शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

कामगार केसरींच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष; शासन असो वा प्रशासन, राजकीय पक्षांनाही महापुरुषांचे विस्मरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2022 11:32 IST

स्वातंत्र्याच्या आंदोलनात महत्त्वाची भूूमिका बजावत असतानाच, त्यांनी उचललेली चळवळीची मशाल कामगारवर्गाच्या उत्थानासाठी महत्त्वाची मानली जाते. कामगार संघटनांचे उद्गाते म्हणूनच त्यांची अवघ्या भारतभरात ओळख आहे.

ठळक मुद्देआज ६८ वी पुण्यतिथी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापुरुषांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या साजऱ्या कराव्या आणि इतर दिवशी बोंबाबोंब, अशी सध्याची स्थिती आहे. स्वातंत्र्यसंग्राम सैनिक कामगार केसरी रामभाऊ रुईकरांच्या बाबतीत तर तेही नशिबी नाही. सामान्य माणसांना विस्मरणाचा आजारच जडलेला. परंतु, शासन-प्रशासन व देशाची सत्ता अनेक वर्ष सांभाळलेल्या राजकीय पक्षालाही किमान त्यांच्या जयंती-पुण्यतिथीचे स्मरण असू नये, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना, ही बाब प्रकर्षाने जाणवते. २७ मार्च रोजी या नि:स्पृह राजकीय व्यक्तिमत्त्वाचा ६८ वा पुण्यस्मरण दिन. मात्र, त्यांचा पुतळा नागपुरात उभा आहे, ही जाणीवच कुणाला नाही. कामगारांना सशक्त करण्याचा नारा देत असतानाचा पूर्णाकृती पुतळा उभा आहे. मात्र, या पुतळ्याची ओळख मिटली आहे. जिथे पुतळ्याची ओळख मिटली असेल तिथे त्यांच्या कर्तृत्वाचा जागर तरी कसा होईल?.

सहा महिन्यांपूर्वी या भागातील रस्त्याचे काम करताना पुतळ्यापुढचा ओटा फोडला गेला. रस्ता पूर्ण झाल्यावरही तो दुरुस्त झालेला नाही. पुतळ्यापुढे मातीचा ढिगारा पडून आहे. एवढेच कमी होते म्हणून की काय, पुतळ्याच्या हातावरून केबलची वायर गेलेली स्पष्टपणे दिसून येते. शिवाय, हा पुतळा कुणाचा आहे याचे उत्तर देणारा साधा नामफलकही येथे आतापर्यंत दिसत नव्हता. तो मागच्या बाजूला टांगलेला होता. आत्ता तो दिसेल अशा ठिकाणी लावलेला आहे. या रस्त्याला रुईकर रोड असे नाव आहे. मात्र, संपूर्ण रस्त्यावर रस्त्याच्या नावाचे नामफलक दिसत नाहीत. गेल्या कित्येक दिवसांपासून पुतळ्याची स्वच्छताही करण्यात आली नव्हती.

रामभाऊ रुईकरांचे कर्तृत्व

रामभाऊ रुईकर हे स्वातंत्र्यसंग्राम सैनिक होते. १९३०, १९३२ व १९४२ ते १९४५ या स्वातंत्र्याच्या आंदोलन काळात ते तुरुंगात होते. सुभाषचंद्र बोस यांच्यासोबतही त्यांनी काम केले. रामभाऊ हिदायततुल्ला यांच्यासोबत नागपूर हायकोर्टात वकिली करत. हिदायतुल्ला नंतर उपराष्ट्रपती झाले. सरदार पटेल यांनी रामभाऊंना तत्कालीन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रिपदही देऊ केले. परंतु, कामगारांच्या सेवेचे कारण देऊन ते पद त्यांनी नाकारले. न्यायाधीश बनण्यासही त्यांनी नकार दिला.

१९६६ मध्ये उभारला पुतळा

१९६६ मध्ये महाल येथील चिटणवीस पार्क स्टेडियम चौकात रामभाऊ रुईकरांचा पुतळा उभारण्यात आला. तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण व मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण झाले. १९९५ मध्ये त्यांच्या शंभराव्या जयंतीला राष्ट्रपतींच्या हस्ते टपाल तिकीटही काढण्यात आले. ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते. याच चौकात देवडिया काँग्रेस भवनही आहे. मात्र, काँग्रेसलाच आपल्या सच्च्या कार्यकर्त्याचे विस्मरण पडलेले आहे. मनपाने या महान पुरुषाची जयंती-पुण्यतिथी साजरी करावी आणि पुतळ्याची स्वच्छता व निगा राखावी, अशी भावना इंटकचे सचिव मुकुंद मुळे यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Socialसामाजिकnagpurनागपूर