शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

सरकारचा न्याय व्यवस्थेतील हस्तक्षेप वाढला : नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 20:13 IST

देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीशांना समोर येत पत्रकार परिषद घ्यावी लागते, याचा अर्थ न्यायव्यवस्थेवर कुणीतरी दबाव टाकत आहे. देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. सरकारचा न्यायव्यवस्थेतील हस्तक्षेप वाढला आहे, असा आरोप नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेले माजी खासदार नाना पटोले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देन्या. लोया यांच्या मृत्यूची योग्य चौकशी व्हावी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीशांना समोर येत पत्रकार परिषद घ्यावी लागते, याचा अर्थ न्यायव्यवस्थेवर कुणीतरी दबाव टाकत आहे. देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. सरकारचा न्यायव्यवस्थेतील हस्तक्षेप वाढला आहे, असा आरोप नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेले माजी खासदार नाना पटोले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.पटोले म्हणाले, गेली अनेक वर्षे काँग्रेसने देशाच्या संवैधानिक व्यवस्थेला सांभाळून ठेवले. सद्यस्थितीत केंद्र व राज्य सरकार नको तेवढा हस्तक्षेप करून न्यायव्यवस्थेचे धिंडवडे काढत आहेत. याचा परिणाम लोकशाहीवर होत आहे. चार न्यायाधीशांनी मांडलेल्या भूमिकेमुळे आमच्या म्हणण्याला बळ मिळाले आहे. चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांना असे जाहीरपणे भाष्य करता येते का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, न्या लोया यांच्या मृत्यूनंतर न्या. शुक्रे व न्या. गवई यांनी डायसच्या खाली येऊन न्या. लोया यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे सांगितले होते. त्यावेळी त्यांना कुणी हा प्रश्न का विचारला नाही, असा प्रश्नही पटोले यांनी उपस्थित केला. सोबतच दोन न्यायमूर्ती असे समोर स्पष्टीकरण देतात तेव्हा न्यायव्यवस्थाही कुणाच्या दबावात आली का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.न्या. लोया यांचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांना रविभवनातून इस्पितळात नेण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, रविभवनात डिसेंबर २०१४ च्या रेकॉर्ड रजिस्टरमध्ये न्या. लोया यांच्या वास्तव्याची कुठलीच नोंद नाही. न्या. लोया यांचा मृत्यू नागपुरात झाला. त्यांचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. हे प्रकरण आता न्यायालयात असून ते कोणत्या बेंचसमोर चालावे यावरून न्यायाधीशांना टोकाची भूमिका घ्यावी लागली आहे. न्या. लोया यांच्या मृत्यूची योग्य चौकशी व्हावी, अशी मागणीही पटोले यांनी केली. यावेळी जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार उपस्थित होते.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेnagpurनागपूर