शहरं
Join us  
Trending Stories
1
'जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा', गृहमंत्री अमित शाह यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
2
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
3
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
4
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
5
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
6
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
7
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
8
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
9
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
10
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
11
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
12
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
13
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
14
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा
15
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
16
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
19
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
20
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास

‘मारबत महोत्सवा’साठी सरकारचा पुढाकार : पालकमंत्र्यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 9:14 PM

लोकमतमध्ये उमटलेल्या ‘एमटीडीसीला मारबत महोत्सवाचा विसर’ या मथळ्याखालील बातमीची दखल राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आहे. त्याच बातमीचा उल्लेख करीत त्यांनी ‘मारबत महोत्सवा’साठी राज्य सरकार पुढाकार घेईल, अशी घोषणा आज नागपुरात केली.

ठळक मुद्दे‘मारबत’वरील गीताचा लोकार्पण सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २० ऑगस्ट रोजी दैनिक लोकमतमध्ये उमटलेल्या ‘एमटीडीसीला मारबत महोत्सवाचा विसर’ या मथळ्याखालील बातमीची दखल राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आहे. त्याच बातमीचा उल्लेख करीत त्यांनी ‘मारबत महोत्सवा’साठी राज्य सरकार पुढाकार घेईल, अशी घोषणा आज नागपुरात केली.

सोमवारी श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात ‘बकाल’ चित्रपटातील ‘घेऊन जा गे मारबत’ या नागपुरातील प्रसिद्ध मारबत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या गाण्याचे लोकार्पण बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी काहीच दिवसापूर्वी मारबत महोत्सवाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची बातमी लोकमतमध्ये वाचल्याचा उल्लेख केला. मारबत महोत्सव हा आपल्या इतिहास आणि संस्कृतीतून मिळालेला वारसा आहे. या महोत्सवाला आणखी उभारी देण्याची गरज असून, यासाठी सरकार पुढाकार घेणार असल्याचे ते म्हणाले. आम्ही या बातमीची आणि महोत्सवाची दखल घेतली असून, सरकारी यंत्रणा या महोत्सवात सहभाग घेतील आणि हा महोत्सव जगपातळीवर घेतला जाईल, असे खंबीर आश्वासन चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिले. ‘घेऊन जा गे मारबत’ हे गाणे नागपुरातील गीत लेखक सुरेंद्र मसराम यांनी लिहिले असून, त्याला मोरेश्वर निस्ताने यांनी संगीतबद्ध केले आहे. तर आदर्श शिंदे व धनश्री देशपांडे या आघाडीच्या गायकांनी स्वरबद्ध केले आहे. याप्रसंगी वनराईचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी, प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये, दिग्दर्शक समीर आठल्ये, ज्येष्ठ अभिनेता देवेंद्र दोडके, अभिनेता चैतन्य मेस्त्री, अभिनेत्री जुई बेंडखळे, कथाकार विनोद देशपांडे, नृत्य दिग्दर्शक दिलीप मेस्त्री व दीपा मेस्त्री, रूपाली कोंडेवार-मोरे, मालती दादलानी उपस्थित होते. यावेळी पिवळी मारबत उत्सव समितीचे प्रकाश गौरकर व काळी मारबत उत्सव समितीचे मिलिंद मदने यांचा सत्कार करण्यात आला.एमटीडीसीकडून सातत्याने डावलला जातोय ‘मारबत महोत्सव’इंग्रजी सत्तेविरोधात निर्माण झालेल्या आक्रोशाला परंपरेचे आवरण घालत, देशभक्तांना एकत्रित आणण्याच्या हेतूने १३९ वर्षांपूर्वी नागपुरात ‘मारबत महोत्सव’ आकाराला आला. इंग्रजांच्या नजरेत देशभक्तांचा आक्रोश भरू नये म्हणून त्याला पुतणा मावशी व श्रीकृष्णाचा संदर्भ देऊन हा महोत्सव वाढत गेला. मात्र, या महोत्सवाकडे शासनाचे कधीच लक्ष गेले नाही. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी)नेही या महोत्सवाला उभारी देण्याचे कधीच प्रयत्न केले नाही. नागपूर विभाग आणि मुख्य कार्यालयाच्या समन्वयाअभावी हा महोत्सव अजूनही एमटीडीसीच्या यादीत आलेला नाही, हे विशेष. नेमकी हीच बाजू प्रकाशात आणण्याचे कार्य लोकमतने केले आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर