शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सरकारचा न्याय व्यवस्थेतील हस्तक्षेप वाढला : नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 20:13 IST

देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीशांना समोर येत पत्रकार परिषद घ्यावी लागते, याचा अर्थ न्यायव्यवस्थेवर कुणीतरी दबाव टाकत आहे. देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. सरकारचा न्यायव्यवस्थेतील हस्तक्षेप वाढला आहे, असा आरोप नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेले माजी खासदार नाना पटोले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देन्या. लोया यांच्या मृत्यूची योग्य चौकशी व्हावी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीशांना समोर येत पत्रकार परिषद घ्यावी लागते, याचा अर्थ न्यायव्यवस्थेवर कुणीतरी दबाव टाकत आहे. देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. सरकारचा न्यायव्यवस्थेतील हस्तक्षेप वाढला आहे, असा आरोप नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेले माजी खासदार नाना पटोले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.पटोले म्हणाले, गेली अनेक वर्षे काँग्रेसने देशाच्या संवैधानिक व्यवस्थेला सांभाळून ठेवले. सद्यस्थितीत केंद्र व राज्य सरकार नको तेवढा हस्तक्षेप करून न्यायव्यवस्थेचे धिंडवडे काढत आहेत. याचा परिणाम लोकशाहीवर होत आहे. चार न्यायाधीशांनी मांडलेल्या भूमिकेमुळे आमच्या म्हणण्याला बळ मिळाले आहे. चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांना असे जाहीरपणे भाष्य करता येते का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, न्या लोया यांच्या मृत्यूनंतर न्या. शुक्रे व न्या. गवई यांनी डायसच्या खाली येऊन न्या. लोया यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे सांगितले होते. त्यावेळी त्यांना कुणी हा प्रश्न का विचारला नाही, असा प्रश्नही पटोले यांनी उपस्थित केला. सोबतच दोन न्यायमूर्ती असे समोर स्पष्टीकरण देतात तेव्हा न्यायव्यवस्थाही कुणाच्या दबावात आली का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.न्या. लोया यांचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांना रविभवनातून इस्पितळात नेण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, रविभवनात डिसेंबर २०१४ च्या रेकॉर्ड रजिस्टरमध्ये न्या. लोया यांच्या वास्तव्याची कुठलीच नोंद नाही. न्या. लोया यांचा मृत्यू नागपुरात झाला. त्यांचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. हे प्रकरण आता न्यायालयात असून ते कोणत्या बेंचसमोर चालावे यावरून न्यायाधीशांना टोकाची भूमिका घ्यावी लागली आहे. न्या. लोया यांच्या मृत्यूची योग्य चौकशी व्हावी, अशी मागणीही पटोले यांनी केली. यावेळी जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार उपस्थित होते.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेnagpurनागपूर