताशेरे ओढून राज्य सरकारला यावर सखोल स्पष्टीकरण मागितले आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात बालाजी किन्हाळे यांचे फौजदारी अपील प्रलंबित आहे. अपीलवर न्यायमूर्ती रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी होत होती. दरम्यान, सरकारच्या बाजूने न्यायालयाला आवश्यक सहकार्य मिळत नव्हते. काही महिन्यांमध्ये अन्य विविध प्रकरणात हा अनुभव आल्यामुळे न्यायालयाने या समस्येचा सोक्षमोक्ष लावण्याचा निर्णय घेऊन सरकारी वकिलांवर ताशेरे ओढले. सरकारी वकील प्रकरणाची तयारी करून येत नाहीत हे निरीक्षण नोंदविताना वाईट वाटते. परंतु, यासंदर्भात आवश्यक उपाय करणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकरणात सरकारी वकिलांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असते. त्यांच्याकडून प्रभावी सहकार्य न मिळाल्यास त्याचा न्यायदान प्रक्रियेवर गंभीर परिणाम होतो असे मत न्यायालयाने व्यक्त केले.ही समस्या सोडविण्यासाठी न्यायालयाने विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिवांना तीन प्रश्नांची उत्तरे मागितली आहे. त्यात, विशिष्ट कालावधीनंतर सर्व प्रकारच्या सरकारी वकिलांची कामगिरी तपासली जाते काय, ही प्रक्रिया अस्तित्वात असल्यास सरकारी वकिलांची कामगिरी समाधानकारक आढळून येते काय व कामगिरी समाधानकारक आढळून आली नाही तर, त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यात येतात काय या तीन प्रश्नांचा समावेश आहे. प्रधान सचिवांना स्वत:च्या नावाने येत्या १२ मार्चपर्यंत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. प्रतिज्ञापत्रासोबत प्रत्येक सरकारी वकिलाच्या कामगिरीचा अहवालही मागण्यात आला आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयadvocateवकिल