शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला : आशिष देशमुख यांचा आमदारकीला ‘रामराम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 21:14 IST

मागील काही काळापासून सातत्याने केंद्र व राज्य शासनावर उघडपणे टीका करणारे काटोल येथील आशिष देशमुख यांनी अखेर आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी गांधी जयंतीच्या मुहूर्तावर त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा पाठविला. मात्र त्यांनी अद्यापही भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. परंतु लवकरच ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, असे कयास राजकीय वर्तुळात लावण्यात येत आहेत.

ठळक मुद्देभाजपला अद्याप सोडचिठ्ठी नाही, काँग्रेसचा हात पकडणार?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील काही काळापासून सातत्याने केंद्र व राज्य शासनावर उघडपणे टीका करणारे काटोल येथील आशिष देशमुख यांनी अखेर आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी गांधी जयंतीच्या मुहूर्तावर त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा पाठविला. मात्र त्यांनी अद्यापही भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. परंतु लवकरच ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, असे कयास राजकीय वर्तुळात लावण्यात येत आहेत.आशिष देशमुख हे काटोल-नरखेड विधानसभा क्षेत्रातून २०१४ साली निवडून आले होते. मात्र वर्षभरानंतरच देशमुख यांनी राज्य शासनाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली होती. राज्य सरकारच्या धोरणांच्या विरोधात त्यांनी नागपूरमध्ये ठिय्या आंदोलनही केले होते. वेगळ्या विदर्भावरून मुख्यमंत्र्यांना रोखठोक पत्र पाठविल्यानंतर देशमुख राजीनामा देतील असे अंदाज लावण्यात येत होते, मात्र त्यांनी ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ची भूमिका घेतली होती. अखेर मंगळवारी त्यांनी राजीनाम्याचे पाऊल उचलले. बुधवारी ते मुंंबईला जाऊन विधानसभा अध्यक्षांना भेटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, देशमुख यांच्या पुढील राजकीय भविष्याबाबत विविध कयास लावण्यात येत असून ते पुढील निवडणूक नेमकी कुठून लढणार, यावर राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला आहे.सेवाग्राममध्ये राहुल गांधींचे केले स्वागतआशिष देशमुख यांनी मंगळवारी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना राजीनाम्याचे पत्र पाठविले व त्यानंतर त्यांनी थेट सेवाग्राम गाठले. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जाहीर सभेदरम्यान देशमुख यांनी मंचावर येऊन त्यांचे स्वागत केले व एक पुस्तकदेखील भेट दिले. यावेळी दर्शकांमध्ये त्यांचे वडील व माजी मंत्री रणजित देशमुख हेदेखील उपस्थित होते.अद्याप काँग्रेस प्रवेश नाही : आशीष देशमुख‘लोकमत’ने आशिष देशमुख यांच्याशी संपर्क केला असता अद्याप आपण काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागील वर्षी मी विदर्भात सगळीकडे फिरलो. येथील शेतकरी, तरुणाईच्या समस्या मागील चार वर्षांपासून सुटलेल्या नाही. यासंदर्भात पक्ष व राज्य सरकारकडे मी वारंवार लक्ष वेधले, मात्र यात कोणताही फरक दिसला नाही. शेतकरी व जनतेचा सरकारने भ्रमनिरास केला आहे. त्यामुळे महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सत्याचा मार्ग स्वीकारत मी राजीनामा दिला आहे. मी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. यापुढील निर्णय मी लवकरच घेईल, असेदेखील त्यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Ashish Deshmukhआशीष देशमुखMLAआमदार